
भारतातील अनोख मंदिर जेथील शिवलिंगाची संख्या नेहमी बदलत राहते, विज्ञानालाही ठाऊक नाही यामागच रहस्य
जगातील 5 सर्वात सुंदर देश जे धर्तीवर स्वर्गाचा अनुभव देतात, 2026 मध्ये प्रवासासाठीचे उत्तम पर्याय
सामान्यतः एखाद्या मंदिरात एकच शिवलिंग असते, तर काही ठिकाणी दोन किंवा तीन शिवलिंगही आढळतात. मात्र या मंदिरात शेकडो शिवलिंग आहेत आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे त्यांची संख्या प्रत्येक वेळी मोजताना बदलते. कधी २४३, कधी २८३, तर कधी त्याहूनही अधिक अशी वेगवेगळी संख्या समोर येते. त्यामुळे हे मंदिर केवळ पूजास्थान न राहता एक रहस्य आणि चमत्काराचे प्रतीक बनले आहे. भक्त याला भगवान शिवांचा दरबार मानतात आणि येथे दर्शनासाठी येणारे लोक केवळ पूजा करण्यासाठीच नाही, तर हा अद्वितीय अनुभव अनुभवण्यासाठी येतात.
शिव कचहरी मंदिराचा इतिहास
या अनोख्या मंदिराची स्थापना इ.स. १८६५ साली नेपाळचे राजा राणा सेनापती पद्म जंग बहादुर यांनी केली, असे मानले जाते. मंदिर उभारण्यामागे एक खास संकल्पना होती. भगवान शिवांचे विविध रूप एकाच ठिकाणी प्रकट व्हावेत, या उद्देशाने येथे वेगवेगळ्या स्वरूपातील शिवलिंगांची स्थापना करण्यात आली. काळाच्या ओघात हे मंदिर स्थानिक लोकांपुरते मर्यादित न राहता दूर-दूरवरून येणाऱ्या भाविकांमध्येही प्रसिद्ध झाले.
बदलणारी शिवलिंगांची संख्या
या मंदिराचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे येथे असलेल्या शिवलिंगांची कायम बदलणारी संख्या. अनेक भाविक, अभ्यासक आणि जिज्ञासूंनी शिवलिंग मोजण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी वेगवेगळी संख्या समोर आली. काहींच्या मते हा डोळ्यांचा भास असू शकतो, तर पुजारी आणि श्रद्धाळू याला भगवान शिवांची लीला मानतात.
असेही सांगितले जाते की एकाच व्यक्तीने दोन वेळा मोजणी केली तरी दोन्ही वेळची संख्या वेगळी येते. त्यामुळे आजपर्यंत कोणीही खात्रीपूर्वक असे सांगू शकलेले नाही की या मंदिरात नेमकी किती शिवलिंगे आहेत.
शिवाच्या विविध रूपांचे दर्शन
शिव कचहरी मंदिरात भगवान शिवांचे अनेक रूप दर्शवणारी शिवलिंगे आहेत. येथे चंदेश्वर, सिद्धेश्वर, नागेश्वर तसेच शहीद भगवान अशा विविध नावांनी ओळखली जाणारी शिवलिंगे आढळतात. एका जागी शिवाच्या इतक्या वेगवेगळ्या रूपांचे दर्शन होणे हे अत्यंत दुर्मीळ मानले जाते. म्हणूनच भक्त या मंदिराला ‘शिवांचा दरबार’ म्हणतात.
भगवान रामांशी जोडलेली पवित्र कथा
या मंदिराशी संबंधित एक पौराणिक कथा याला आणखी महत्त्व प्राप्त करून देते. मान्यतेनुसार, लंकेवर विजय मिळवून अयोध्येकडे परतताना रावण वधामुळे भगवान रामांवर ब्रह्महत्येचा दोष लागला होता. या दोषातून मुक्त होण्यासाठी महर्षी भारद्वाज यांनी त्यांना पृथ्वीवर एक कोटी शिवलिंगांची स्थापना करून पूजा करण्याचा सल्ला दिला.
असे सांगितले जाते की प्रयागराजातील शिवकुटी परिसरात भगवान रामांनी कोटेश्वर महादेवाची स्थापना केली आणि हाच परिसर पुढे शिव कचहरी मंदिर म्हणून ओळखला जाऊ लागला. भक्तांचा विश्वास आहे की येथे मनोभावे केलेली पूजा मोठ्यात मोठे दोषही दूर करते.
Christmas 2025 : ख्रिसमसला मुंबईतील या फेमस चर्चमध्ये मिळेल अविस्मरणीय अनुभव
आजही श्रद्धा आणि चमत्काराचे केंद्र
आजच्या काळातही शिव कचहरी मंदिर हे भाविकांसाठी अपार श्रद्धेचे स्थान आहे. विशेषतः श्रावण महिन्यात येथे मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी पाहायला मिळते. अनेकजण आपल्या इच्छा, संकटे आणि आशा घेऊन येथे येतात आणि सच्च्या मनाने केलेली प्रार्थना नक्कीच फळ देते, असा त्यांचा ठाम विश्वास असतो. मंदिरातील वातावरण शांतता, ऊर्जा आणि भक्तीने भरलेले असल्याची अनुभूती अनेक भाविक व्यक्त करतात. म्हणूनच शिव कचहरी मंदिर आजही आस्था, रहस्य आणि चमत्कार यांचे अनोखे संगमस्थान म्हणून ओळखले जाते.