Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Inflation In India : भारतातील ‘या’ 10 राज्यांमध्ये बेरोजगारांची संख्या सर्वाधिक; आकडे पाहून तुमचेही डोळे विस्फारतील

Unemployment In India : भारतातील अनेक राज्यांमधील बेरोजगारीचा दर धक्कादायक आहे. PLFSच्या अहवालानुसार, लक्षद्वीपमध्ये सर्वाधिक बेरोजगार तरुणांची संख्या ३६.२% आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 21, 2025 | 03:47 PM
These 10 states in India have the highest number of unemployed people

These 10 states in India have the highest number of unemployed people

Follow Us
Close
Follow Us:

Unemployment In India : भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था मानली जाते. तंत्रज्ञान, उद्योग, सेवा, शिक्षण आणि शेतीसह विविध क्षेत्रात देश झपाट्याने प्रगती करत आहे. तरीसुद्धा, या प्रगतीच्या शर्यतीत एक मोठा प्रश्न आजही डोके वर काढतोय तो म्हणजे तरुणांची बेरोजगारी. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या कामगार ब्युरोच्या नियतकालिक कामगार दल सर्वेक्षण (PLFS) अहवालानुसार, भारतातील अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १५ ते २९ वर्षे वयोगटातील तरुणांचा बेरोजगारी दर धक्कादायक पातळीवर पोहोचला आहे.

सर्वात धक्कादायक आकडा लक्षद्वीप या छोट्याशा द्वीपसमूहात नोंदवला गेला. येथे जवळपास ३६.२ टक्के तरुण बेरोजगार आहेत. एवढेच नव्हे, तर महिलांमध्ये हा दर तब्बल ७९.७ टक्के इतका आहे. याचा अर्थ असा की, प्रत्येक दहा मुलींमधील आठ जणींना रोजगार नाही. हा आकडा चिंतेचा आणि खळबळजनक आहे.

बेरोजगारीचा उच्चांक गाठलेली राज्ये

अहवालानुसार, देशभरातील २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तरुणांचा बेरोजगारी दर १० टक्क्यांहून अधिक आहे. यापैकी सर्वात गंभीर परिस्थिती असलेली शीर्ष १० राज्ये पुढीलप्रमाणे –

  • लक्षद्वीप – ३६.२% (महिला: ७९.७%, पुरुष: २६.२%)

  • अंदमान-निकोबार बेटे – ३३.६% (महिला: ४९.५%, पुरुष: २४%)

  • केरळ – २९.९% (महिला: ४७.१%, पुरुष: १९.३%)

  • नागालंड – २७.४%

  • मणिपूर – २२.९%

  • लडाख – २२.२%

  • अरुणाचल प्रदेश – २०.९%

  • गोवा – १९.१%

  • पंजाब – १८.८%

  • आंध्र प्रदेश – १७.५%

हे आकडे स्पष्ट दाखवतात की किनारपट्टीवरील व ईशान्येकडील राज्यांमध्ये रोजगाराचा तुटवडा अधिक आहे. पर्यटन, मत्स्यव्यवसाय आणि छोट्या उद्योगांवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था तरुणांना दीर्घकालीन स्थिर नोकऱ्या देण्यात अपयशी ठरत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan NOTAM Missile Test : क्षेपणास्त्र चाचणी की अर्थकारणावर वार? पाकिस्तानच्या संशयास्पद हालचालींमागे लपलाय मोठा डाव

सर्वात कमी बेरोजगारी असलेली राज्ये

दुसऱ्या बाजूला काही राज्यांनी बेरोजगारीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले आहे. मध्य प्रदेश या यादीत तळाशी असून येथे बेरोजगारीचा दर केवळ २.६% आहे. त्याचबरोबर गुजरात (३.१%), झारखंड (३.६%) आणि दिल्ली (४.६%) याठिकाणीही परिस्थिती तुलनेने स्थिर आहे. काही राज्यांनी औद्योगिक गुंतवणूक, स्टार्टअप्स आणि कृषीआधारित उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्माण करण्यात यश मिळवले आहे.

पुरुष-स्त्रिया आणि शहर-गाव यांचे चित्र

अहवालात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. देशभरातील महिला बेरोजगारी दर (११%) हा पुरुषांपेक्षा (९.८%) अधिक आहे. म्हणजेच महिलांना नोकरीच्या संधी अजूनही कमी प्रमाणात मिळत आहेत. तसेच शहरी भागात बेरोजगारीचा दर १४.७% इतका आहे, तर ग्रामीण भागात तो ८.५% आहे. शहरांमध्ये उच्च शिक्षित तरुणांची संख्या जास्त असली, तरी तिथे योग्य नोकऱ्यांची कमतरता भासते. ग्रामीण भागात शेती आणि पारंपरिक व्यवसायांमुळे काही प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो.

बेरोजगारीचे परिणाम आणि उपाययोजना

तरुण बेरोजगारांची ही वाढती संख्या केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक दृष्ट्याही धोकादायक ठरू शकते. बेरोजगारीमुळे स्थलांतर, आर्थिक विषमता, मानसिक ताणतणाव आणि सामाजिक अस्थिरता वाढण्याचा धोका असतो.

तज्ञांच्या मते, यावर उपाय म्हणून –

  • कौशल्याधारित शिक्षणाला चालना देणे,

  • लघुउद्योग व स्टार्टअप्ससाठी भांडवल उपलब्ध करून देणे,

  • पर्यटन, आयटी, हरित ऊर्जा आणि उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे,

  • तसेच महिलांसाठी रोजगार संधी वाढवणे गरजेचे आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : JeM 313 Bases : भारतासाठी नवी कसोटी? ऑनलाइन फंडिंग, मशिदींतून देणग्या; पाकिस्तानला पुन्हा लागलेत दहशतवादाचे डोहाळे

तरुणाई हीच खरी ताकद

भारत हा तरुणांचा देश आहे. लोकसंख्येच्या ६५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ही तरुणांची आहे. हीच आपली खरी ताकद आहे. परंतु या तरुणांना रोजगार नसेल, तर देशाची प्रगतीही अपूर्ण राहील. त्यामुळे बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकार, उद्योगक्षेत्र आणि समाज या तिन्ही पातळ्यांवर समन्वयाची गरज आहे.

Web Title: These 10 states in india have the highest number of unemployed people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 03:47 PM

Topics:  

  • Andaman and Nicobar Islands
  • Haryana
  • jammu kashmir
  • Manipur

संबंधित बातम्या

हरियाणात मृतदेह सापडला! ३ पोस्टमॉर्टम रिपोर्ट, CBI चौकशीची मागणी आणि लॉरेन्स बिश्नोईची नोंद…,मनीषाच्या मृत्यूचे गूढ कधी उलगडणार?
1

हरियाणात मृतदेह सापडला! ३ पोस्टमॉर्टम रिपोर्ट, CBI चौकशीची मागणी आणि लॉरेन्स बिश्नोईची नोंद…,मनीषाच्या मृत्यूचे गूढ कधी उलगडणार?

Cloudburst in Kishtwar: किश्तवाडमध्ये आभाळ फाटलं; आतापर्यंत ४जणांचा मृत्यूची नोंद, आकडा वाढण्याची शक्यता
2

Cloudburst in Kishtwar: किश्तवाडमध्ये आभाळ फाटलं; आतापर्यंत ४जणांचा मृत्यूची नोंद, आकडा वाढण्याची शक्यता

Cloud Burst in Kishtwar: जम्मू-काश्मीरमध्ये निसर्गाचा कहर; किश्तवाडमध्ये ढगफुटी, मोठ्या प्रमाणात वित्तहानी होण्याची शक्यता
3

Cloud Burst in Kishtwar: जम्मू-काश्मीरमध्ये निसर्गाचा कहर; किश्तवाडमध्ये ढगफुटी, मोठ्या प्रमाणात वित्तहानी होण्याची शक्यता

Jammu And Kashmir: उधमपूरमध्ये मोठा अपघात… CRPF जवानांची बस 200 फूट खोल दरीत कोसळली, 3 जवानांचा मृत्यू; 16 जण जखमी
4

Jammu And Kashmir: उधमपूरमध्ये मोठा अपघात… CRPF जवानांची बस 200 फूट खोल दरीत कोसळली, 3 जवानांचा मृत्यू; 16 जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.