
मधुमेह झाल्यानंतर पायांमध्ये दिसून येतात 'हे' बदल
जगभरात सगळीकडे मधुमेहाचे रुग्ण वाढले आहेत. मधुमेह हा गंभीर आजार झाल्यानंतर अनेक पथ्य पाळावे लागतात. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते, ज्यामुळे मधुमेह होतो. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागल्यानंतर शरीरसंबंधित अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे आवश्यक आहे. मधुमेह शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडते. तसेच खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये पथ्य न पाळल्यास आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात अतिगोड किंवा तिखट मसालेदार पदार्थांचे सेवन करू नये. मधुमेह झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये तणाव, चिंता, कमकुवत रोगप्रतिकारशक्ती, ऑस्टिओपोरोसिस इत्यादी आजारांचा धोका वाढतो आणि आरोग्य बिघडते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मधुमेह झाल्यानंतर पायांमध्ये कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सांगणार आहोत.चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लाइफस्टाईलच्या बातमीसाठी इथे क्लिक करा
मधुमेह झाल्यानंतर हळूहळू पायांचा रंग बदलून जातो. रक्तप्रवाहात अडथळा येणं, फंगल इन्फेक्शन, ऍथलीटच्या पायाला लागणं इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे पायांमधील रंग बदलू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.
मधुमेह झाल्यानंतर हातापायांना मुंग्या येऊ लागतात. शिवाय थकवा आणिअशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे योग्य वेळी लक्षण ओळखून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.
लाइफस्टाईलच्या बातमीसाठी इथे क्लिक करा
मधुमेहाची समस्या उद्भवल्यानंतर आहारात अतिगोड, मैदा किंवा तेलकट तिखट पदार्थांचे सेवन करू नये. या पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. कोल्डड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स किंवा बंद डब्यात असलेल्या फळांच्या रसाचे सेवन करू नये. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे क्तातील ग्लुकोजचा स्तर झपाट्याने वाढू लागतो आणि आरोग्य बिघडते.मिठाई, खीर, आइसक्रीम,शेक इत्यादी पदार्थांचे रोजच्या आहारात कमीत कमी सेवन करावे. अतिप्रमाणात गोड पदार्थ खाल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत जाते आणि आरोग्य बिघडू लागते. मधुमेहाच्या रुग्णांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.