Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Copper Water: ‘या’ लोकांनी चुकूनही करू नका तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे सेवन! आरोग्यासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या

तांब्याच्या भांड्यातील सगळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरत नाही. त्यामुळे किडनी, गर्भवती महिलांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी अजिबात पिऊ नये. जाणून घ्या तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे तोटे.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 28, 2025 | 09:01 AM
'या' लोकांनी चुकूनही करू नका तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे सेवन!

'या' लोकांनी चुकूनही करू नका तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे सेवन!

Follow Us
Close
Follow Us:

तांब्याच्या भांड्यातील पाण्याला आयुर्वेदामध्ये विशेष महत्व आहे. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते. याशिवाय तांब्याच्या भांड्याचा वापर मागील अनेक पिढ्यांपासून केला जात आहे. पूर्वीच्या काळी सर्वच घरांमध्ये तांब्याच्या भांडी होती. हे पाणी आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानले जाते. नियमित तांब्याच्या भांड्यातील प्यायल्यास पचनक्रिया निरोगी राहते, शरीर डिटॉक्स होते, शरीरातील उत्साह वाढतो आणि शरीराला आवश्यक खनिजे मिळतात. अनेक घरांमध्ये अजूनही तांब्याच्या बाटलीमध्ये पाणी भरून ठेवले जाते. पण वारंवार तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या लोकांनी दैनंदिन वापरात तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

100 वर्ष जगायचं असेल तर आजपासूनच आपल्या आहारात या 5 बियांचा समावेश करा; याचे सेवन शरीरासाठी कोणत्या चमत्काराहून कमी नाही

‘या’ लोकांनी चुकूनही पिऊ नका तांब्याच्या भांड्यातील पाणी:

किडनी स्टोन:

किडनीसंबंधित आजाराची लागण झालेल्या लोकांनी चुकूनही तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ नये. कारण यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. किडनी शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्याचे काम करते. पण किडनीच्या कार्यात अडथळे आल्यानंतर किडनीमधील विषारी घटक बाहेर पडून जात नाही. त्यामुळे शरीरात तांब साचून राहत. किडनी फेल्युअर, किडनी स्टोन किंवा किडनीच्या इतर आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी न पिता काच किंवा प्लॅस्टिकच्या बॉटलमधील पाणी प्यावे.

विल्सन डिसीज असलेले रुग्ण:

विल्सन डिसीज हा एक अनुवांशिक आजार आहे. या आजाराची लागण झालेल्या व्यक्तीच्या शरीरात तांब्याचे घटक तसेच साचून राहतात. याशिवाय लिव्हर, मेंदू आणि इतर महत्त्वाच्या अवयवांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते. ज्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतो. त्यामुळे चुकूनही तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे अजिबात सेवन करू नका.

गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिला:

गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी अजिबात पिऊ नये. यामुळे आई आणि बाळाला धोका निर्माण होऊ शकतो. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे शरीरातील तांब्याची पातळी असंतुलित होऊन जाते.

वात- पित्ताच्या समस्येपासून कायमची मिळेल सुटका! सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा ‘या’ बारीक फळाचे सेवन

FAQs (संबंधित प्रश्न)

तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे फायदे:

तांब्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. तांब्यामध्ये असलेले गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

तांब्याच्या भांड्यातून पाणी पिताना घ्यायची काळजी:

तांब्याचे भांडे रोज स्वच्छ धुवा आणि त्यात पाणी भरून रात्रभर ठेवा. पाणी जास्त काळ तांब्याच्या भांड्यात ठेवल्यास ते विषारी बनू शकते, म्हणून एका रात्रीपेक्षा जास्त काळ पाणी ठेवू नका.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: These people should not accidentally consume water from a copper pot serious health problems will arise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 09:01 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • side effect

संबंधित बातम्या

सकाळच्या नाश्त्यात केलेले ‘हे’ बदल शरीरासाठी ठरतील प्रभावी, गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून मिळेल आराम
1

सकाळच्या नाश्त्यात केलेले ‘हे’ बदल शरीरासाठी ठरतील प्रभावी, गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून मिळेल आराम

‘या’ व्यक्तींच्या आरोग्यासाठी कांदा ठरेल अतिशय घातक, उद्भवतील पचनाचे गंभीर विकार
2

‘या’ व्यक्तींच्या आरोग्यासाठी कांदा ठरेल अतिशय घातक, उद्भवतील पचनाचे गंभीर विकार

Health Care Tips : गरम की थंड? सकाळी रिकाम्या पोटी कोणतं पाणी प्यावं? ‘ही’ योग्य निवड तुमचं आरोग्य सुधारू शकते
3

Health Care Tips : गरम की थंड? सकाळी रिकाम्या पोटी कोणतं पाणी प्यावं? ‘ही’ योग्य निवड तुमचं आरोग्य सुधारू शकते

फुप्फुसात कफ वाढल्यास धोका जास्त! औषधनिर्मिती आणि उपचार पद्धतींना मिळणार नवी दिशा
4

फुप्फुसात कफ वाढल्यास धोका जास्त! औषधनिर्मिती आणि उपचार पद्धतींना मिळणार नवी दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.