
पोटाला सूज आल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, वेळीच उपचार करून टाळता येईल मोठा धोका
पोटाला सूज कशामुळे येते?
आतड्यांना सूज आल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
सूज कमी करण्यासाठी उपाय?
निरोगी राहण्यासाठी शरीरातील सर्वच अवयव सक्रिय असणे फार महत्वाचे आहे. बऱ्याचदा आतड्यांमध्ये जमा झालेल्या घाणीचा संपूर्ण शरीरावर परिणाम दिसून येतो. शरीराला गंभीर आजाराचे लागण होण्यामागील मुख्य अवयव म्हणजे पोट. शरीराला जास्तीत जास्त आजारांची पोटामुळेच होते. त्यामुळे नेहमीच पोटाच्या आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. पोटामध्ये लहान आणि मोठ्या अशा दोन प्रकारच्या आतड्या असतात. त्यातील छोटी आतडी खाल्लेले अन्नपदार्थ पचन करते तर मोठी आतडी पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स संपूर्ण शरीराला पोहचवण्याचे काम करते. यासोबतच शरीरातील विषारी घटक एकत्र जमा करण्याचे काम मोठी आतडी करते. या दोन्ही आतड्या मिळवून पोटाचे आरोग्य चांगले ठेवण्याचे काम करते. पण काही कारणांमुळे मोठ्या आतड्याना सूज येते. मोठ्या आतड्यांना आलेली सूज संपूर्ण शरीरासाठी धोक्याची ठरते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आतड्यांना सूज आल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
वारंवार पोटात गॅस तयार होणे
अपचनाच्या समस्या
पोट फुगणे किंवा ऍसिडिटीची समस्या
पोटात दुखणे किंवा मुरड मारल्यासारखे होणे
पुन्हा पुन्हा टॉयलेटला जाण्याची इच्छा
वजन कमी होणे
उलट्या झाल्यासारखे वाटणे
दैनंदिन आहारात होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. आहारात तिखट, तेलकट किंवा रस्त्यावरील उघडे पदार्थ खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि पोटाला हानी पोहचते. दूषित पाणी किंवा अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे पोटातील आतड्यांना सूज येते आणि शरीरावर परिणाम दिसून येतो. त्यामुळे आतड्यांचे कार्य सुधारण्यासाठी नियमित एक ग्लासभर ताक किंवा वाटीभर दही खावे. आतड्यांमध्ये चांगले विषाणू वाढवण्यासाठी ताक किंवा दही खावे. यामध्ये प्रोबायोटिक्सयुक्त गुणधर्म असतात.
सतत आंबट ढेकर येतात? जेवताना केलेली एक चूक शरीरासाठी ठरेल धोक्याची, अपचनाच्या समस्येवर करा ‘हे’ उपाय
जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवताना कांदा आणि लसूणचा वापर केला जातो. या पदार्थांशिवाय जेवणाला चांगली चव लागत नाही. कांदा लसूण आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करतात. पोटात चांगले विषाणू वाढवण्यासाठी आणि हानिकारक विषाणू नष्ट करण्यासाठी कांदा लसूण खावी. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी लसूण पाकळी चावून खाल्ल्यास आतड्यांमधील घाण स्वच्छ होईल.