Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विवाहित स्त्रिया हातामध्ये हिरव्या बांगड्या का घालतात? जाणून घ्या सविस्तर कारंण

लग्न झाल्यानंतर महिला हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात. हिरव्या बांगड्या घातल्यानंतर महिलांच्या हातांची शोभा वाढते आणि हात सुंदर दिसतात. मात्र यामागे नेमके काय कारण आहे, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 28, 2024 | 03:50 PM
लग्न झाल्यानंतर महिला हातांमध्ये हिरव्या बांगड्या का घालतात

लग्न झाल्यानंतर महिला हातांमध्ये हिरव्या बांगड्या का घालतात

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय संस्कृतीमध्ये लग्न झाल्यानंतर महिलांच्या गळ्यात मंगळसूत्र, हातामध्ये हिरव्या बांगड्या, पायामध्ये पैंजण आणि जोडवी इत्यादी दागिने घातले जातात. या दागिन्यांना पूर्वीच्या काळापासून विशेष महत्व आहे. लग्न झाल्यानंतर महिला अनेक वेगवेगळे दागिने घालतात. त्यात हातात घालतंय जाणाऱ्या हिरव्या बांगड्याना विशेष महत्व आहे. हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे पतीचे वय वाढते, अशी मान्यता आहे. हातामध्ये बांगड्या घालण्याची परंपरा वैदिक काळापासून चालत आली आहे. याचा पुरावा म्हणून हिंदू देवतांच्या हातामध्ये बांगड्या आहेत. हातामध्ये बांगड्या घालण्यामागे श्रृंगारासोबतच धार्मिक आणि वैज्ञानिक करणे सुद्धा आहेत. चला तर जाणून घेऊया लग्न झाल्यानंतर महिला हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या का घालतात? जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य-pinterest)

लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

लग्न झाल्यानंतर महिला हातांमध्ये हिरव्या बांगड्या का घालतात?

मराठी संस्कृतीमध्ये हिरवा रंग अतिशय शुभ मानला जातो. लग्नाच्या दिवशी नवीन नवरीच्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्यांचा चुडा भरला जातो. कारण विवाहित जीवनाची सुरुवात सर्जनशील, सकारात्मक, गोड, प्रेमळ आणि समृद्धीने होण्यासाठी हिरव्या रंगाचा चुडा भरला जातो. शिवाय नवीन घरातील नातेसंबंध प्रेमाने फुलतील आणि भरभराट होते.

बांगड्या घालण्याचे धार्मिक महत्त्व:

लग्न झाल्यानंतर किंवा इतर वेळी महिला दोन्ही हातांमध्ये बांगड्या घालतात. मात्र यामागे धार्मिक दृष्टिकोन सुद्धा आहे. विवाहित महिलेने दोन्ही हातामध्ये बांगड्या घातल्यामुळे पतीला दीर्घायुष्य लाभते. 16 श्रृंगारामधील हिरव्या बांगड्या हा एक शृंगार आहे. त्यामुळे दुर्गादेवीला दिल्या जाणाऱ्या नैवेद्यात बांगड्या आवर्जून दिल्या जातात. तसेच ज्योतिष शास्त्रानुसार हिरव्या बांगड्या दान केल्यामुळे बुध ग्रहाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि विवाहित महिलांना पुण्य मिळते. तर वास्तुशास्त्रानुसार हातामध्ये असलेल्या हिरव्या बांगड्यांच्या आवाजामुळे घरात सकारात्मक ऊर्जे वाढते.

लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

बांगड्या घालण्याचे वैज्ञानिक महत्व:

ज्या महिला हातामध्ये बांगड्या घालतात, त्यांचे शारीरिक आरोग्य चांगले राहते. शिवाय नियमित बांगड्या घातल्यामुळे श्वासांचे आणि हृद्यासंबंधित आजार बरे होतात. मानसिक संतुलन सुधारण्यासाठी हातामध्ये बांगड्या घालाव्यात. यामुळे महिलांना कमी थकवा जाणवतो. शिवाय मानसिक संतुलन सुधारते. विज्ञानानुसार, मनगटाच्या खालपासून ते ६ इंचापर्यंत एक्यूप्रेशर पॉइंट असतात, त्यांच्यावर आलेल्या दबावामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे नियमित महिलांनी हातामध्ये हिरव्या बांगड्या घालाव्यात.

Web Title: Why do married women wear green bangles on their hands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 03:50 PM

Topics:  

  • Indian culture

संबंधित बातम्या

पेंच नदीच्या कुशीत दडलीय संस्कृती, प्राचीन शिलाश्रयांची कहाणी, राणी घाटची रहस्यमयी गुहा प्राचीन इतिहासाची साक्ष
1

पेंच नदीच्या कुशीत दडलीय संस्कृती, प्राचीन शिलाश्रयांची कहाणी, राणी घाटची रहस्यमयी गुहा प्राचीन इतिहासाची साक्ष

रामायण आणि महाभारतातदेखील मॉक ड्रिलचा संदर्भ; अशा प्रकारे होत असे पूर्वतयारी
2

रामायण आणि महाभारतातदेखील मॉक ड्रिलचा संदर्भ; अशा प्रकारे होत असे पूर्वतयारी

118 कोटींना विकली गेलेली एम. एफ. हुसेन यांची पेंटिंग; जाणून घ्या काय आहे खास?
3

118 कोटींना विकली गेलेली एम. एफ. हुसेन यांची पेंटिंग; जाणून घ्या काय आहे खास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.