भारतीय संस्कृतीमध्ये बांगड्याना विशेष महत्व आहे. पूर्वीच्या काळापासून महिला दोन्ही हातांमध्ये बांगड्या परिधान करत होत्या. हीच परंपरा अजूनही चालू आहे. वेगवेगळ्या रंगाच्या किंवा कडे घातल्यानंतर हात खूप सुंदर आणि उठावदार दिसतात. भारतामध्ये वेगवेगळ्या जातींचे आणि धर्मांचे लोक राहतात. प्रत्येकाची परंपरा वेगळी असल्यामुळे लग्न समारंभात नववधूच्या हातामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या आणि रंगाच्या बांगड्या असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला प्रत्येक राज्यातील नववधू हातामध्ये कोणत्या रंगाच्या बांगड्या परिधान करतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-pinterest)
नववधू लग्नात परिधान करतात 'या' पद्धतीच्या बांगड्या
महाराष्ट्रीयन नववधूच्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या असतात. या बांगड्याना हिंदू संस्कृतीमध्ये विशेष महत्व आहे. लग्नानंतर प्रत्येक महाराष्ट्रीयन वधूला हातामध्ये भरपूर हिरव्या बांगड्या घातल्या जातात.
मल्याळी नववधू लग्नामध्ये सोन्याचे दागिने परिधान करतात. शिवाय लग्न समारंभात सोन्याच्या बांगड्या परिधान केल्या जातात.यामुळे नवरीचे सौंदर्य आणखीन वाढते.
गुजराती नववधूच्या हातामध्ये हिरव्या, लाल आणि निळ्या अशा विविध रंगाच्या बांगड्या असतात. या बांगड्या हातामध्ये खूप सुंदर दिसतात.
राजस्थानमध्ये लाख बांगड्या नववधूच्या हातामध्ये घालण्यास दिल्या जातात. या बांगड्या तयार करताना वेगवेगळे रंग वापरले जातात.
शीख आणि पंजाबमध्ये नववधूच्या हातामध्ये पंजाबी चुडा घालण्याची पद्धत आहे. पंजाबी बांगड्यांमध्ये लाल आणि पांढऱ्या रंगाच्या बांगड्या मिक्स करून चुडा तयार केला जातो.