Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bacchu Kadu News:माझ्या मतदारसंघात १३ हजार दुप्पट मते…; बच्चू कडूंचा निशाणा

बांगलादेशने निर्यात बंदी उठवली असली तरी शेतकऱ्यांना त्याचा काही उपयोग नसल्याचे कडूंनी स्पष्ट केले. “कधी भाव वाढतो तेव्हा शेतकऱ्याच्या हातात माल नसतो, भाव कमी झाला की शेतमाल दारात सडतो

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 16, 2025 | 01:45 PM
'कुणाला फसवायचं यात भाजप पटाईत'; बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

'कुणाला फसवायचं यात भाजप पटाईत'; बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Follow Us
Close
Follow Us:

Akola News: ” निवडणुका लढवाव्यात ती नाही हा विचार माझ्या मनात आहे. मला वाटतं मतदान केंद्रांची काही गरजच नाही, थेट भाजपच्या कार्यालयात मतपेट्या ठेवून भाजपच्याच कार्यकर्त्यांनी मतदान करून त्यांनीच नगरसेवक निवडून आणावेत. निवडणुकीचा खर्च तरी कशासाठी करायचा. माझ्या मतदारसंघात १३ हजार नावे दुप्पट आढळली आहेत. लोकशाहीचे पतन सुरू आहे. त्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला पत्र देणार आहोत,” अशा शब्दांत प्रहार संघटनेचे नेते व आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

डीवायएसपी प्रकरणावर संताप

शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या डीवायएसपी अनंत कुलकर्णींचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावर प्रतिक्रीया देताना बच्चू कडू म्हणाले, “ज्या अधिकाऱ्याने शेतकऱ्याला लाथ मारली, त्यालाही लाथ बसली पाहिजे. केवळ निलंबनाने काही होणार नाही, त्या शेतकऱ्यानेच त्याच्या ढुंगणावर लाथ मारली पाहिजे. नाहीतर आम्ही त्या डीवायएसपीच्य ढुंगणावर लाथ मारू, पंकजा मुंडे ने देखील हे समजायला हवं होतं पंकजा मुंडेंनी देखील निषेध व्यक्त करायला हवा होता. आमचे मुख्यमंत्री हुशार आहेत, गृहमंत्रीही तेच आहेत, आणि त्यांचे पोलीसही असेच वागत आहेत.

8th Pay Commission: सरकारी कामगारांना 2028 पर्यंत पहावी लागणार वाट, 7 वा वेतन आयोग मिळायला लागला होता ‘इतका’ वेळ

शिंदेंना लॉटरी लागली ते कोणी लावून दिलं हे नाईकांना माहिती आहे. लॉटरी सामान्य माणसाला कधी लागत नाही; ती फक्त मंत्री आणि उद्योगपतींनाच लागते.”असा टोलाही त्यांनी लगावला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या युतीबाबत संजय राऊत यांनी केला होता. त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना बोलताना बच्चू कडू म्हणाले, “दोन ठाकरे एकत्र आले तरी शेतकऱ्याचं काय? मुंबई जिंकली तरी आमच्या शेतमालाला भाव नाही, शिक्षण-आरोग्याचा प्रश्न सुटला नाही. मग आमचं काय भलं होणार?”

शिंदे–पवार दिल्ली दौऱ्यावर खिल्ली उडवत बच्चू कडू म्हणाले, ”उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित दादा उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने दिल्लीला जाणार म्हणतात. त्यांना जावंच लागेल, नाही गेले तर काय करणार? इथे ते वाघ आहेत पण दिल्लीला गेल्यावर त्यांना शेपटी हलवावीच लागते,” असा उपरोधिक टोला कडूंनी लगावला.

Dahi Handi 2025 : मुंबई-ठाण्यातील या भागात सर्वात उंच दहीहंडी, ‘संस्कृती’ देणार 25 लाखांचे ‘लोणी’, कोणत्या

सुप्रीम कोर्ट आणि ईडीवर भाष्य करत कडू यांनी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे कौतुक केले. “गवईंमुळे तरी वाटतं की सुप्रीम कोर्ट संविधानाचा आदर करेल. ईव्हीएम व ईडी भाजपने ताब्यात घेतल्या आहेत. लोकशाही संपवून हुकूमशाहीकडे देश ढकलला जातोय,” असा आरोपही बच्चू कडूंनी यावेळी केला.

तसेच,बांगलादेशने निर्यात बंदी उठवली असली तरी शेतकऱ्यांना त्याचा काही उपयोग नसल्याचे कडूंनी स्पष्ट केले. “कधी भाव वाढतो तेव्हा शेतकऱ्याच्या हातात माल नसतो, भाव कमी झाला की शेतमाल दारात सडतो. कायमस्वरूपी उपाय हवा. पेरणी ते कापणीपर्यंतचा ६० टक्के खर्च सरकारने उचलला तर शेतकऱ्यांची हानी कमी होईल. हमीभावाची ताकद राहिलेली नाही,” असे त्यांनी सांगितले.

 

Web Title: 13 thousand double votes in my constituency bachchu kadus target

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 01:45 PM

Topics:  

  • Bacchu Kadu
  • BJP
  • EVM

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.