Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डेरवणच्या राजेवाडी धरण दुरूस्तीसाठी १५ कोटी मंजूर, आ. शेखर निकम यांच्या अथक प्रयत्नांना यश

आ. शेखर निकम यांच्या अथक प्रयत्नाना यश, तब्बल चार वर्षानंतर धरण दुरुस्तीला प्रशासकीय मान्यता, डेरवण, सावर्डेसह बारा गावांचा पाणीप्रश्न सुटणार

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 11, 2024 | 05:57 PM
डेरवणच्या राजेवाडी धरण दुरूस्तीसाठी १५ कोटी मंजूर, आ. शेखर निकम यांच्या अथक प्रयत्नांना यश
Follow Us
Close
Follow Us:

चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील राजेवाडी धरणाला लागलेल्या गळतीमुळे सुरक्षितता विचार करून चार वर्षापूर्वी पाणी सोडून धरण रिकामे केले गेले. त्यामुळे परिसराला दहा ते बारा गावांना चार वर्षे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. धरण दुरूस्तीसाठी आमदार शेखर निकम हे गेली चार वर्षे सातत्याने पाठपुरावा करत होते. अखेर त्यांच्या सुरू असलेल्या अथक प्रयत्नांना शुक्रवारी यश आले आहे. धरण दुरुस्तीच्या १५ कोटीच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून यामुळे डेरवण, सावर्डेसह परिसरातील पाणीप्रश्न चार वर्षानी सुटणार आहे.

डेरवण गावातील लोकांना पाणी उपलब्ध व्हावे, शेती उत्पादनाला वाव मिळावा या हेतूने डेरवण वालावलकर ट्रस्टचे काका महाराज यांच्या विशेष परिश्रमाने राजेवाडी धरण प्रकल्पाला १९९५-९६ मध्ये मंजुरी मिळाली. त्यानंतर अवघ्या चार वर्षात म्हणजे २००० मध्ये सुमारे १० कोटी रुपये खर्चून हा घरण प्रकल्प उभा राहिला. मात्र चार वर्षांपूर्वी धरणाच्या मुख्यविमोचकामधून अचानक गळती सुरू झाल्याने येथील जलसंधारण विभागाने दुरुस्ती आणि सुरक्षितता मुद्याचा विचार करुन चार वर्षापूर्वी धरणातील पाणी सोडून धरण रिकामे केले. मात्र दुरूस्ती न झाल्याने धरणात खडखडाट होऊन गेल्या चार वर्षांपासून कापशी नदी पात्र पाण्याविना कोरडे पडलेले आहे. परिणामी परिसरातील ग्रामस्थांना पाणी टंचाईस तोंड द्यावे लागत आहे.

दरम्यान, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे धरण दुरुस्ती चार वर्षे जैसे थे अवस्थेत राहिले. परिसरातील पाणीटंचाई लक्षात घेत आमदार शेखर निकम हे सातत्याने या धरण दुरूस्तीसाठी प्रयत्न, पाठपुरावा करत होते. मंत्री, सचिव पातळीवर वारंवार भेटी घेत होते. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर फाईल पुढे पुढे सरकत राहिली. दोनवेळा अंदाजपत्रके तयार करण्यात आली. अखेर शुक्रवारी या धरण दुरूस्तीला १५ कोटी रूपये खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे योगदान महत्वाचे ठरले. यामुळे या धरण दुरूस्ती आणि परिसरातील गावीं पाणीटंचाई हे दोन्ही प्रश्न सुटणारे आहेत.

दरम्यान निधी मंजूरीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री ना. देवेंद्र फडणवीस, जलसंधारण मंत्री संजय राठोड, पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी विशेष सहकार्य केल्याने त्यांना आमदार शेखर निकम यांनी धन्यवाद दिले आहेत. तसेच कार्यकारी अभियंता सुहास गायकवाड, उपअभियंता सागर भराडे यांचेही सहकार्य लाभले आहे.

Web Title: 15 crore sanctioned for the repair of rajewadi dam of derwan rs success to shekhar nikams tireless efforts maharashtra government chipalun ratnagiri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2024 | 05:57 PM

Topics:  

  • chipalun
  • Maharashtra Government
  • Ratnagiri News Update

संबंधित बातम्या

शासनविरोधातील आंदोलन शिक्षकांना भोवले? तब्बल 25 लाख शिक्षकांचे पगारच रोखले
1

शासनविरोधातील आंदोलन शिक्षकांना भोवले? तब्बल 25 लाख शिक्षकांचे पगारच रोखले

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा; दोन लाखांपर्यंतच्या पीक कर्जांना मुद्रांक शुल्क माफ
2

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा; दोन लाखांपर्यंतच्या पीक कर्जांना मुद्रांक शुल्क माफ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.