Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुसळधार पावसाचा अमरावतीतील 162 गावांना फटका; 1593 हेक्टर शेतीचे नुकसान

अंजनगावसुर्जी तालुक्याला मान्सूनपूर्व पावसाने चांगलेच झोडपले असून, एकाच दिवशी 86 मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या पन्नास वर्षात मे महिन्यात एकाच दिवशी झालेला हा सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 30, 2025 | 02:53 PM
162 गावांना फटका, 1593 हेक्टर शेतीचे नुकसान

162 गावांना फटका, 1593 हेक्टर शेतीचे नुकसान

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यातच या पावसाचा अमरावती जिल्ह्यातील 162 गावांना मोठा फटका बसला आहे. हवामानातील अचानक बदलामुळे शेतकरी वर्गासमोर मोठे संकट उभे राहिले असून, आतापर्यंत 1593 हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांचे नुकसान झाल्याचे अधिकृत आकडेवारीतून समोर आले आहे. अशातच गुरुवारी (दि.29) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पुन्हा पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे जनजीवनासह शेती पिकांना आणखी मोठा फटका बसला आहे.

मुसळधार पावसामुळे केवळ शेतीच नव्हे; तर मानवी वस्तीवरही विपरीत परिणाम झाला आहे. जिल्ह्यात 143 घरांची अंशतः पडझड झाली आहे. यामुळे अनेक कुटुंबांचे निवासस्थान धोक्यात आले असून, प्रशासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. या दरम्यान, वीज पडून दोन जनावरांचा मृत्यू झाल्याचेही नोंदवण्यात आले आहे. ही घटना शेतकऱ्यांसाठी आर्थिक नुकसानीची आणखी एक भर ठरली आहे. शेतकरी वर्गात निर्माण झालेली अस्थिरता, घरांच्या नुकसानीमुळे वाढलेली चिंता आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे जिल्ह्याभरात नागरिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेदेखील वाचा : Landslides Risk : रायगड जिल्ह्यातील ३९२ गावांना दरडींचा धोका, धूप भूवैज्ञानिकांच्या सर्वेक्षणानंतर आणखी २८९ गावांचा समावेश

दरम्यान, प्रशासनाने संबंधित भागात तत्काळ पंचनामे व मदतकार्य सुरू केले असून, पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

ज्वारी, केळी, कांद्याचेही नुकसान

अंजनगावसुर्जी तालुक्याला मान्सूनपूर्व पावसाने चांगलेच झोडपले असून, एकाच दिवशी 86 मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या पन्नास वर्षात मे महिन्यात एकाच दिवशी झालेला हा सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी झालेल्या वादळी पावसाने तालुक्यातील साडे चारशे हेक्टरवरील उन्हाळी ज्वारी पिकाला मोठा फटका बसला असून कांदा, केळी, या पिकांचेही मोठे नुकसान झाले.

Web Title: 162 villages affected by heavy rain in amravati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 02:53 PM

Topics:  

  • Amravati News
  • heavy rain update
  • Weather Update

संबंधित बातम्या

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं
1

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं

Satara News : नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य, आवश्यक तेथे तात्काळ स्थलांतरण करा; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
2

Satara News : नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य, आवश्यक तेथे तात्काळ स्थलांतरण करा; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान
3

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान

Weather Update: रस्ते, महामार्ग, रेल्वे, विमानतळ, सर्वत्र पाणीच पाणी, नागरिकांचा खोळंबा, हवामान विभागाचा नवीन अलर्ट काय?
4

Weather Update: रस्ते, महामार्ग, रेल्वे, विमानतळ, सर्वत्र पाणीच पाणी, नागरिकांचा खोळंबा, हवामान विभागाचा नवीन अलर्ट काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.