Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

समृद्धी महामार्गावर अवघ्या 7 महिन्यांत ‘इतक्या’ अपघातांची झाली नोंद; मृतांसह जखमींचा आकडाही आहे जास्त

गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातांच्या संख्येत घट झाल्याचा दावा महामार्ग पोलिसांनी केला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा आणि आर्वी तालुक्यांमधून जातो.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 07, 2025 | 09:02 AM
समृद्धी महामार्गावर ७ महिन्यांत ८४ अपघात

समृद्धी महामार्गावर ७ महिन्यांत ८४ अपघात

Follow Us
Close
Follow Us:

वर्धा : वर्धा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघातांच्या संख्येत नाममात्र घट झाली आहे. असे असले तरी सात महिन्यात ८४ अपघात झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. या अपघातांमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाले आहे. महामार्ग पोलिसांनी केलेल्या उपाययोजना, वाहन मालकांचे समुपदेशन आणि इतर गोष्टींमुळे समृद्धीवरील अपघातांमध्ये घट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत समृद्धी महामार्गावर एकूण ८४ अपघात झाले. यामध्ये मृतांची संख्या ९ आहे. तर १९ जण गंभीर आणि किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातांच्या संख्येत घट झाल्याचा दावा महामार्ग पोलिसांनी केला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा आणि आर्वी तालुक्यांमधून जातो.

महामार्गावर विविध ठिकाणी टोल प्लाझा आणि इंटरचेंजची व्यवस्था करण्यात आली आहे. जिथून चढताना आणि उतरताना प्रत्येक वाहनाची नोंद होते. महामार्गावरून जाताना वाहनांच्या फिटनेसची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अपघात झाल्यास, समृद्धी महामार्गाचे महामार्ग पोलिस आणि बचाव पथके तत्काळ घटनास्थळी पोहोचतात.न

अनेक गोष्टींवर दिला जातोय भर

समृद्धी महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी महामार्ग पोलिसांच्या जाम मदत केंद्राच्या माध्यमातून प्रत्येक टोल नाक्यावरील प्रवेशद्वारावर समुपदेशन केले जाते. प्रवेशद्वारावर वाहनांची तपासणी केली जाते. चालकाने सीट बेल्ट लावला आहे की नाही, चालक मद्यधुंद आहे काय, वाहनांच्या टायर्सची गुणवत्ता, वाहनांची फिटनेस इत्यादीची तपासणी केली जात आहे. या घटनामुळे वाहतूक पोलिसांसमोर नवे आव्हान ठरले आहे.

नाशिकमधील व्यावसायिकाचा झाला होता मृत्यू

समृद्धी महामार्गावर आत्तापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात नाशिकमधील व्यावसायिक सुनील हेकरे यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी आणि दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने सुनील हेकरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी त्यावेळी केला होता.

Web Title: 84 accidents on samruddhi highway in 7 months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 09:02 AM

Topics:  

  • maharashtra news
  • Road Accident

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Update: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली
1

Maharashtra Rain Update: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…
2

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

परभणीच्या येलदरी धरणासाठी पाऊस ठरला फायद्याचा; धरणात तब्बल 95 टक्के जलसाठा
3

परभणीच्या येलदरी धरणासाठी पाऊस ठरला फायद्याचा; धरणात तब्बल 95 टक्के जलसाठा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावे आत्मनिर्भर करावीत : पालकमंत्री जयकुमार गोरे
4

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावे आत्मनिर्भर करावीत : पालकमंत्री जयकुमार गोरे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.