Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विवाहितेने दोन मुलांसह केली आत्महत्या; नेमकं कारण तरी काय?

भिवर्गी (ता. जत, जि. सांगली) येथे विवाहितेने दोन मुलासह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राजाक्का धर्मराय बिरादार (वय २८), मुलगा विष्णू बिराजदार (वय ५), माधुरी बिराजदार (वय २) अशी मृतांची नावे आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 01, 2024 | 01:26 PM
विवाहितेने दोन मुलांसह केली आत्महत्या; नेमकं कारण तरी काय?

विवाहितेने दोन मुलांसह केली आत्महत्या; नेमकं कारण तरी काय?

Follow Us
Close
Follow Us:

जत : भिवर्गी (ता. जत, जि. सांगली) येथे विवाहितेने दोन मुलासह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राजाक्का धर्मराय बिरादार (वय २८), मुलगा विष्णू बिराजदार (वय ५), माधुरी बिराजदार (वय २) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना शनिवारी दुपारी पांडोझरी ओढ्यावरील विहिरीत घडली. शनिवारी रात्री ८ वाजता हा प्रकार उघडकीस आला. उमदी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.

जत पूर्व भागातील भिवर्गी येथे बिळ्यानसिध्द मंदिराच्या पाठीमागे धर्मराय साताप्पा बिरादार हे आई, वडील, पत्नी, मुलासमवेत राहतात. धर्मराय बिराजदार यांचे ७ वर्षांपूर्वी माणिकनाळ (ता. जत) येथील राजाक्का हिच्याशी विवाह झाला. गावात धर्मराय बिराजदार यांचे दूध संकलन केंद्र आहे. एकुलता मुलगा आहे. घरी शनिवारी दुपारी राजाक्का या मुलगा विष्णू, मुलगी माधुरी यांना घेऊन घराबाहेर गेल्या.

दुपारनंतर घरात मुले नसल्याने शोधशोध घेतला. शेजारी, नातेवाईकांकडे चौकशी केली. परंतु सापडले नाहीत. ग्रामस्थांना ओढ्याजवळील सिध्दू करे यांच्या विहिरीशेजारी चप्पल आढळून आली. ग्रामस्थांना आत्महत्या केल्याचा संशय आला. सायंकाळी ६ वाजता पाण्यात कॅमेरा सोडून पाहिले. विहीरीत गाळ असल्याने दिसत नव्हते. कॅमेरा आणखीन तळाला सोडून पाहिले असता मृत राजाक्काचा हात दिसला. त्यामुळे खात्री पटली. पोलिस पाटील श्रीशैल चौगुले यांनी उमदी पोलिस ठाण्यात माहिती दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत.

सांगोल्याची रेस्क्यू टिम पाचारण

सायंकाळी उशिरा जनरेटर लावून पाण्याचा उपसा केला. परंतु पांडोझरी ओढ्याला पाणी असल्याने पाणी निघाले नाही. मृतदेह शोधण्यास अडथळे येत होते. शेवटी सांगोला येथील रेस्क्यू टिमला पाचारण करण्यात आले. रेसक्यू टिमने रविवारी दुपारी एक वाजता मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह उमदी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला.

Web Title: A woman with two children has committed suicide in jat nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2024 | 01:26 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.