
मोठी बातमी ! माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्याकांडातील आरोपी आकाशदीप करज सिंगला सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात जामीन मंजूर झालेला तो पहिला आरोपी आहे. न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने पंजाबमधील रहिवासी सिंगला खटला पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडू नये, असे निर्देश दिले.
१२ ऑक्टोबर २०२४ च्या रात्री वांद्रे पूर्व येथील सिद्दीकी यांचा मुलगा झिशानच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या केली होती. नोव्हेंबर २०२४ मध्ये आरोपी सिंगला अटक करण्यात आली. त्याच्या जामीन अर्जात आरोपीने दावा केला की, त्याला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. त्याच्यावरील आरोप निराधार आणि अस्पष्ट आहेत. त्याच्यावर फक्त संघटित गुन्हेगारी सिंडिकेटचा सदस्य असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्याची कोणतीही महत्त्वाची भूमिका नाही.
दरम्यान, याचिकाकर्त्याच्या वकिलाने असाही युक्तिवाद केला की, या प्रकरणातील खटला नजीकच्या भविष्यात सुरू होणार नाही. खटल्याशिवाय तुरुंगवास त्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करतो. आकाशदीप हा गोळीबार करणाऱ्या आणि बिश्नोई टोळीच्या कटकारस्थानांमध्ये समन्वय साधत होता. मात्र, बचाव पक्षाच्या युक्तिवाद आणि पुराव्यांचा अभाव लक्षात घेता उच्च न्यायालयाने आरोपींना सध्या जामीन देण्याचा निर्णय घेतला आहे.
जानेवारी महिन्यात दाखल केले होते आरोपपत्र
पोलिसांनी यावर्षी जानेवारीमध्ये या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात तुरुंगात बंद असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याचे नाव वॉन्टेड आरोपी म्हणून आहे. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, अनमोल बिश्नोईने गुन्हेगारी टोळीत दहशत आणि वर्चस्व निर्माण करण्यासाठी सिद्दीकीच्या हत्येचा कट रचला होता.
पोलिसांनी 26 जणांना केली अटक
पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात २६ जणांना अटक केली आहे आणि त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) आरोपपत्र दाखल केले आहे. सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
झिशान यांच्या कार्यालयाबाहेर हल्ला
१२ ऑक्टोबर २०२४ च्या रात्री वांद्रे पूर्व येथील सिद्दीकी यांचा मुलगा झिशानच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. याप्रकरणी आतापर्यंत ६ जणांना अटक केली आहे. आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) आरोपपत्र दाखल केले आहे. सर्व आरोपी सध्या कोठडीत आहे.
हेदेखील वाचा : Baba Siddique case: बाबा सिद्दीकी प्रकरणात मोठी अपडेट: मुंबई पोलिसांकडून मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल