Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अल निनोच्या सावटात पीक नियोजन बदला! कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला; पावसाचा खंड पडण्याची शक्यता

यंदाच्या वर्षी राज्यात पावसाचे उशिरा आगमन झाले आहे. तसेच कमी पाऊस पडल्यामुळे शेतीचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पावसाचा अंदाज पाहता आपत्कालीन पीक नियोजनाचा अवलंब करावा, असे आवाहन सोलापूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 13, 2026 | 10:59 AM
अल निनोच्या सावटात पीक नियोजन बदला! कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला; पावसाचा खंड पडण्याची शक्यता

अल निनोच्या सावटात पीक नियोजन बदला! कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला; पावसाचा खंड पडण्याची शक्यता

Follow Us
Follow Us:

यंदाच्या खरीप हंगामावर ‘अल निनो’ च्या प्रभावाचे सावट असून राज्यात पावसाचे आगमन उशिरा होणे, पावसाचे प्रमाण कमी राहणे किंवा पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर पिकांच्या उत्पादनातील संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन आपत्कालीन पीक नियोजनाचा अवलंब करावा, असे आवाहन सोलापूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले.(फोटो सौजन्य – istock)

Raigad News: देवकुंड धबधब्यावर मोठी दुर्घटना; प्रवेशबंदी झुगारून गेलेले दोन पर्यटक पाण्यात बुडाले, शोधमोहीम सुरू

कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार, मान्सूनला विलंब झाल्यास शेतकऱ्यांनी पेरणीचा कालावधी लक्षात घेऊन पीक निवडीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पेरणी करायची असल्यास बाजरी, राळा, राजगिरा, तूर, हुलगा, सूर्यफूल, मटकी आणि सोयाबीन या पिकांना प्राधान्य द्यावे, असे कृषी विभागाने सुचविले आहे. मात्र, या कालावधीत पेरणी करताना मूग आणि उडीद या पिकांची पेरणी टाळावी, असेही कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

सूर्यफूल, हुलगा, एरंडी, बाजरीला प्राधान्य द्या

कमी कालावधीत येणाऱ्या आणि कमी पाण्यावर तग धरणाऱ्या पिकांकडे शेतक-यांनी वळावे, असा सल्ला देण्यात आला आहे. ऑगस्टच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पेरणी करावी लागल्यास सूर्यफूल, हुलगा, एरंडी आणि बाजरी या पिकांची निवड करावी, तर ऑगस्टमध्ये पेरणी करताना मूग, उडीद आणि सोयाबीनची लागवड टाळण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात पावसाची उघडीप; ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

८८ शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता स्थानिक हवामान अंदाज, कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागाच्या शिफारशींनुसारच पीक नियोजन करावे. संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, अशी माहिती शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Adjust crop planning amidst the shadow of el nino agriculture department advises farmers possibility of a dry spell

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • maharashtra
  • Maharashtra Rain Update
  • Rain Update

संबंधित बातम्या

नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांवर सुरा उगारून आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
1

नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांवर सुरा उगारून आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

अहिल्यानगरमध्ये ‘विद्रोही’चे दोन दिवसीय ‘नवसमाजमाध्यम’ शिबिर उत्साहात संपन्न; नवमाध्यमांचा लोकशाहीसाठी प्रभावी वापर करण्याचे आवाहन
2

अहिल्यानगरमध्ये ‘विद्रोही’चे दोन दिवसीय ‘नवसमाजमाध्यम’ शिबिर उत्साहात संपन्न; नवमाध्यमांचा लोकशाहीसाठी प्रभावी वापर करण्याचे आवाहन

मोशी दुर्घटना मानवनिर्मित, आयुक्तांना निलंबित करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; सुषमा अंधारेंची मागणी
3

मोशी दुर्घटना मानवनिर्मित, आयुक्तांना निलंबित करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; सुषमा अंधारेंची मागणी

कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदणीला सुरुवात; ‘या’ तारखेपर्यंत असणार मुदत
4

कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदणीला सुरुवात; ‘या’ तारखेपर्यंत असणार मुदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.