
मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी आज एक महत्त्वाची व दिलासादायक बातमी म्हणजे खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra chwal case) शिवसेना खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) दिलासा मिळाला असून, त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, ईडीने (ED) त्यांच्या जामीनाला विरोध केला होता. प्रत्येक तपास यंत्रणेला उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे. असं म्हणत ईडीने उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती, या प्रकरणी दुपारी तीन वाजता सुनावणी पार पडली असून, विशेष पीएमपीएल कोर्टाने (Court) खासदार संजय राऊत यांना दिलासा दिला आहे. तसेच ईडीला दुहेरी धक्का न्यायालयाने दिला आहे. जामीन स्थगिती देण्याच्या ईडीच्या मागणीला न्यायालयाचा नकार दिला आहे, त्यामुळं राऊतांची लवकरच सुटका होणार आहे. पण यानंतर सुद्धा जामीन दिल्याप्रकरणी तसेच स्थगिती अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला ईडी आव्हान देणार आहे. पण संजय राऊतांची आज सुटका होणार आहे.
[read_also content=”वाघ परत येतोय…आता तुमचा समाचार घेईल, भास्कर जाधवांचा विरोधकांना इशारा https://www.navarashtra.com/maharashtra/now-tiger-is-coming-back-it-will-take-your-notice-bhaskar-jadhav-warning-to-opponents-343035.html”]
काय म्हणाले राऊत?
दरम्यान, संजय राऊतांना 100 दिवसांनी जामीन मंजूर झाल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, माझ्या न्यायदेवतेवर विश्वास आहे. न्यायालयाचे मी आभार मानतो असं जामीन मंजूर झाल्यानंतर संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच मी तुंरुगात राहून कायदेशीर लढाई लढलो. माझ्या न्यायालयावर विश्वास आहे, त्यामुळं एक दिवस मला न्याय मिळेल असं वाटत होतं, आणि तसेच झालं. मला न्याय मिळाला आहे, यामुळं मी आनंदी आहे. मी पुन्हा एकदा न्यायदेवतेचे आभार मानतो असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शिवसैनिकांमध्ये जल्लोष
दरम्यान, आज संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. संजय राऊतांच्या घरी दसरा दिवाळी साजरी करण्यात येत आहे. सर्वंत्र ढोल-तासे वाजवण्यात येत आहेत. तसेच राज्यभरात फटाके वाजून आनंद साजरा केला जात आहे, लाडू व पेढे वाटून आनंद व्यक्त केला जात आहे, राऊत बाहेर येणार असल्यामुळं शिवसेनेचे तोफ पुन्हा एकदा धडाडणार असल्यामुळं ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढला आहे. आज राऊतांना जामीन मंजूर झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, यावर आता ठाकरे गटातून देखील प्रतिक्रिया येत आहेत.