Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: भाजपच्या हातात सत्ता द्या, कोपरगाव पाणी प्रश्न सोडवू! मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

कोपरगाव येथील प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला तुमचा पाणी प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 26, 2025 | 05:20 PM
भाजपच्या हातात सत्ता द्या, कोपरगाव पाणी प्रश्न सोडवू! मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

भाजपच्या हातात सत्ता द्या, कोपरगाव पाणी प्रश्न सोडवू! मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

Follow Us
Close
Follow Us:
  • कोपरगाव येथे भाजपची प्रचार सभा
  • कोपरगाव येथील पाणी प्रहणा सोडवू
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
समाजातील सर्वात शेवटच्या घटकाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी गावांसोबत शहरांचाही समतोल विकास होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अमृत जल योजना’ राबविली. या योजनेसाठी सुमारे ३० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना देशभरातील विविध शहरांमध्ये मंजुरी देण्यात आली असून, त्या शहरांतील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचले आहे.

हा निधी आपल्या शहरापर्यंत आणायचा असेल, तर पारदर्शक आणि उत्तरदायी व्यवस्था उभी करावी लागेल. अशी आदर्श नगरपालिका उभारणे गरजेचे आहे की जिथे निधी वापरणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडे स्पष्ट विकासदृष्टी असेल. ही क्षमता फक्त भारतीय जनता पक्षात आहे, तसेच निधीचा गैरवापर झाल्यास त्यावर कारवाई करण्याची ताकदही या पक्षाकडे आहे. पारदर्शकता राखून, जनतेसाठी मंजूर केलेला निधी प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या आयुष्यात बदल घडवणे, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यामुळे येथील नगराध्यक्ष भाजपाचाच असला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगाव येथील प्रचार सभेत केले.

Nagpur News: नागपूरमध्ये BSNLच्या ७८३ कोटींच्या मालमत्तेची विक्री; पण खरेदीदारच मिळेना

भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांचे उमेदवार पराग संधान यांच्या प्रचारार्थ आंबेडकर मैदानावर ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार विक्रमसिंह पाचपुते, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बिपिन कोल्हे, विवेक कोल्हे तसेच पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते.

आमच्या सरकारच्या योजना बंद पडणार नाहीत

फडणवीस म्हणाले, “माझ्या नजरेला जिथपर्यंत दृश्य दिसत आहे तिथपर्यंत लोकच लोक आहेत. जणू सर्व भाजप मतदार याच सभेत एकत्र आलेत, असे चित्र येथे जाणवत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तीन तास उशीर झाला तरी तुम्ही संयमाने उपस्थित राहिलात, याचा अर्थ तुम्ही भारतीय जनता पक्षाला आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

विरोधक सांगतात की आमच्या सर्व योजना बंद होणार, ‘लाडक्या बहिणी’चे पैसे थांबणार; पण मी स्पष्ट सांगतो,”जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत कोणीही हे पैसे बंद करू शकत नाही. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा आमचा निर्णय कायम आहे. प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपयांच्या मदतीचा निर्णयही तितकाच दृढ आहे.”

Shrikant Shinde : ठाणे-मुंबई प्रमाणे नंदुबारचा चेहरा मोहरा बदलू, श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमची बांधिलकी

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “गावातून अनेक नागरिक रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांसाठी शहरात आले. मात्र, योग्य नियोजनाचा अभाव असल्याने झोपडपट्ट्या, अतिक्रमणे, अस्वच्छता, कचरा समस्या आणि दूषित पाणी असे प्रश्न निर्माण झाले. पर्यावरणीय संतुलन बिघडले. अशा स्थितीत वर्षानुवर्षे शहरांची लोकसंख्या वाढत राहिली आणि समस्या अधिक गंभीर होत गेल्या. त्यामुळे आता शहरी विकासासाठी दीर्घकालीन नियोजन, निधी आणि सक्षम प्रशासन आवश्यक आहे.

Web Title: Ahilyanagar news bjp campaign rally in kopargaon devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 05:20 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • CM Devendra Fadanvis
  • kopargoan

संबंधित बातम्या

Ahilyanagar :धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आक्रमक; कारवाई करण्याची केली मागणी
1

Ahilyanagar :धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आक्रमक; कारवाई करण्याची केली मागणी

Ahilyanagar News: अहिल्यानगर तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा! ‘या’ पोहोचतंय टँकरद्वारे पाणी
2

Ahilyanagar News: अहिल्यानगर तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा! ‘या’ पोहोचतंय टँकरद्वारे पाणी

Ahilyanagar News: साकळाई योजनेला वादाचे ग्रहण! घोड धरण लाभक्षेत्रातील शेतकरी उतरले रस्त्यावर
3

Ahilyanagar News: साकळाई योजनेला वादाचे ग्रहण! घोड धरण लाभक्षेत्रातील शेतकरी उतरले रस्त्यावर

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये रक्ताचा तीव्र तुटवडा; उष्णतेची लाट आणि सुट्ट्यांमुळे रक्तपेढ्या रिकाम्या
4

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये रक्ताचा तीव्र तुटवडा; उष्णतेची लाट आणि सुट्ट्यांमुळे रक्तपेढ्या रिकाम्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.