Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: ‘या’ गावात भोंगा वाजला की 2 तास मोबाइल बंद! विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आदर्श उपक्रम

अहिल्यानगर मधील एका गावाने त्यांच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आदर्श उपक्रम राबवला आहे. रोज गावात भोंगा वाजल्यावर गावकरी 2 तास मोबाईल वापरणं बंद करणार आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 31, 2025 | 03:37 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:
  • अहिल्यानगर मधील गावाचा अनोखा उपक्रम
  • भोंगा वाजताच 2 तास मोबाईल राहणार बंद
  • विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आदर्श उपक्रम

विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असलेल्या सौंदाळे (ता. नेवासे) येथील गावकऱ्यांनी आता दररोज संपूर्ण गावेतील प्रत्येकाचा मोबाईल दोन तास बंद ठेवण्याचा उपक्रम सुरु केला आहे. सायंकाळी सहा वाजता गावांतील सार्वजनिक भोंगा वाजल्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत मोबाईल बंद असतील. सौंदाळे गावकऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील मोहित्यांचे वडगावचा आदर्श घेऊन ग्रामसभेतून हा निर्णय घेतला आहे. सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत गावातील प्रत्येक घरातील मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय घेत आहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळे (ता. नेवासे) गावात ३० ऑक्टोबर रोजी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या विषयावर प्रथम गावांत ग्रामसभा झाली.

मुलांच्या मोबाईल वापराने पालक हैराण

सध्याचा सामाजिक विचार केला तर मोबाईलमध्ये रमून गेलेल्या मुलांना अभ्यासाला बसविणे म्हणजे पालकांसाठी एक मोठे कामच बनले आहे. कोरोनाकाळात जवळपास दोन वर्षे मुलं शाळेतच जाऊ शकली नव्हती. त्यामुळे सगळे काही ऑनलाईन असल्यामुळे गावातील सर्वच मुलांच्या हातात बघेल तेव्हा मोबाईल दिसायचा. शालेय आणि महाविद्यालयीन मुले जणू काही या मोबाईलच्या आहारीच गेली होती. या सवयीमुळे आजही घराघरात पालक मुलांच्या या मोबाईल वेडाने पुरते हैराण झाल्याचे दृश्य पहायला मिळत आहे.

Nashik Simhastha Kumbh Mela 2026: शासनाकडून ७ हजार ४१० कोटी, सिंहस्थासाठी २५ हजार कोटीचा आराखडा; पायाभूत सुविधांवर भर

ग्रामसभेत महिलांनी वेधले लक्ष

या ग्रामसभेत महिलांनी मुलं मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्याने शैक्षणिक गुणवतेबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर सरपंच शरदराव आरगडे यांनी सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत गावातील प्रत्येक घरातील मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यासाठी सायंकाळी ६ वाजले की गावच्या मंदिरावरील स्पीकरवरून भोंगा वाजवण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे गुरुवारपासून (ता. ३०) गावात या उपक्रमाला सुरुवात झाली. लोकनित्युक सरपंच शरदराव आरगडे यांनी सकाळीच स्पीकरवरून ग्रामस्थांना या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली, त्यानंतर सायंकाळी ६ वाजता भोगा वाजताच गावातील सगळे विद्यार्थी अभ्यासाला बसतात.

इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीबाबत जयंत पाटलांची मोठी माहिती, म्हणाले; अध्यक्षपदाचा उमेदवार…

गावचे सरपंच म्हणतात…

सौंदाळेचे सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितले, “मोबाईलमु‌ळे कुटुंबातील सवाद संपल्यासारखा झाला आहे. मुलं मोबाईलमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. पुन्हा कुटूंबातील संवाद कायम व्हावा, मुलांना मोबाईलपासून काही तास तरी दुर ठेवता यावे आणि कौटूबिक आपुलकी वाढावी यासाठी आमच्या गावाने दररोज दोन तास मोबाईल बंद ठेवण्यासाठीचा उपक्रम सुरु केला.”

 

Web Title: Ahilyanagar news saundale village mobile phones are switched off for 2 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 03:36 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • maharashtra news
  • smartphone

संबंधित बातम्या

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी मोठी मदत! २,५४० कोटी ९० लाख ७९ हजार निधी वितरणास शासनाची मान्यता
1

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी मोठी मदत! २,५४० कोटी ९० लाख ७९ हजार निधी वितरणास शासनाची मान्यता

Ahilyanagar : मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे कर्डीले कुटुंबीयांना सांत्वन
2

Ahilyanagar : मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे कर्डीले कुटुंबीयांना सांत्वन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत “मिशन स्वाभिमान”; विशेष कर संकलन करणाऱ्या ग्रामपंचायतीचा विशेष सन्मान
3

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत “मिशन स्वाभिमान”; विशेष कर संकलन करणाऱ्या ग्रामपंचायतीचा विशेष सन्मान

Ahilayangar News: साखर कामगारांसाठी आनंदाची बातमी! 10 टक्क्यांची होणार वेतनवाढ
4

Ahilayangar News: साखर कामगारांसाठी आनंदाची बातमी! 10 टक्क्यांची होणार वेतनवाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.