Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyangar News: 2 तलाव असून देखील ‘या’ गावात पाणी टंचाई, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

अहिल्यानगर मधील पुणतांबे गावाजवळ दोन तलाव असून देखील गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येचा पाठपुरावा लवकरात लवकर व्हावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 17, 2025 | 09:42 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:
  • 2 तलाव असून देखील अहिल्यानगरमधील गावात पाणीटंचाई
  • पुणतांबे गावात पाणीटंचाई
  • पाणी योजनेजवळ कुपनलिका घेण्याचा प्रस्ताव मांडला

पुणतांबे गावाला कालव्याच्या आवर्तनाचा कालावधी वाढल्यामुळे पाणीपुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत. रस्तापूर येथील पर्यायी योजनेवरून पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन न झाल्याने गावकऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गोदावरी उजवा कालवा हा पुणतांबा परिसरासाठी टेल भाग असल्याने गावातील दोन साठवण टाक्यांवर अवलंबून पाणीपुरवठा केला जातो. मात्र वर्षातून काहीवेळा, विशेषतः उन्हाळ्यात, आवर्तनाचा कालावधी वाढत असल्याने पाणीटंचाई ओढवते.

ही समस्या दूर करण्यासाठी सुमारे दहा-पंधरा वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या पुढाकारातून रस्तापूर येथे गोदावरी नदीकिनारी विहीर आणि जलवाहिन्या उभारून पर्यायी योजना तयार करण्यात आली होती. परंतु या पर्यायी योजनेकडे ग्रामपंचायतीकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. सध्या देखील योजनेचा योग्य वापर न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?

कुपनलिका घेण्याची गरज

ग्रामपंचायत सदस्य अनिल नळे, भूषण वाघ, रामचंद्र पवार, सुनील थोरात व इतर सदस्यांनी तातडीच्या उपाययोजनेत म्हणून पाणी योजनेजवळ कुपनलिका घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासन ‘प्रस्ताव पाठवावा लागेल’, ‘खर्चाची मंजुरी घ्यावी लागेल’ अशा कारणांमुळे निर्णयाला टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे.

नदी उशाला, घसा कोरडा

गेल्या चार-पाच महिन्यांपासून गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाल्याने परिसरातील विहिरींच्या पातळीतही मोठी वाढ झाली आहे. तरीही नदीकाठी असलेल्या गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. “नदी उशाला आणि घसा कोरडा” ही म्हण अक्षरशः खरी ठरत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.

‘परीक्षा निकालानंतर ४ दिवसांत नियुक्तीपत्रे द्या; तर जानेवारीपर्यंत…; शासकीय सेवेत सुधारणांसाठी मुख्यमंत्र्यांचे मोठे निर्देश

रस्तापूरच्या पर्यायी योजनेवरून तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी होत आहे. तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा ही योजना कायमस्वरूपी कार्यरत ठेवून भविष्यात टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने ठोस प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Ahilyangar news water problem in puntambe village

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 09:42 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Ahilyangar News: कोपरगावात पॉलिटिकल वादळ! शिवसेनेकडून राजेंद्र झावरे तर उबाठाने दिली सपना मोरे यांना उमेदवारी
1

Ahilyangar News: कोपरगावात पॉलिटिकल वादळ! शिवसेनेकडून राजेंद्र झावरे तर उबाठाने दिली सपना मोरे यांना उमेदवारी

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण
2

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar News: अतिवृष्टी होऊन गेली सुद्धा मात्र शेतकरी मदतीपासून वंचितच! चिंचोडी शिराळ परिसरातील बळीराजा नाराज
3

Ahilyanagar News: अतिवृष्टी होऊन गेली सुद्धा मात्र शेतकरी मदतीपासून वंचितच! चिंचोडी शिराळ परिसरातील बळीराजा नाराज

Ahilyanagar News: गावातील निवडणुकीसाठी ‘या’ निष्ठावंत नेत्याने शिवबंधनाची गाठ सोडलीच! उद्धव ठाकरेंना पाठवला राजीनामा
4

Ahilyanagar News: गावातील निवडणुकीसाठी ‘या’ निष्ठावंत नेत्याने शिवबंधनाची गाठ सोडलीच! उद्धव ठाकरेंना पाठवला राजीनामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.