राज्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायती आणि पाणीपुरवठा विभाग यांच्याकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
माण-खटाव तालुक्यातील तीव्र पाणीटंचाईविरोधात शेतकरी आणि नागरिकांनी ४१ अंश तापमानात आक्रोश मोर्चा काढत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. म्हसवड येथे झालेल्या या आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग दिसून आला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी 10 तासांचा शटडाऊन घेण्यात आला आहे. जाणून घ्या कोणत्या भागात पाणीपुरवठा विस्कळीत होणार आणि प्रशासनाने काय पर्यायी व्यवस्था केली आहे.
Jayakwadi Dam News: जायकवाडी धरणात बाष्पीभवनामुळे दररोज १.९०२ दलघमी पाणी कमी होत आहे. वाढती मागणी आणि उष्णतेमुळे धरणावर तिहेरी ताण निर्माण झाला असून मराठवाड्यासमोर पाणीसंकट उभे राहिले आहे.
शहराची तहान भागवण्यासाठी आंद्रा आणि भामा आसखेड धरणांतून २६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणण्याचे स्वप्न दाखवण्यात आले होते. मात्र, वास्तवात चित्र वेगळेच आहे
पाण्याचा रंग पिवळसर असल्यामुळे ते पिण्यास योग्य आहे की नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
खडकेश्वर आणि गजानन महाराज मंदिरांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने भाविकांचे हाल होत आहेत. वाढत्या उन्हात भाविकांना विकतचे पाणी घ्यावे लागत असून मंदिर प्रशासनाच्या उदासीनतेवर संताप व्यक्त होत आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेची पंपिंग आणि विद्युत यंत्रणेची चाचणी यशस्वी झाली आहे. १६ दशलक्ष लिटर पाण्याचा वापर करून ही तपासणी पूर्ण करण्यात आली असून लवकरच शहराला नियमित पाणी मिळणार…
त्रपती संभाजीनगरमध्ये पाणीपुरवठ्याचा गॅप कमी करण्याचे महापौरांचे आदेश प्रशासनाने धाब्यावर बसवले आहेत. ६ ते १० दिवसांनी होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त. वाचा सविस्तर.
अमरावती जिल्ह्यात १०२ टक्के पाऊस झाला तरीही पाणीटंचाईचे संकट निर्माण झाली. जलसाठ्याचे योग्य नियोजन न झाल्याने आणि भूजल पातळी घटल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे मानले जात आहे.
वाढत्या उन्हामध्ये पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार प्रमुख धरणांमधील पाण्याचे नियोजन अधिक काटेकोरपणे केले जात आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य जलवाहिनी फुटल्याने जुना बाजार, घाटी परिसर आणि मध्यवर्ती भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. गुढीपाडवा आणि ईदच्या काळात नागरिकांचे हाल होत आहेत.
कुचकामी झालेली जलवाहिनी अन् वारंवार होणारा तांत्रिक बिघाड धरणात मुबलक पाणी असूनही उपसा करता येत नाही. उन्हाच्या झळा तीव्र होत असताना टँकरने पाणीपुरवठा करणे देखील महापालिकेला शक्य होत नाही.
छत्रपती संभाजीनगरच्या सातारा-देवळाई परिसरात भीषण पाणीटंचाई. बोअरवेल आटल्याने रहिवाशांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. कंत्राटदारांवर कारवाईची मागणी.
नाशिक शहराला भेडसाविणाऱ्या पाणी प्रश्नावर महासभेत वादळी चर्चा झाली. पण कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही. उलट उन्हाचा चटका वाढू लागल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य देखील मोठ्या प्रमाणावर जाणवू लागले आहे.
गतवर्षी दमदार पावसाळा होऊनही यंदा उन्हाळ्यात जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या तंबीनंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने अखेर दुसऱ्या टप्प्याचा कृती आराखडा सादर केला.