अमरावती जिल्ह्यात १०२ टक्के पाऊस झाला तरीही पाणीटंचाईचे संकट निर्माण झाली. जलसाठ्याचे योग्य नियोजन न झाल्याने आणि भूजल पातळी घटल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे मानले जात आहे.
वाढत्या उन्हामध्ये पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार प्रमुख धरणांमधील पाण्याचे नियोजन अधिक काटेकोरपणे केले जात आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य जलवाहिनी फुटल्याने जुना बाजार, घाटी परिसर आणि मध्यवर्ती भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. गुढीपाडवा आणि ईदच्या काळात नागरिकांचे हाल होत आहेत.
कुचकामी झालेली जलवाहिनी अन् वारंवार होणारा तांत्रिक बिघाड धरणात मुबलक पाणी असूनही उपसा करता येत नाही. उन्हाच्या झळा तीव्र होत असताना टँकरने पाणीपुरवठा करणे देखील महापालिकेला शक्य होत नाही.
छत्रपती संभाजीनगरच्या सातारा-देवळाई परिसरात भीषण पाणीटंचाई. बोअरवेल आटल्याने रहिवाशांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. कंत्राटदारांवर कारवाईची मागणी.
नाशिक शहराला भेडसाविणाऱ्या पाणी प्रश्नावर महासभेत वादळी चर्चा झाली. पण कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही. उलट उन्हाचा चटका वाढू लागल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य देखील मोठ्या प्रमाणावर जाणवू लागले आहे.
गतवर्षी दमदार पावसाळा होऊनही यंदा उन्हाळ्यात जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या तंबीनंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने अखेर दुसऱ्या टप्प्याचा कृती आराखडा सादर केला.
उन्हाळ्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाचा मास्टर प्लॅन तयार आहे. ३ टप्प्यांत कृती आराखडा लागू केला जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित पाणीपुरवठा होईल, यासाठीही विशेष तरतूद करण्यात आली.
केंद्र व राज्य शासनाने प्रत्येकी ९६.५० लाख रुपये असा एकूण १.९३ कोटींचा निधी मंजूर करून खर्चही दर्शविण्यात आला. मात्र, नवीन पाईपलाईन टाकल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील पाणीपुरवठा यंत्रणा जायकवाडी येथील वीज बिघाडामुळे कोलमडली आहे. पाण्याचे वेळापत्रक २ दिवसांनी पुढे ढकलण्यात आले असून, स्थिती पूर्ववत होण्यासाठी १५ दिवस लागतील.
येवला तालुक्यातील पालखेड कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पाण्याची तीव्र गरज निर्माण झाली होती.यासाठी आमदार दराडे, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.
जायकवाडी पंपगृहात केबल जळाल्याने आणि ढोरकीनला मुख्य पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा २ दिवस लांबणीवर पडला आहे. सिडको-हडकोसह अनेक भागांत पाणीटंचाई निर्माण झाली असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
इंदूरमध्ये दुषित पाण्याच्या प्रकरणामध्ये तब्बल 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे सर्वात स्वच्छ मानल्या जाणाऱ्या इंदूर शहराचे वास्तव समोर आले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीबाणी! फारोळा जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा १० तास बंद राहिला. मुबलक पाणी असूनही नागरिकांना ८ दिवस पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
अहिल्यानगर मधील पुणतांबे गावाजवळ दोन तलाव असून देखील गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येचा पाठपुरावा लवकरात लवकर व्हावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
भारतात अनेक ठिकाणी पाण्याचा अवास्तव वापर केला जातो. आजही पाण्याचे महत्त्व अनेक ठिकाणी समजून न घेतल्यामुळे लवकरच भूजल संकट येणार आहे आणि याबाबत अधिक माहिती तज्ज्ञांनी दिली आहे
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार रद्द केल्याने पाकिस्तानवर जलसंकट येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानची पाणी साठवण्याची क्षमता कमी असून 80% शेती सिंधू नदीवर अवलंबून आहे. भारताच्या या निर्णयामुळे पाक अडचणीत…