Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आदित्य ठाकरेंच्या फायद्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने आघाडी तोडली’; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

लोकसभेत आघाडीला चांगले यश मिळाले. मात्र, विधानसभेत महाविकास आघाडीचे पानिपत झाले. आता महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या शिवसेना ठाकरे पक्ष स्वबळावर लढणार आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 13, 2025 | 01:04 PM
आदित्यच्या फायद्यासाठी आघाडी तोडली

आदित्यच्या फायद्यासाठी आघाडी तोडली

Follow Us
Follow Us:

अकोला : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी हातमिळवणी करत महाविकास आघाडीची स्थापन केली होती. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेने ‘एकला चलो रे…’ची भूमिका स्वीकारली आहे. असे असताना आता आदित्य ठाकरेंच्या फायद्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने आघाडी तोडली, असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.

हेदेखील वाचा : बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यामधील असणारे मतभेद आता दूर होणार? बच्चू कडूंचं ‘ते’ विधान चर्चेत

आगामी महापालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वबळावर लढवणार असल्याचे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले आहे. त्यावर आता विविध पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आता महाविकास आघाडी तोडण्याचा निर्णय हा आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेण्यात आल्याचे म्हटले आहे.

आंबेडकर यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. मात्र, आदित्य ठाकरेंचा नेमका वैयक्तिक फायदा काय हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. संजय राऊत यांच्या स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर आघाडीचे अस्तित्व आता किती राहणार यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकसभा, विधानसभा आघाडीने लढल्या एकत्र

लोकसभा, विधानसभा आघाडीने एकत्र लढल्या होत्या. लोकसभेत आघाडीला चांगले यश मिळाले. मात्र, विधानसभेत महाविकास आघाडीचे पानिपत झाले. आता महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या शिवसेना ठाकरे पक्ष स्वबळावर लढणार आहे. महाविकास आघाडी तोडण्याचा निर्णय हा आदित्य ठाकरेंच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेण्यात आल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

आता तर आघाडीचा पार इस्कोट

किमान मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकत्र येईल, अशी आशा होती. तीन प्रमुख पक्षांव्यतिरिक्त समाजवादी पार्टी आदी मित्रपक्षांनाही सोबत घेऊन ही निवडणूक लढता येईल, असे काही नेत्यांना वाटत होते. मात्र, विधानसभेनंतर आघाडीत फटाके फुटायला सुरुवात झाली. आता तर आघाडीचा पार इस्कोट झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

आम्ही त्यांना थांबवणारे कोण? : जितेंद्र आव्हाड

आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही याप्रकरणी ठाकरे गटावर अप्रत्यक्षपणे निशाण साधला आहे. ठाकरे गटाचे स्वबळावर जाण्याची इच्छा असेल तर त्यांना आम्ही थांबवणारे कोण? पण विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीने एकजूट राहण्याची गरज होती, असे मला वाटते.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics : या महिन्यात वाजणार महापालिका निवडणुकांचं बिगुल? कामाला लागण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

Web Title: Prakash ambedkar criticized on aaditya thackeray nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2025 | 01:04 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Adv Prakash Ambedkar

संबंधित बातम्या

‘सचिन अहिर गेल्याने कसला धक्का?’; ठाकरेंचे नेते सुनील प्रभुंचा सवाल, सुनील शिंदेंचाही घणाघात
1

‘सचिन अहिर गेल्याने कसला धक्का?’; ठाकरेंचे नेते सुनील प्रभुंचा सवाल, सुनील शिंदेंचाही घणाघात

‘सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक’; शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिर यांची पहिली प्रतिक्रिया, ठाकरे गटावर केला पलटवार
2

‘सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक’; शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिर यांची पहिली प्रतिक्रिया, ठाकरे गटावर केला पलटवार

Aaditya Thackeray : ‘आता सचिन अहिरांच्या रोज आरत्या करू का?’ आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल; पक्षांतरावर पहिली प्रतिक्रिया
3

Aaditya Thackeray : ‘आता सचिन अहिरांच्या रोज आरत्या करू का?’ आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल; पक्षांतरावर पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Politics : ‘आज सहा खासदार गेले, उद्या १२ जातील’; उबाठाला आणखी धक्क्याचा किरण पावसकरांचा दावा
4

Maharashtra Politics : ‘आज सहा खासदार गेले, उद्या १२ जातील’; उबाठाला आणखी धक्क्याचा किरण पावसकरांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.