
महापालिका निवडणूक ऐतिहासिक वळणावर! १९ माजी नगरसेवक मैदानात; पक्षांना बंडखोरीचा फटका (फोटो सौजन्य-X)
अनेक टर्म्समध्ये नगरसेवक व महापौरपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या इंगोले यांचा अनुभव यंदाही काँग्रेससाठी महत्त्वाचा मानला जात आहे. ते जवाहरगेट बुधवारा प्रभाग क्रमांक-१४ मधून पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. इतिहासाकडे पाहता, भाजपच्या कुसुम साहू व चेतन पवार यांनी प्रत्येकी पाच वेळा, तर प्रदीप बाजड यांनी सुमारे चार वेळा विजय मिळवला आहे. प्रकाश बनसोड यांनीही तितक्याच वेळा सभागृह गाठले. बाळू भुयार, रतन डेंडुले, मिलींद बांबल, राधा कुरील, प्रमोद पांडे व सुनंदा खरड हे नगरसेवक दोन किंवा त्याहून अधिक वेळा निवडून आले आहेत.आहेत असे नाही. काहींनी निवडणुकीपासून अलिप्त राहणे पसंत केले, तर काहींनी पक्षबदल किंवा बंडखोरीचा मार्ग स्वीकारला आहे. यंदाच्या निवडणुकीतील सर्वांत मोठा धक्का म्हणजे दोन्ही प्रमुख पक्षांना भाजप व काँग्रेस पक्षांतर्गत बंडखोरीचा सामना करावा लागत आहे.
माजी नगरसेवकांपैकी किमान ८ ते १० जण यंदा पक्षविरोधात किंवा अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोरी; नाकारलेल्या उमेदवारी माजी नगरसेवकांचा रोष आहे. काँग्रेसलाही अंतर्गत नाराजीचा फटका बसला आहे.
काही ठिकाणी थेट बंड बंडखोरी पुकारले आहे. काही माजी नगरसेवकांनी निवडणूक न लढवता राजकीय विश्रांती स्वीकारली आहे. बंडखोर उमेदवारांमुळे दोन्ही प्रमुख पक्षांच्या अधिकृत उमेदवारांचे गणित बिघडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पारंपरिक मतपेढ्या तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १९९२ मध्ये पहिली महापालिका अस्तित्वात आल्यानंतर आजवर राजकीय स्थित्यंतरे झाली, महापौरांचा कार्यकाळ एक वर्षावरून अडीच वर्षांचा करण्यात आला. १६ जानेवारीला सतराव्या महापौराची निवड होणार आहे. त्यासाठी सत्तासमीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. एकूणच, अनुभवी माजी नगरसेवक विरुद्ध नाराज बंडखोर, पक्षनिष्ठा विरुद्ध व्यक्तिगत ताकद आणि जुने चेहरे विरुद्ध नवे प्रयोग या त्रिसूत्रीवर यंदाची महानगरपालिका निवडणूक लढवली जाणार आहे. अमरावतीच्या राजकीय इतिहासात हा संघर्ष नवा अध्याय लिहिणार.