
"AI च्या बाता करणाऱ्या सरकारला...", मेळघाटातील समस्यांवरून यशोमती ठाकूर यांची टीका
अमरावती जिल्हा (ग्रामीण) काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, धारणी तालुका काँग्रेस कमिटी, माजी मंत्री यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखेडे, अमरावती जिल्हा युवक काँग्रेस होळी सणानिमित्त मेळघाट दौरा मंगळवार (दि.३) आणि बुधवार (दि.४) दोन दिवसीय दौरा झाला. यावेळी माजी मंत्री बळवंत वानखेडे, खासदार बळवंत वानखेडे, यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मेळघाटातील विविध गावांना भेटी देत आदिवासी बांधवांशी संवाद साधला.
मोथा, ता. चिखलदरा मेळघाट येथे माजी पालक मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मनरेगाच्या विषयावरून सरकारवर टीका केली. केंद्रातील मोदी सरकारने MREGS चा कायदा बदलला मनरेगाला आता ते जी राम जी म्हणतात. जर ते रामजी म्हणतात, तर शेवटच्या नारायणापर्यंत धनलक्ष्मी पोहचली पाहिजे. पण गरिबांच्या डोळ्यात अश्रु आहेत. तीन तीन महिने मनरेगा कामगारांना त्यांचे हक्काचे पैसे मिळाले नाहीत. होळीच्या तोंडावर १५०० रुपये सरकारने जमा केले आणि उर्वरीत रक्कम थांबवली आहे. तसेच काही लाडक्या बहिणींचे पैसे आलेले नाहीत. मनरेगाचा कायदा बदलून या गरीब जनतेवर सरकारने खूप मोठा हातोडा मारला आहे. जीथे ३०० दिवस काम मिळत होते. तीथे १२५ दिवस काम मिळणार आणि तेही एका मस्टरवर आम्ही केंद्र सरकारचा निषेध करतो. आणि सरकारचे दुर्लक्ष आहे.
यशोमती ठाकूर म्हणाल्या, चिखलदरा ग्रामीण रुग्णालय येथे दिली असता येथे डॉक्टर गायब आहे. वैद्यकीय अधिकारी माने आहेत ते आठ ते १५ दिवसांपासून आलेले नाहीत. त्यांना जाब विचारला असता आमचे ट्रेनिंग होते असे थातूरमातूर उत्तर दिले. मेळघाटात सिकलसेल मोठ्या प्रमाणात आहे. पण सिकलसेलची औषधे आणि उपचाराची व्यवस्था नाही. इथे गरोदरमाता, कुपोषित बालकांसाठी आरोग्य विभागाची जी वाहने आहेत, त्या वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी देखील पैसे नाहीत. रुग्णांच्या बेडवरील चादरा आठ आठ दिवस बललल्या जात नाहीत, अशा तक्रारी येथे आहेत. येथे कोणाचा धाक नाही, मेळघाटमध्ये सरकारचे पूर्ण दुर्लक्ष होत आहे, अशी टिका ठाकूर यांनी केली.
मेळघाटातील हरीसाल गाव डिजीटल व्हिलेज केले असे सरकार म्हणते, पण काल तिथे आम्ही भेट दिली असता तिथे मोबाईलला देखील रेंज नव्हती. सरकार आज AI च्या गोष्टी करत आहे. इथे येऊन पहा मेळघाटात काय परिस्थिती आहे, असा टोला यशोमती ठाकूर यांनी सरकारला लगावला.
मी पालकमंत्री असताना ‘मेळघाट हाट’ म्हणून एक कार्यक्रम सुरु केला होता. परंतू आज मेळघाटातील बचत गटांचे व्यापारीकरण करुन व्यापाऱ्यांच्या हातात दिला आहे. सगळीकडे दुर्लक्ष केले आहे. इथे मंत्री येऊन जातात पण मेळघाटात सरकारचे पुर्ण दुर्लक्ष आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.