Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yashomati Thakur : “AI च्या बाता करणाऱ्या सरकारला…”, मेळघाटातील समस्यांवरून यशोमती ठाकूर यांची टीका

मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ज्या हरीसाल गावाचा सरकारने डीजिटल व्हिलेज म्हणून गाजावाजा केला तिथे साधी फोन ला रेंज येत नाही अशी परिस्थिती आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 05, 2026 | 03:06 PM
"AI च्या बाता करणाऱ्या सरकारला...", मेळघाटातील समस्यांवरून यशोमती ठाकूर यांची टीका

"AI च्या बाता करणाऱ्या सरकारला...", मेळघाटातील समस्यांवरून यशोमती ठाकूर यांची टीका

Follow Us
Close
Follow Us:
  • आदिवासींचे मनरेगाचे हक्काचे पैसे सरकारने थकवले
  • मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा
  • माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची टीका
अमरावती : महायुती सरकारचे मेळघाटकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. मेळघाटात होळीचा सण आदिवासींचा महत्वाचा सन असतो परंतू सणाच्या तोंडावर आदिवासी बांधवांचे मनरेगाच्या रोजगाराचे हक्काचे पैसे सरकारने थकविले आहेत. मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ज्या हरीसाल गावाचा सरकारने डीजिटल व्हिलेज म्हणून गाजावाजा केला तिथे साधी फोन ला रेंज येत नाही अशी परिस्थिती आहे. AI च्या बाता करणाऱ्या भाजप महायुती सरकारला मेळघाटातील समस्या सोडवता येत नसल्याची टीका काँग्रेस नेत्या, माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली.

अमरावती जिल्हा (ग्रामीण) काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, धारणी तालुका काँग्रेस कमिटी, माजी मंत्री यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखेडे, अमरावती जिल्हा युवक काँग्रेस होळी सणानिमित्त मेळघाट दौरा मंगळवार (दि.३) आणि बुधवार (दि.४) दोन दिवसीय दौरा झाला. यावेळी माजी मंत्री बळवंत वानखेडे, खासदार बळवंत वानखेडे, यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मेळघाटातील विविध गावांना भेटी देत आदिवासी बांधवांशी संवाद साधला.

Amravati News : जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट, जानेवारी ते जूनदरम्यान 706 गावांना फटका

मोथा, ता. चिखलदरा मेळघाट येथे माजी पालक मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मनरेगाच्या विषयावरून सरकारवर टीका केली. केंद्रातील मोदी सरकारने MREGS चा कायदा बदलला मनरेगाला आता ते जी राम जी म्हणतात. जर ते रामजी म्हणतात, तर शेवटच्या नारायणापर्यंत धनलक्ष्मी पोहचली पाहिजे. पण गरिबांच्या डोळ्यात अश्रु आहेत. तीन तीन महिने मनरेगा कामगारांना त्यांचे हक्काचे पैसे मिळाले नाहीत. होळीच्या तोंडावर १५०० रुपये सरकारने जमा केले आणि उर्वरीत रक्कम थांबवली आहे. तसेच काही लाडक्या बहिणींचे पैसे आलेले नाहीत. मनरेगाचा कायदा बदलून या गरीब जनतेवर सरकारने खूप मोठा हातोडा मारला आहे. जीथे ३०० दिवस काम मिळत होते. तीथे १२५ दिवस काम मिळणार आणि तेही एका मस्टरवर आम्ही केंद्र सरकारचा निषेध करतो. आणि सरकारचे दुर्लक्ष आहे.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, चिखलदरा ग्रामीण रुग्णालय येथे दिली असता येथे डॉक्टर गायब आहे. वैद्यकीय अधिकारी माने आहेत ते आठ ते १५ दिवसांपासून आलेले नाहीत. त्यांना जाब विचारला असता आमचे ट्रेनिंग होते असे थातूरमातूर उत्तर दिले. मेळघाटात सिकलसेल मोठ्या प्रमाणात आहे. पण सिकलसेलची औषधे आणि उपचाराची व्यवस्था नाही. इथे गरोदरमाता, कुपोषित बालकांसाठी आरोग्य विभागाची जी वाहने आहेत, त्या वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी देखील पैसे नाहीत. रुग्णांच्या बेडवरील चादरा आठ आठ दिवस बललल्या जात नाहीत, अशा तक्रारी येथे आहेत. येथे कोणाचा धाक नाही, मेळघाटमध्ये सरकारचे पूर्ण दुर्लक्ष होत आहे, अशी टिका ठाकूर यांनी केली.

डीजिटल हरीसाल गावात फोनला रेंज नाही !

मेळघाटातील हरीसाल गाव डिजीटल व्हिलेज केले असे सरकार म्हणते, पण काल तिथे आम्ही भेट दिली असता तिथे मोबाईलला देखील रेंज नव्हती. सरकार आज AI च्या गोष्टी करत आहे. इथे येऊन पहा मेळघाटात काय परिस्थिती आहे, असा टोला यशोमती ठाकूर यांनी सरकारला लगावला.

मेळघाटातील बचत गट व्यापाऱ्यांच्या हातात !

मी पालकमंत्री असताना ‘मेळघाट हाट’ म्हणून एक कार्यक्रम सुरु केला होता. परंतू आज मेळघाटातील बचत गटांचे व्यापारीकरण करुन व्यापाऱ्यांच्या हातात दिला आहे. सगळीकडे दुर्लक्ष केले आहे. इथे मंत्री येऊन जातात पण मेळघाटात सरकारचे पुर्ण दुर्लक्ष आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

Amravati News : मुंबई विमानसेवा आठवड्यातून ५ दिवस! अमरावतीत प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर विस्ताराचा निर्णय

Web Title: The state of healthcare in melghat under scrutiny former minister yashomati thakur criticism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • Amaravati
  • Yashomati Thakur

संबंधित बातम्या

Amravati News : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा आक्षेप;१०-१२ वी परीक्षेसाठी शिक्षकांची नेमणूक नको
1

Amravati News : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा आक्षेप;१०-१२ वी परीक्षेसाठी शिक्षकांची नेमणूक नको

Amravati News : जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट, जानेवारी ते जूनदरम्यान 706 गावांना फटका
2

Amravati News : जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट, जानेवारी ते जूनदरम्यान 706 गावांना फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.