Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केवळ 8 महिन्यात तब्बल 102 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या; नापिकी, आर्थिक संकट ठरलं मुख्य कारण

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने कर्जमाफी, विविध पॅकेज, कृषीविषयक योजना आणि आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी विशेष प्रकल्प राबविले. मात्र, या योजनांचा लाभ प्रत्यक्ष गरजू शेतकऱ्यांपर्यंत कितपत पोहोचतो, हा प्रश्न कायम आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 08, 2026 | 12:02 PM
केवळ 8 महिन्यात तब्बल 102 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या; नापिकी, आर्थिक संकट ठरलं मुख्य कारण

केवळ 8 महिन्यात तब्बल 102 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या; नापिकी, आर्थिक संकट ठरलं मुख्य कारण

Follow Us
Follow Us:

अमरावती : आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध योजना, कर्जमाफी आणि विशेष पॅकेजच्या माध्यमातून मदतीचा हात दिला जात असल्याचा दावा केला जात असला, तरी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. नापिकी, आर्थिक संकट आणि विविध समस्यांच्या दुष्टचक्रात अडकलेल्या 102 शेतकऱ्यांनी यंदा जानेवारी ते ऑगस्ट या अवघ्या आठ महिन्यांत आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या प्रभावी उपाययोजनांच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्यात कोणत्याही राजकीय पक्षाचे सरकार असो, शेतकरी आत्महत्यांचा गंभीर प्रश्न अद्यापही कायम आहे. केवळ कर्जबाजारीपणामुळेच शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत नाही, तर नापिकी, शेतीतील वाढता खर्च, उत्पन्नातील अनिश्चितता आणि अन्य आर्थिक-सामाजिक कारणांचाही त्याच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आत्महत्या रोखण्यासाठी केवळ कर्जमाफी किंवा आर्थिक मदतीपुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.

48 प्रकरणे अजूनही चौकशीच्या फेऱ्यात

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, यंदा जानेवारी ऑगस्टदरम्यान झालेल्या १०२ शेतकरी ते आत्महत्यांपैकी ३७ प्रकरणे शासनाच्या निकषानुसार पात्र ठरली आहेत. तर १९ प्रकरणे अपात्र ठरवण्यात आली आहेत. तब्बल ४६ प्रकरणे अद्याप चौकशीसाठी प्रलंबित असून, आणखी दोन प्रकरणे फेरचौकशीसाठी प्रलंबित आहेत. त्यामुळे ४८ कुटुंबांना अद्यापही शासकीय मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

कर्जमाफी, पॅकेज अन् योजना; तरी शेतकऱ्यांच्या अडचणी कायम

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने कर्जमाफी, विविध पॅकेज, कृषीविषयक योजना आणि आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी विशेष प्रकल्प राबविले. मात्र, या योजनांचा लाभ प्रत्यक्ष गरजू शेतकऱ्यांपर्यंत कितपत पोहोचतो, हा प्रश्न कायम आहे. महा-डीबीटीच्या माध्यमातून कृषी विभागाच्या योजनांचा लाभमिळविताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, विविध योजनांची गुंतागुंतीची प्रक्रिया आणि प्रशासनातील विलंब यामुळे अनेक गरजू शेतकरी लाभापासून वंचित राहिल्याची टीका होत आहे.

शेतकरी आत्महत्यांना आळा घालण्यात उपाययोजना निष्प्रभ?

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी राबविण्यात आलेले विविध प्रकल्प, कर्जमाफी आणि शेतकरी मिशन यांसारख्या उपाययोजनांनंतरही आत्महत्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या विद्यमान धोरणांचा फेरआढावा घेऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याची आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याने बदलणार नाशिकचा वाहतूक नकाशा; ६५.६ किमी रिंग रोडसह १४३५ किमी रस्त्यांचा महाप्रकल्प

Web Title: As many as 102 farmers committed suicide in just eight months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • Farmer Suicide
  • Farmers Issue
  • maharashtra farmers

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.