Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जव्हार-मोखाडा तालुक्यात अटल बांबू योजनेला घरघर; १५२ शेतकरी अद्यापही अनुदानापासून वंचित

जव्हार-मोखाडा तालुक्यातील १५२ शेतकरी अटल बांबू समृद्धी योजनेच्या अनुदानापासून दोन वर्षांपासून वंचित आहेत. शेतकऱ्यांनी सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप मदतीचा लाभ मिळालेला नाही.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 17, 2025 | 05:25 PM
जव्हार-मोखाडा तालुक्यात अटल बांबू योजनेला घरघर; १५२ शेतकरी अद्यापही अनुदानापासून वंचित
Follow Us
Close
Follow Us:

दीपक गायकवाड, मोखाडा: कोविडसारख्या संसर्गजन्य आजारांमुळे भविष्यात प्राणवायूची गरज वाढू शकते, हे लक्षात घेऊन ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये १ कोटी बांबू रोपांची लागवड करण्याचे संकल्प करण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे ४,३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी जनजागृतीसाठी मेळावेही घेण्यात आले. मात्र याच योजनेतून लाभ घेणाऱ्या जव्हार व मोखाडा तालुक्यातील १५२ शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून एकही रुपया अनुदान मिळालेला नाही.

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत झाला सुरु; बळीराजाला मिळाला दिलासा

सन २०२४ मध्ये या दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांनी लागवड केली. ऑगस्ट २०२४ मध्ये लागवड पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये मूल्यांकन करण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांना लागवडीचे किंवा देखभालीचे अनुदान मिळालेले नाही. दर शेतकरी १,२०० रोपे लावून त्या देखभालीसाठी प्रथम वर्षी ९० रुपये, द्वितीय वर्षी ५० रुपये आणि तृतीय वर्षी ३५ रुपये अशा दराने प्रति रोप सुमारे ३५० रुपये मिळण्याचे ठरले आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला अंदाजे ₹४.२० लाख अनुदान देणे अपेक्षित आहे. मात्र यापैकी एकही हप्ता अद्याप खात्यावर जमा झालेला नाही. यामुळे रोपांची निगा राखणं आणि शेतीचा इतर खर्च करणे शेतकऱ्यांसाठी मोठं आव्हान बनलं आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला जात आहे. परंतु त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. सरकारने अर्थसंकल्पात बांबू आधारित उद्योगांसाठी ४३०० कोटी रुपयांची तरतूद आणि ७.०४ लाख रुपये प्रति हेक्टर अनुदान जाहीर केले आहे. पण अटल योजनेतील लाभार्थ्यांना केवळ ₹४.२० लाखच अनुदान मिळणार आहे, यामुळे ही योजना दुय्यम ठरत असल्याची भावना निर्माण झाली आहे. “आम्हालाच सापत्न वागणूक का?” असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

KDMC News : ‘त्या’ 27 गावांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर! संघर्ष समितीने घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट

यासंदर्भात संपर्क साधला असता, नागपूर येथील अटल बांबू समृद्धी योजना विभागाचे सचिव राजेंद्र शेळके यांनी सांगितले की, “बांबू लागवड उशिरा झाल्यामुळे ई-मूल्यांकन प्रक्रिया उशिरा पार पडली. मात्र येत्या दोन ते तीन महिन्यांत प्रथम वर्षाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.”

Web Title: Atal bamboo scheme faces hurdles in jawhar mokhada taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 05:10 PM

Topics:  

  • Palghar news

संबंधित बातम्या

Palghar News: मोखाड्यात आयशर ट्रकचा भीषण अपघात! मजुरीसाठी गेलेल्या एकाच मृत्यू 40 हून अधिक जखमी
1

Palghar News: मोखाड्यात आयशर ट्रकचा भीषण अपघात! मजुरीसाठी गेलेल्या एकाच मृत्यू 40 हून अधिक जखमी

Juchandra College: व्यसनमुक्तीसाठी जूचंद्र कॉलेजच्या युवकांचा निर्धार! अंमली पदार्थविरोधी घेण्यात आली शपथ
2

Juchandra College: व्यसनमुक्तीसाठी जूचंद्र कॉलेजच्या युवकांचा निर्धार! अंमली पदार्थविरोधी घेण्यात आली शपथ

Palghar Election : विकास झालाच नाही, नुसते काँक्रिटचे जंगल, पालघर काँग्रेस उमेदवार प्रीतम राऊत
3

Palghar Election : विकास झालाच नाही, नुसते काँक्रिटचे जंगल, पालघर काँग्रेस उमेदवार प्रीतम राऊत

खराब रस्त्यामुळे पालघर – छ. संभाजीनगर बसचा अपघात, 3 गंभीर तर 20 हून अधिक किरकोळ जखमी
4

खराब रस्त्यामुळे पालघर – छ. संभाजीनगर बसचा अपघात, 3 गंभीर तर 20 हून अधिक किरकोळ जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.