
Bachchu Kadu's 250-kilometer Sangharsha Yatra in Melghat for farmer loan waiver
माजी मंत्री बच्चू कडू यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या निषेध मोर्चाची घोषणा केली. या सोशल मीडिया पोस्टनुसार, ही संघर्ष यात्रा १ मार्चपासून ९ मार्चपर्यंत चालेल. याची सुरुवात सेमाडोह येथून सुरू होईल आणि चिखलदरा येथे संपेल. ९ मार्च रोजी, या पदयात्रेचा उद्देश महाराष्ट्र सरकारला कर्जमाफीच्या आश्वासनांची आठवण करून देणे आणि विकासापासून दूर असलेल्या मेळघाटमधील आदिवासींना न्याय मिळवून देणे आहे अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे.
हे देखील वाचा : राज्यसभा खासदारकीवरुन महाविकास आघाडीमध्ये वादंग? शरद पवार की उद्धव ठाकरे कोणाला मिळणार संधी?
बच्चू कडू यांची संघर्षयात्रा ही चिखलदरा, सलोना, काटकुंभ, खडीमल, जारिदा, हतरु, रायपूर, सेमाडोह या मार्गावरुन जाणार आहे. मेळघाट आणि दुर्गम भाग हा आजही प्रमुख प्रवाहापासून वेगळा आहे. अनेक विकासयोजना आणि सुविधांपासून वंचित आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे कर्ज, आरोग्य सुविधा, शिक्षणाचा अभाव आणि वीज, पाणी, रस्ते अशा सुविधा नसल्याने बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेत संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्जमुक्तीची आठवण व मेळघाट संघर्ष यात्रा… pic.twitter.com/EPAPEttr8Y — BACCHU KADU (@RealBacchuKadu) February 15, 2026
हे देखील वाचा : ‘ब्लॅक बॉक्स’मधील गुपिते उघड होणार? DFDR डेटा यशस्वीपणे डाउनलोड
संघर्ष यात्रेबाबत बच्चू कडू म्हणाले की, “राज्य सरकार कर्जमुक्तीसाठी कामाला लागल्याचे समजत आहे ही आनंदाची बाब आहे. मात्र कर्जमुक्तीसाठी 30 जूनपर्यंत आम्ही वाट पाहू नाहीतर महाराष्ट्रात रेल्वेचे एकही चाक धावू देणार नाही. गट सचिवांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सर्व कागदपत्रे आम्ही सरकारकडे दिली मात्र सरकार कर्जमुक्ती करणार असून ही कर्जमुक्ती चालू वर्षाची असेल का याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे, चालू वर्षातील 2025-26 मध्ये कर्जमाफी मिळणे आवश्यक आहे. गांधींच्या मार्गाने आमची ही संघर्षयात्रा असेल मात्र आम्ही भगतसिंगाच्या मार्गानेही आम्ही जाऊ शकतो,” असा इशारा प्रहार नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.