
बदलापूर ग्रामीणमध्ये पोतदार समृद्धी एव्हर ग्रीन या इमारत संकुलात अनेक इमारती आहेत. या इमारतीमधील घर मालक आज हवालदिल झाले. एका खाजगी बँकेकडून इमारतीमधील काही रहिवाशांच्या घरी नोटिस लावण्यात आली. या आधी देखील बँकेची माणसं घर मालकांना भेटून गेले. आज देखील ते आले. नोटिस लावण्यास पुन्हा सुरुवात केली. तुम्हाला लवकरात लवकर घरे खाली करावी लागतील असा इशारा घर मालकांना दिला. हे ऐकताच रहिवासी हवालदिल झाले . याबाबत रहिवासी जवाहर सांगळे यांनी सांगितले की, आयुष्यभराची तुटपुंजी जमा करुन घर विकत घेतलं. सर्व प्रक्रिया केली. लोन सुरु आहे. आत्ता आम्हाला बँक वाले आम्हाला घरे खाली करण्यास सांगत आहे. बिल्डर आणि बँकेचे काय आहे. ते आम्हाला माहित नाहीत. त्या आमचा काय दोष ? आम्हाला न्याय हवा आहे.
इमारतीतील रहिवासी विभा राऊत यांनी सांगितले की, आम्ही घर घेतले आहे. आमची सरकारला इतकीच विनंती आहे. आम्ही जे पैसे कमावितो. त्यातूनच घर घेतले. कर्जाचे हफ्ते भरतो. आत्ता नव्याने कुठून पैसे आणायचे.रहिवासी सोफिया मलबारआला यांचे म्हणणे आहे की, आम्ही जेव्हा घर घेतले. तेव्हा घर तयार झाले नव्हते. बिल्डरने आम्हाला दुसरे घर घेतले. त्याचे पैसे रोख आणि धनादेशाच्या स्वरुपात दिले. 24 लाख रुपये दिले. पैसे भरुन देखील आमच्या घराला सील लावले जात आहे. हा कुठला न्याय आहे. बिल्डर आणि ब’केच्या भानगडीत आम्हाला का भरडले जात आहे. विष्णू शीरसागर यांनी सांगितले की, 2022 मध्ये घर बुक केले. घराचे हप्ते भरुन देखील आमच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. हा कुठला न्याय. सरकारने आमची दखल घ्यावी असं या रहिवाशांचं म्हणणं आहे.