Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News: ‘खंडपीठ आमच्या हक्काचं,नाही कुणाच्या बापाचं! कोल्हापुरात खंडपीठ करण्याच्या मागणीसाठी वकीलांची महारॅली

खंडपीठासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा कोल्हापुरात चांगल्या आहेत. सध्या विमानसेवा उत्तम सुरु असून भौगोलिक दृष्ट्या कोल्हापूर सगळ्यांना सोयीस्कर आहे. त्यामुळे खंडपीठ कोल्हापुरातच करा अशी आग्रही मागणी सतेज पाटलांनी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 18, 2025 | 10:45 PM
Kolhapur News: 'खंडपीठ आमच्या हक्काचं,नाही कुणाच्या बापाचं! कोल्हापुरात खंडपीठ करण्याच्या मागणीसाठी वकीलांची महारॅली

Kolhapur News: 'खंडपीठ आमच्या हक्काचं,नाही कुणाच्या बापाचं! कोल्हापुरात खंडपीठ करण्याच्या मागणीसाठी वकीलांची महारॅली

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : खंडपीठ आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं.! .कोल्हापुरात खंडपीठ झालंच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी करत कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने शहरात महारॅली काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन या मागणीचे निवेदन दिले. सदरचे हे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वीकारले. सकाळी निघालेल्या या रॅलीत संपूर्ण जिल्ह्यातील वकिलास सहा विविध संघटनांच्या पदाधिकारी यांनी या रॅलीत सहभागी झाली होते. सदरचे निवेदन तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवावे असे आव्हानेही वकिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना केले.

मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांना निवेदन देऊन महारॅलीची सुरुवात झाली. पितळी गणपती धैर्यप्रसाद हॉल, ताराराणी रोड ,स्टेशन रोड, व्हिनस कॉर्नर ,बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ही रॅली दसरा चौकात आली. दसरा चौकात उपोषणास बसलेल्या माणिक पाटील –  चुयेकर  यांची भेट घेऊन ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आगेकूच झाली.  पदाधिकाऱ्यांच्या सह शिष्ट मंडळ आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तीन वेगवेगळ्या प्रतीचे निवेदन दिले. तसेच सर्व निवेदन मुख्यमंत्र्यांनी पाठवून द्या. त्यांचा पाठपुरावा करा अशी त्यांना विनंती केली.

जिल्हाधिकारी कार्यालयावर ही रॅली आल्यानंतर प्रवेश दारावर वकीलांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि या प्रश्नाकडे लक्ष वेधले. यावेळी वकिलांसह विधी महामंडळाचे विद्यार्थी आणि काही संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. सहा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा सहभाग आजच्या या महारॅलीत होता. कोल्हापूर सह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग येथील बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन खंडपीठ मागणीसाठी आपली ताकद दाखवून दिली.

 अशा आहेत मागण्या
कोल्हापुरातील खंडपीठाच्या निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांसोबत कृती समितीची बैठक आयोजित करावी. मुख्यमंत्र्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची भेट घेऊन खंडपीठाचा निर्णय जाहीर करून करावा. कोल्हापूर हा नवीन महसूल विभाग करून आयुक्तालय सुरू करावे. झारखंड राज्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने वकिलांसाठी पाच वर्ष दर महाटाईप पेंट सुरू करावा. तसेच ज्येष्ठ वकील यासाठी पेन्शन सुरू करावी.

पायाभूत सुविधा चांगल्या, खंडपीठ कोल्हापुरातच करा आमदार सतेज पाटील यांची मागणी 

खंडपीठासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा कोल्हापुरात चांगल्या आहेत. सध्या विमानसेवा उत्तम सुरु असून भौगोलिक दृष्ट्या कोल्हापूर सगळ्यांना सोयीस्कर आहे. त्यामुळे खंडपीठ कोल्हापुरातच करा अशी आग्रही मागणी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केली. आमदार पाटील म्हणाले, कोल्हापुरात खंडपीठ व्हावे ही गेल्या ३० ते ४० वर्षापासूनची मागणी आहे.

कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी यासह बाकीच्या जिल्ह्यांतील लोकांना न्यायालयीन कामकाजासाठी मुंबईला जावे लागते. या सातही जिल्ह्यातील लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापुरातच खंडपीठाची मागणी सातत्याने उचलून धरली आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा. खंडपीठासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा कोल्हापुरात चांगल्या आहेत. भौगोलिक दृष्ट्या कोल्हापूर सगळ्यांना सोयीस्कर आहे. मुंबई हायकोर्टात जवळजवळ दोन लाख केसेस या सात जिल्ह्यांतून आहेत. त्यामुळे कोल्हापूर हे सर्वांना सोयीस्कर पडणारे ठिकाण असून खंडपीठ कोल्हापुरातच व्हावे, अशी अपेक्षा आमदार पाटील यांनी व्यक्त केली.

Web Title: Bar association holds a grand rally to establish a high court bench in kolhapur congress mla satej patil marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 10:45 PM

Topics:  

  • High court
  • kolhapur
  • Satej Patil

संबंधित बातम्या

राष्ट्रावादी पक्षासमोर अस्तित्व टिकवण्याचे संकट; अंतर्गत मतभेदांमुळे पक्ष वेगळ्या वळणावर उभा
1

राष्ट्रावादी पक्षासमोर अस्तित्व टिकवण्याचे संकट; अंतर्गत मतभेदांमुळे पक्ष वेगळ्या वळणावर उभा

Kolhapur : कोल्हापूरच्या नृत्यांगनांनी सादर केले Mount Everest Base Camp वर भरतनाट्यम्
2

Kolhapur : कोल्हापूरच्या नृत्यांगनांनी सादर केले Mount Everest Base Camp वर भरतनाट्यम्

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.