कोल्हापूर जिल्ह्यात हत्तीणीसाठी आक्रोश सुरु झाल्यानंतर आणि मोठ्या प्रमाणात जिओ पोर्ट करण्याची मोहीम सुरु झाल्यानंतर वनताराचे सीईओ शुक्रवारी कोल्हापुरात पोहोचले होते.
काँग्रेस पक्ष नाही, तर लोकांपर्यंत पोहोचणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्ष ताकदीने उभा राहणार आहे. येणाऱ्या काळामध्ये १८ ते २५ वयोगटापर्यंत काँग्रेस पक्ष पोहोचला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
शक्तीपीठ महामार्ग बनवण्याबाबत राज्य सरकारकडून निर्णय घेतले जात आहेत. तर शेतकऱ्यांकडून जोरदार विरोध केला जात आहे. यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.
शक्तीपीठ महामार्गाचे भूसंपादन केले जाणार आहे. याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वाधिक विरोध होत आहे.
भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आज कोल्हापुरात काँग्रेसच्या वतीने खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.
आम्ही दूध दरवाढीचा जो शब्द दिला होता त्याप्रमाणे दरवाढ केली आहे. गोकुळ कोणाच्या हातात असलं तर टँकर कोणाचे लागणार हे शेतकऱ्यांना माहिती आहे, असे सतेज पाटील म्हणाले.
सरकारकडून विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा केली जात नाही. सरकार विरोधी पक्षाला इतके का घाबरते ? असा सवाल माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी उपस्थित केला.
कोल्हापूर हद्दवाढीवरुन परस्पर विरोधी भूमिका राजकीय पक्षात दिसू लागली आहे. राज्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे सर्वसामान्य जनतेतून उलट सुलट प्रतिक्रिया उमटू लागले आहेत.
मुंबईतील विधानभवनावर १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समनव्यक गिरीश फोंडे यांनी रविवारी दिली.
शक्तीपीठ महामार्ग हा चर्चेमध्ये राहिला आहे. सुरुवातीपासून शेतकऱ्यांनी यासाठी विरोध केला आहे. आता यावर कॉंग्रेस नेते सतीश पाटील यांनी प्रतिक्रिया देत उपाय सांगितला आहे.
जिल्हावासीयांची दिशाभूल करणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी विकासाला विरोध करण्यापेक्षा पालकमंत्री, मंत्री, आमदार म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले? याचे आत्मपरीक्षण करावे, असे क्षीरसागर म्हणाले.
पुढील २ महिन्यांत महामार्गासाठी नियोजित जागेची मोजणी पूर्ण करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. यामध्ये शेती क्षेत्र, पिके, झाडे या सर्वांची मोजणी केली जाणार आहे.
शक्तीपीठ महामार्गबाधित 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शाहू स्मारक भवन येथे संपन्न झाली.
खंडपीठासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा कोल्हापुरात चांगल्या आहेत. सध्या विमानसेवा उत्तम सुरु असून भौगोलिक दृष्ट्या कोल्हापूर सगळ्यांना सोयीस्कर आहे. त्यामुळे खंडपीठ कोल्हापुरातच करा अशी आग्रही मागणी सतेज पाटलांनी केली.
राज्यातील 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा विरोध झुगारून शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तातडीने प्रक्रिया सुरू करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
शिरोळ मध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दत्त साखरचे गणपतराव पाटील यांना चितपट केले. हातकणंगले राखीव मतदार संघात जनस्वराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार दलित मित्र अशोकराव माने यांनी विजयाची गुढी उभारली.
कसबा बावडा येथे शिवसेना ठाकरे गटाचे उप-शहरप्रमुख राहुल माळी यांना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली.