
कागलीच ओळख राज्यभर,
कार्यक्रमास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विभागाच्या सचिव जयश्री भोज, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, पशुसंवर्धन आयुक्त प्रवीण देवरे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कागल नगरपरिषदेने पर्यावरण संरक्षण, स्वच्छता व्यवस्थापन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने प्रभावी उपक्रम राबविले. या सर्वांगीण कार्याची दखल घेत राज्यस्तरावर कागल नगरपरिषदेचा गौरव करण्यात आला.
‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत जैविक व नैसर्गिक शेतीचा अवलंब, कचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जेचा वापर, पावसाच्या पाण्याचे संकलन, हरित अर्थव्यवस्था आणि जनसहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. यावेळी अभियानावरील माहितीपट सादर करण्यात आला तसेच पर्यावरण विषयक प्रकाशनांचे अनावरण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने अधिक प्रभावी, नावीन्यपूर्ण आणि जनसहभागावर आधारित उपक्रम राबविण्याचा निर्धार कागल नगरपरिषदेच्या वतीने यावेळी व्यक्त करण्यात आला.