लातूरमध्ये दोन भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू, पोलिस कर्मचारीही जखमी
बीड: बीड जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बीड जिल्ह्यातील केजमध्ये मोठा अपघात झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने 10 ते 15 वाहनांना उडवले आहे. या भीषण धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 15 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. ही घटना बीड जिल्ह्याच्या केजमध्ये घडली आहे. कंटेनर भरधाव वेगात होता.
भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने केज मध्ये 10 ते 15 वाहनांना धडक दिली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 15 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिक चांगलेच संतप्त झाले. त्यांनी या कंटेनरला आग लावल्याचे समजते आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धडक दिलेल्या वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. धडक दिल्यानंतर कंटेनर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हा कंटेनर ताब्यात घेतला आहे.
भरधाव फॉर्च्युनर कार राँग साईडला घुसली अन्
राज्यात पुन्हा एकदा हायप्रोफाईल अपघाताचे प्रकरण समोर आले असून, पानशेत-पुणे रोडवरील मनेरवाडी गावाजवळ उलट्या दिशेने आलेल्या भरधाव फॉर्च्युनर कारने एका दुचाकीला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात वकिलाचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून चालक पसार झाले आहे. अनिकेत अरुण भालेराव (वय ३५, रा. वरदाडेवाडी, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या वकिलांचे नाव आहे. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत काका शांताराम भालेराव यांनी तक्रार दिली आहे.
Pune Accident : भरधाव फॉर्च्युनर कार राँग साईडला घुसली अन् पुढे जे घडलं ते…
मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत भालेराव हे वकील होते. ते शिवाजीनगर न्यायालयात वकिली करत. बुधवारी ते साडे चारच्या सुमारास भाजीपाला खरेदी करण्यासाठी खानापूर येथे गेले होते. पानशेत- पुणे रोडवरील मनेरवाडी येथील तारांगण हॉटेल समोर आले असताना उलट्या दिशेने भरधाव आलेल्या फॉर्च्युनर कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात अनिकेत हे गंभीर जखमी झाले. जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथून शहरातील एका रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्याठिकाणी गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान नातेवाईकानी कार चालक दारू पिलेला असावा असा आरोप केला आहे.
त्या अपघाताची आठवण
गेल्या वर्षी (१९ मे ) पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत आलिशान कार पळवत आयटी इंजिनिअर तरुण-तरूणींना उडवले होते. अल्पवयीन धनिक पुत्राला वाचवण्यासाठी झालेला खटाटोप आणि रक्तबद्दल यामुळे हे प्रकरण मोठे गाजले होते. अद्यापही यातील काही जण कारागृहात आहेत. बुधवारी झालेल्या अपघातामुळे पुन्हा या अपघाताची आठवण सर्वाना झाली.