Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसेनेच्या फुटीमागे वहिनींचा हात…; भरत गोगावलेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, चर्चांना उधाण

शिवसेनेमध्ये तीन वर्षापूर्वी मोठे बंड झाले. याबाबत शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी पुरुच्चार केला आहे. त्यांनी रश्मी ठाकरे यांना बंडखोरीसाठी अप्रत्यक्षरित्या जबाबदार धरले.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 15, 2025 | 05:00 PM
Bharat Gogawale criticism on Rashmi Uddhav Thackeray

Bharat Gogawale criticism on Rashmi Uddhav Thackeray

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांची विधाने देखील चर्चेत आहेत. सध्या राजकीय वर्तुळामध्ये शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांचे विधान जोरदार चर्चेत आले आहे. मागील तीन वर्षांपूर्वी शिवसेनेमध्य मोठे बंड झाले. भरत गोगावले यांच्या धक्कादायक विधानामुळे पुन्हा एकदा या बंडाच्या राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.

राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. मात्र त्यांना पक्षांतर्गत फुटीचा मोठा धक्का बसला. एकनाथ शिंदे यांनी 42 आमदारांसह पक्षांमध्ये बंड करुन गुवाहटी गाठली. यानंतर त्यांनी भाजपसोबत युती करुन राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांचे हे राजकीय बंड हे महाराष्ट्राच्या राजकारणावर दीर्घकालीन परिणाम करणारे ठरले आहे. याबाबत आता शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी धक्कादायक विधान केले आहे. शिवसेनेच्या फुटीमागे वहिनींचा हात असल्याचे मोठे विधान भरत गोगावले यांनी केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा बंडखोरीचा इतिहास उकरुन काढला आहे. ते म्हणाले की, आम्ही शिवसेनमधून बाहेर पडायला अनेक कारण आहेत. पण उद्धव ठाकरे हे आपल्या पत्नीच खूप ऐकतात. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीची सत्ता असताना मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांना दिला पाहिजे होते आणि आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्री पद द्यायला नको होते. पक्षातील लोकांना संधी दिली पाहिजे होती. पण उद्धव ठाकरे बाईच ऐकत होते. रश्मी ठाकरे यांचे नाव न घेता भरत गोगावले यांनी फुटीमागील अनेक कारणांपैकी रश्मी ठाकरे पण एक कारण असल्याचे म्हटले आहे.

बाळासाहेब गेल्यानंतरचा कारभार आम्हाला आवडला नाही

पुढे ते म्हणाले की, आमदार कार्यकर्त्यासह त्यांना भेटायला जात तेव्हा त्यांना बसवून ठेवले जायचे. त्यांना उद्धव ठाकरे भेटत नसत. त्यामुळे आमदाराचे काम होत नसेल तर कार्यकर्त्याचे कोण ऐकतो असा तक्रारीचा सूर उमटत होता. पण ती तक्रार कोणी दूर केली नाही असा आरोप त्यांनी केला. बाळासाहेबाप्रमाणे उद्धव ठाकरे नव्हते. बाळासाहेबांच्या कामाची पध्दत आम्हाला उध्दवसाहेबांमध्ये दिसली नाही. माझ्या वाढदिवसाला बाळासाहेबांना भेटायला गेलो तेंव्हा बाळासाहेब बोलले खाली बसायचं नाही. तुला खुर्ची मी देणार आहे आणि काढून घेणाराही मी आहे. बाळासाहेब गेल्यानंतरचा कारभार आम्हाला आवडला नाही, अशी नाराजी भरत गोगावले यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे नाव न घेता भरत गोगावले यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी रश्मी ठाकरे यांना पक्षफुटीला जबाबदार धरले आहे. भरत गोगावले म्हणाले की, महिलांचा कुठपर्यंत हस्तक्षेप घ्यायला पाहिजे विचार करायला पाहिजे. पडद्याच्या पाठिमागून वहिनींचा हस्तक्षेप बराचसा होता. उध्दवसाहेबांच्या मनात अनेक गोष्टी असाच्या मात्र नंतर बदल व्हायचा. आम्ही मातोश्रीवरून परत आल्यानंतर कार्यकर्त्यांना कसं वाटणार आमदारांना एन्ट्री नाही. आता ज्या एन्ट्री आहेत ती रहायला पाहिजे. संघटनेसाठी काम करणाऱ्या माणसाला फाट्यावर माराल तर अशीच स्थिती होणार, असा टोला देखील शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

Web Title: Bharat gogawale criticism on rashmi uddhav thackeray for eknath shinde group rebellion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 05:00 PM

Topics:  

  • Bharat Gogawale
  • Rashmi Thackeray
  • shivsena
  • Uddhav Thackarey

संबंधित बातम्या

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन
1

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन

Maharashtra Politics: गुहागरात शिमग्याआधीच वाजला युतीचा ढोल; ZP अन्…
2

Maharashtra Politics: गुहागरात शिमग्याआधीच वाजला युतीचा ढोल; ZP अन्…

Mumbai: उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र Tejas Thackeray रुग्णालयात दाखल; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
3

Mumbai: उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र Tejas Thackeray रुग्णालयात दाखल; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

छत्रपती संभाजीनगरमध्ये 16 पैकी 11 जागांवर महिलांनी मारली बाजी; भाजपची ताकद वाढली
4

छत्रपती संभाजीनगरमध्ये 16 पैकी 11 जागांवर महिलांनी मारली बाजी; भाजपची ताकद वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.