
डॉ. गणेश खवसे । नवराष्ट्र
यंदा सुरुवातीला उशिरा पावसाने हजेरी लावली. त्यानंतर दांडी मारल्याने शेतकरी पेरणीच्या द्विधा मनःस्थितीत होते. त्यामुळे पेरणीही उशिरा सुरू झाली. विदर्भातील नागपूर आणि अमरावती विभागात आतापर्यंत ७४ टक्के पेरणी आटोपलेली आहे. विशेष म्हणजे राज्यात ६९ टक्के पेरणी झालेली असून त्यात अमरावती विभाग आघाडीवर आहे. तेथे ८८ टक्के पेरणी आटोपली आहे. नागपूर विभागात ४० टक्के बाकीच आहे.
Farmers News: 15 दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही; शेवगावच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ
जूनच्या शेवटी, त्यानंतर जुलैच्या सुरुवातीला काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर १५ दिवस दडी मारलेला पाऊस आता गेल्या ४ दिवसांपासून विदर्भात संततधार कोसळत आहे. विदर्भात विशेषतः पश्चिम विदर्भात पावसाआधीच धूळपेरणी करण्यात आली. त्यानंतर थोड्याफार प्रमाणात पाऊस झाल्याने ही धूळपेरणी साधली गेली. विशेषतः बुलढाणा आणि यवतमाळ जिल्हे त्यात अग्रस्थानी राहिले. त्यामुळेच राज्यातही हे दोन जिल्हे येणारा अमरावती विभाग पेरणीमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. पूर्व विदर्भाचा विचार करता धानपट्टा असणारा गोंदिया येथे १४ टक्के आणि भंडारा येथे केवळ १७ टक्के पेरणी झाली असल्याचे २२ जुलैच्या कृषी विभागाच्या अहवालात नमूद आहे. आता त्यास वेग येण्याची शक्यता आहे.