Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कालव्याच्या अस्तरीकरणामुळे शेतीला धोका; शेतकरी चिंताग्रस्त

मुळा -मुठा नव्या कालव्यावर जमिनीवरून आणि भरावांच्या दोन्ही बाजूने आतून सिमेंटचे पक्के अस्तरीकरण करण्यात येत आहे. या अस्तरीकरणामुळे कालव्यातून होणारा पाझर, झिरप पूर्णपणे बंद होईल. यामुळे विहिरी, बोअर, ओढे, नाले यांना पाझर व झिरप यामुळे येणारे पाणी पूर्णपणे बंद होऊन त्याचा शेत पिकावर मोठा परिणाम होऊन पर्यायाने शेती व्यवसाय धोक्यात येणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 18, 2022 | 04:07 PM
कालव्याच्या अस्तरीकरणामुळे शेतीला धोका; शेतकरी चिंताग्रस्त
Follow Us
Close
Follow Us:

यवत : मुळा -मुठा नव्या कालव्यावर जमिनीवरून आणि भरावांच्या दोन्ही बाजूने आतून सिमेंटचे पक्के अस्तरीकरण करण्यात येत आहे. या अस्तरीकरणामुळे कालव्यातून होणारा पाझर, झिरप पूर्णपणे बंद होईल. यामुळे विहिरी, बोअर, ओढे, नाले यांना पाझर व झिरप यामुळे येणारे पाणी पूर्णपणे बंद होऊन त्याचा शेत पिकावर मोठा परिणाम होऊन पर्यायाने शेती व्यवसाय धोक्यात येणार आहे. त्यामुळे कालव्यावर आधारित शेतकरी वर्गाने चिंता व्यक्त केली आहे.

मुळा – मुठा नवा कालवा हा खडकवासला येथून निघून हवेली, दौंड या तालुक्यातून पुढे इंदापूरला जातो. हा नवा कालवा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत आहे. कालव्याच्या दक्षिण भागातील शेती पेक्षा उत्तर भागातील शेतीवर याचा फार मोठा परिणाम होणार आहे. पाटबंधारे खात्याने नव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम हवेली आणि दौंड तालुक्यात वेगाने सुरू केले आहे. खाली जाड कागद अंथरून त्यावर ६ इंच जाडीचे आतून अस्तरीकरण करण्यात येत आहे.

विहिरी, बोअर बंद पडणार

उन्हाळ्यात पाणी आवर्तन दरम्यान काही दिवस कालवा बंद झाल्यास प्रथम पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडतात. जास्त दिवस कालवा बंद राहिल्यास शेतपिकावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत कालव्याचे अस्तरीकरण झाल्यास पाझर पूर्णपणे बंद होऊन ओढे नाले, ओहळ कोरडेठाक पडतील. विहिरी बोअर बंद पडतील, याचा शेत पिकावर मोठा परिणाम होऊन पर्यायाने शेती व्यवसाय धोक्यात तर येईलच. यासह शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होउन त्यांचे प्रपंच अडचणीत येतील, अशी चिंता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांनी नव्या कालव्याच्या अस्तरीकरणास तीव्र विरोध केला असून, दौंड मधील शेतकरी मात्र चिंता व्यक्त करून गप्प बसले आहेत.

[blockquote content=”नव्या कालवा अस्तरीकरणामुळे शेती व्यवसाय धोक्यात येईल. यासह अन्य अनेक परिणाम भोगावे लागतील, हे शेतकरी विरुद्ध काम आहे. या विरुद्ध शेतकरी संघटना दौंड तालुक्यात लढा उभा करेल.” pic=”” name=”- सुनील नातू, अध्यक्ष, दौंड तालूका शेतकरी संघटना.”]

Web Title: Canal lining threatens agriculture farmers worried nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2022 | 04:07 PM

Topics:  

  • ajit pawar
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • Pune
  • Yavat

संबंधित बातम्या

‘…अन् मगच काँग्रेसने आमच्यावर बोलावे’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल
1

‘…अन् मगच काँग्रेसने आमच्यावर बोलावे’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

पुण्याच्या राजकारणात मोठा भूकंप! Ajit Pawar यांच्या हातून महापालिका निसटणार? ‘या’ नेत्याने सोडली साथ
2

पुण्याच्या राजकारणात मोठा भूकंप! Ajit Pawar यांच्या हातून महापालिका निसटणार? ‘या’ नेत्याने सोडली साथ

Prithviraj Chavan On Mahayuti: “तीन पक्षांचे सरकार लचके तोडतय”, पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर घणाघात
3

Prithviraj Chavan On Mahayuti: “तीन पक्षांचे सरकार लचके तोडतय”, पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर घणाघात

भारतीय सैन्याला शिवसेनेकडून मदतीचा हात, शत्रूपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण व्हावे यासाठी दिले ५० कंटेनर
4

भारतीय सैन्याला शिवसेनेकडून मदतीचा हात, शत्रूपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण व्हावे यासाठी दिले ५० कंटेनर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.