
Chandrapur News: 15 किमीची पायपीट थांबवा, गावागावात सेतू केंद्र सुरू करा! नागरिकांची प्रशासनाकडे मागणी
हिंजवडी मेट्रोची पाचवी डेडलाईनही हुकणार; मुख्यमंत्र्यांच्या तंबीलाही वाटाण्याच्या अक्षता
सध्या उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, ई-श्रम नोंदणी, आधार अद्ययावतीकरण, विविध शासकीय योजनांचे अर्ज तसेच इतर ऑनलाइन सेवांसाठी नागरिकांना तहसील कार्यालयात वारंवार जावे लागते. याचा सर्वाधिक फटका शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना बसत आहे. ग्रामीण भागातून तहसील कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवासावर मोठा खर्च होत असून, दिवसभराचा वेळही वाया जातो. अनेकदा किरकोळ कामासाठी दोन ते तीन वेळा तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव नाराजी व्यक्त होत आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
नागरिकांच्या मते, लोकसंख्येनुसार प्रत्येक गावात किंवा ग्रामपंचायत स्तरावर सेतू केंद्र सुरू झाल्यास शासकीय सेवा गावातच उपलब्ध होतील. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रमांची बचत होण्याबरोबरच शासनाच्या डिजीटल सेवा अधिक प्रभावीपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतील. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक निर्णय घेऊन नागभीड तालुक्यात लोकसंख्या निहाय सेतू केंद्र सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली.
ज्येष्ठ नागरिकांची शासकीय कामे गावातच झाली, तर मोठा तर मोठा दिलासा मिळेल. निराधार योजनेसह विविध कामांसाठी वारंवार तहसील कार्यालयात जावे लागते. क्योमानामुळे प्रवासाचा त्रास सहन करावा लागतो, गावातच सेतू केंद्र सुरू झाल्यास नागरिकांची मोठी सोय होईल.- बाबुराव येसनसुरे, ज्येष्ठ नागरिक, वाढोणा