Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापुरमध्ये मतदार आक्रमक, थेट मतदानावर टाकला बहिष्कार; काय आहे नेमकं कारण?

कोल्हापुरातील एका भागात मुलभूत मागण्यांकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. थेट आगामी निवडणुकीत मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 10, 2025 | 03:19 PM
कोल्हापुरमध्ये मतदार आक्रमक, थेट मतदानावर टाकला बहिष्कार; काय आहे नेमकं कारण?

कोल्हापुरमध्ये मतदार आक्रमक, थेट मतदानावर टाकला बहिष्कार; काय आहे नेमकं कारण?

Follow Us
Close
Follow Us:
  • कोल्हापुरमध्ये मतदार आक्रमक
  • थेट निवडणुकीवर टाकला बहिष्कार
  • काय आहे नेमकं कारण?
कोल्हापूर : सध्या सर्वत्र निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रत्येक इच्छुक उमेदवार आपल्या मतदाराला विचारपूस करू लागला आहे. मात्र, कोल्हापुरातील एका भागात मुलभूत मागण्यांकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आपल्या परिसरातील कामं न झाल्याचा राग व्यक्त करत जवळपास ४०० ते ५०० नागरिकांनी थेट आगामी निवडणुकीत मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे.

आपल्या राहत्या घराच्या परिसरात मुलभूत कामंही न झाल्याने महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या नागरिकांचा असंतोष कोल्हापुरात पाहायला मिळाला आहे. कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक ८ मधील चिंतामणी कॉलनी, शिक्षक कॉलनी, एस.टी. कॉलनी आणि शिवशंभो कॉलनी या परिसरात मुख्य मार्गावरील रस्ते, नाले आणि गटारींचे कामं दिर्घकाळापासून प्रलंबित आहेत. निवडणुका आल्यानंतर फक्त तोंड दाखवायला येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडे याबाबत पाठपुरावा करुन या भागातले नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. काम अजूनही सुरू न झाल्यामुळे परिसरातील रहिवाश्यांना रोजच ये-जा करताना त्रास सहन करावा लागतो. मागील अनेक वर्षांपासून नागरिकांनी प्रशासनाकडे निवेदनासह तक्रारी केल्या आहेत. मात्र, ठोस प्रतिसाद किंवा कार्यवाही झाली नाही. या कारणांमुळे प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधींचा नागरिकांनी तीव्र निषेध केला आहे.

नागरिकांच्या मुलभूत सुविधांकडे प्रशासनानं केलेल्या दुर्लक्षामुळे राजगोल पाणंद परिसरातील मतदारांनी महापालिका निवडणुकीत मतदान न करण्याचा ठराव केला आहे. “विकास नाही, रस्ते नाही तर मतदानही नाही” असा आक्रमक संदेश या भागातील नागरिकांनी पोस्टर्स लावून आणि प्रसिद्धीपत्रकांद्वारे प्रसारित केला आहे. तसेच, परिसरातील मतदारांच्या सह्यांसह याबाबतचं निवेदन कोल्हापूर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनाही देण्यात आले आहे.

“प्रशासनाकडून कोणतीही विकासकामे आणि मुलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे या निवडणुकीत या परिसरातील कोणीही मतदान करणार नाही. चिंतामणी कॉलनी, शिक्षक कॉलनी, एस.टी. कॉलनी आणि शिवशंभो कॉलनीतील आम्ही सर्वजण मतदार प्रशासनाला अंतिम इशारा देत आहोत. जलदगतीनं काम सुरू केली नाहीत, तर पुढील सर्वच निवडणुकीत आमचा मतदानावर बहिष्कार कायम राहील.” असं येथील नागरिकांनी ठणकावून सांगितलं आहे.

“या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी कोणताच मुख्य रस्ता नाही. फक्त एक सरकारी पाणंद आहे. हा एकमेव रस्तादेखील सध्या येण्या-जाण्यासाठी गैरसोयीचा आहे. पावसाळ्यात तर पायीसुद्धा या मार्गानं ये-जा करणं अशक्य होते. तसेच, या भागातील अंतर्गत रस्ते आणि गटारदेखील महानगरपालिकेनं आजवर केलेले नाहीत”, अशी व्यथा देखील या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी मांडली. नागरिकांच्या या भूमिकेची माहिती मिळताच माजी नगरसेवक राहुल माने यांनी तत्काळ या भागातील नागरिकांची भेट घेतली. प्रशासनाकडे या समस्येचा पाठपुरावा करत आहोत. यापुढेही प्राधान्यानं या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिले. मात्र, तरीही नागरिकांनी आपला निषेध कायम ठेवला आहे.

दरम्यान, कोल्हापूरच्या या नागरिकांचा निवडणूक आणि मतदानावर बहिष्काराचा संदेश फक्त स्थानिकच नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावरही प्रशासनाला मोठं आव्हान देणारा ठरत आहे. तर नागरिकांना सकारात्मक निर्णय आणि उपाययोजना न दिल्यास येत्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूप घेऊ शकतं. त्यामुळे प्रशासनाने आवश्यक त्या पावलांची तात्काळ तरतूद करणं गरजेचं आहे.

Web Title: Citizens of kolhapur have boycotted the elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 03:19 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Election News
  • kolhapur news

संबंधित बातम्या

Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 
1

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : जिल्ह्यात बिबट्यांचा सुळसुळाट; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
2

Kolhapur News : जिल्ह्यात बिबट्यांचा सुळसुळाट; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Ajit pawar : बारामती विमानतळाला अजित पवार यांचे नाव द्या; कुणी केली मागणी ?
3

Ajit pawar : बारामती विमानतळाला अजित पवार यांचे नाव द्या; कुणी केली मागणी ?

महाराष्ट्र कृषी विभाग ॲक्शन मोडवर; बेकायदेशीर ‘कम्फर्ट’ मच्छर अगरबत्तीची विक्री करणाऱ्या दुकानांवर टाकले छापे
4

महाराष्ट्र कृषी विभाग ॲक्शन मोडवर; बेकायदेशीर ‘कम्फर्ट’ मच्छर अगरबत्तीची विक्री करणाऱ्या दुकानांवर टाकले छापे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.