शेतकऱ्यांकडून फळभाज्या व पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने शहरातील भाजी बाजारपेठेत सध्या दर घसरल्याचे चित्र आहे. विशेषतः पालेभाज्यांची आवक लक्षणीयरीत्या वाढल्यामुळे दर कमी झाले असून ग्राहकांची गर्दी होत आहे.
गेल्या काही वर्षांत मनपा परिवहन विभागाच्या केएमटी उपक्रमास विविध समस्यांनी ग्रासले. या समस्यांचे मूळ शोधून केएमटी उपक्रमात दीर्घकालीन सुधारणांवर भर देण्यास प्रयत्नशील असल्याचं परिवहन सदस्यांनी सांगितले,
Kolhapur शहरात घंटागाडीमार्फत दारोदार कचरा संकलन होत असले तरी अनेक ठिकाणी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. स्कॅनर प्रणाली लागू करूनही काही कर्मचाऱ्यांनी केवळ चार दिवस स्कॅन केल्याचे नाटक केल्याची तक्रार आहे.
कागल नगरपरिषदेने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धन, स्वच्छता व्यवस्थापन आणि शाश्वत विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय सन्मान मिळवला.
वाळवा तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे भीतीचे सावट पसरले आहे. अलीकडेच झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आणि असुरक्षिततेची भावना वाढली आहे. शेतकरी व मजुरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
चलकरंजी येथीलमनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दाफाउंडेशन, रोटरी क्लब ऑफइचलकरंजी सेंट्रल आणि अखिलभारतीय मराठी नाट्य परिषदइचलकरंजी शाखा यांच्या वतीने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजजन्मदिन-मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे.
पंचगंगा प्रदुषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच नदीची पातळी खालावल्यामुळे पंचगंगेचे पाणी अधिक काळेकुट्ट बनले आहे. यामुळे नदी काठच्या गावांमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले.
शक्तीपीठ महामार्गाविरोधात विरोधात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार असून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये गोलमेज परिषद घेण्यात येणार आहे.
शिवरायांचे राष्ट्रनिर्मितीतील योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या प्रशासनातील शिस्त, लोककल्याणाची भूमिका आणि दूरदृष्टी आजच्या पिढीने अंगीकारणे गरजेच आहे, असे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल यांनी सांगितले.
दरवर्षीच्या पावसाने कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्राचा इतर भाग कायम पुराने वेढतो. या समस्येवर आधारित पावसाआधीच ठोस उपाययोजना राबवण्यात याव्यात यासाठी बैठक घेण्यात आली.
कोल्हापूर जिल्ह्यातील मानेवाडी गावात गेले कित्येक दिवस गावकरी पाण्यासाठी वणवण भटकत आहे. रोजच्या पिण्यासाठी पाणीपुरवठा होत नसल्याने गावकी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत आहेत.