Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाडा तालुक्यात मुसळधार पावसामुळे मरकटवाडी, पाचघर, करोळ आणि वावळ्याचीवाडी गावांचा संपर्क तुटला असून ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 20, 2025 | 07:00 PM
मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

Follow Us
Close
Follow Us:

दीपक गायकवाड, मोखाडा: मोखाडा तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मंगळवारी (दि. 19) रात्रीपासून सुरू झालेला पाऊस बुधवारी (दि. 20) दुपारपर्यंत न थांबल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. पाचघर गावालगतच्या पुलावरून पुरासारखे पाणी वाहू लागल्याने पाचघर, करोळ आणि वावळ्याचीवाडी या गावांचा हमरस्त्याशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. पाणी ओसरल्यावर वाहतूक सुरू होत असली तरी संततधार पावसामुळे स्थानिकांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

कोल्हापुरात पावसाचा हाहा:कार; भोगावती नदीला महापूर, लक्ष्मी जलाशय शंभर टक्के भरला

या रस्त्यावर असलेल्या मोरीवरूनही पाण्याचा वेग वाढल्याने संपर्क तुटतो. या तीन गावांतून दररोज कारेगाव आश्रमशाळेत जाणारी सुमारे ५० ते ६० मुले-मुलींना ७ किमी अंतर पायी चालावे लागते. मात्र पाणी पुलावरून वाहत असताना शाळेत जाणे कठीण होते. आरोग्य सेवा, राशनसारख्या मूलभूत गरजांसाठी देखील ग्रामस्थांना अडचण निर्माण होते. त्यामुळे अधिक उंचीचा पूल बांधावा अशी मागणी अनेक वर्षांपासून ग्रामस्थ व पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ बांधकाम विभागाकडे करत आहेत.

प्रत्येक वर्षी अतिवृष्टीमुळे या गावातील आदिवासी बांधवांना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने पूल बांधण्याचे काम रखडले आहे. बांधकाम विभागाकडून “१५ मीटरपेक्षा जास्त काम आमच्या अखत्यारीत नाही” असे कारण पुढे केले जाते, तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून “हे काम नाबार्डमधून प्रस्तावित करू” असे आश्वासन दिले जाते. परिणामी ग्रामस्थांना आश्वासनाचे गाजर दाखवले जाते पण ठोस उपाययोजना होत नाही. दरम्यान, मुसळधार पावसामुळे मरकटवाडी–बेहेटवाडी रस्त्यालगतचा खडा पहाड कोसळून रस्त्यावर पडल्याने हा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे.

तसेच मोखाडा तालुक्यातून नाशिक–कसारा महामार्गाला जोडणाऱ्या खोडाळा–विहीगाव मार्गावरील गार नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. त्यामुळे काही तास वाहतूक खोळंबली होती. हा पूल सखल भागात असून खांबांना ठिकठिकाणी तडे गेले आहेत. पुलाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने दुरुस्तीची मागणी ग्रामस्थ वारंवार करत आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या आवश्यक पुलाकडे दुर्लक्ष करून इतर ठिकाणी कोटींची कामे हाती घेतल्याचा आरोप माजी सभापती प्रदीप वाघ यांनी केला आहे.

दरवर्षी पुनःपुन्हा निर्माण होणाऱ्या या समस्येमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उंच पूल व दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

जलसिंचन योजनेचा जॅकवेलच पंचगंगा नदीपात्रात कोसळला; तब्बल 33 लाखांचे नुकसान, शेतीचा पाणीपुरवठा बंद होणार?

Web Title: Communication between markatwadi and two villages including pachghar was lost water overflowed on the bridge over the gara river

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 07:00 PM

Topics:  

  • maharashtra
  • palghar

संबंधित बातम्या

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
1

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
2

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी
3

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
4

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.