Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकरी मोठ्या संकटात असताना सरकारच्या फक्त कोरड्या गप्पा, पंचनामे सोडा अन् तात्काळ मदत करा; काँग्रेसची मागणी

सरकारने झोपेतून जागे व्हावे व संकटातील शेतकऱ्याला हेक्टरी सरसकट ५० हजार रुपये तातडीने द्यावेत, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 23, 2025 | 06:05 PM
शेतकरी मोठ्या संकटात असताना सरकारच्या फक्त कोरड्या गप्पा, पंचनामे सोडा अन् तात्काळ मदत करा; काँग्रेसची मागणी

शेतकरी मोठ्या संकटात असताना सरकारच्या फक्त कोरड्या गप्पा, पंचनामे सोडा अन् तात्काळ मदत करा; काँग्रेसची मागणी

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यात यावर्षी सरसरीपेक्षा दुप्पट, तिप्पट पाऊस पडला आहे. ३६ जिल्हे व ३५८ तालुक्यापैकी ३० जिल्हे व जवळपास ३०० तालुके अतिवृष्टी आणि पूरग्रस्त आहेत. राज्यभरात जवळपास १४३ लाख हेक्टरवरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाऊस सातत्याने पडत असून शेतकरी हवालदिल झाला आहे परंतु राज्यातील महायुती सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही, पालकमंत्र्याने पाहणी सुद्धा केली नाही. मंत्रिमंडळ बैठकीत फक्त कोरडी चर्चा झाली. सरकारने झोपेतून जागे व्हावे व संकटातील शेतकऱ्याला हेक्टरी सरसकट ५० हजार रुपये तातडीने द्यावेत व शेतजमीन खरडून गेली त्यांना हेक्टरी ५ लाख रुपये द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

टिळक भवन येथील पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर टीका केली. ते पुढे म्हणाले की, मुसळधार पावसामुळे मराठवाडा, विदर्भातील काही जिल्हे, सोलापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाड्यात तर अत्यंत वाईट परिस्थिती आहे. काँग्रेस पक्ष मागील दोन महिन्यापासून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करत आहे, पण शेतकरी विरोधी महायुती सरकार मात्र पोकळ आश्वासने देत आहे. पावसाने हाहाकार माजवला आहे, शेतातील पिकं, जमीन, पशुधन, गृहपयोगी साहित्य सर्व वाहून गेले पण राज्यातील आंधळं, बहिरं व मुक्या सरकारला त्यांच्या वेदना दिसत नाही, मंत्र्यांना जिल्ह्यात जाऊन दौरे करा अशा सुचना मुख्यमंत्र्यांना कराव्या लागत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे. निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले असा सवाल सपकाळ यांनी विचारला आहे.

काँग्रेस नेते शेतकऱ्यांच्या बांधावर

काँग्रेस सरकार असताना पिकाचे लाल्या रोग, बोंड आळीने नुकसान केले, गारपीट चक्रीवादळाने नुकसान केली की तातडीने मदत दिली जात पण भाजपा युतीचे सरकार मात्र नियम, अटी, शर्ती यातच अडकून पडले आहे. एवढे मोठे नुकसान झाले असताना पंचनामे कसले करता, आधी मदत द्या, मग कागदी सोपस्कार पूर्ण करा. सरकारचे मंत्री झोपले असताना काँग्रेसने समिती नेमून पूरग्रस्त भागाची पाहणी सुरु केली आहे. छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्ह्यात खासदार डॉ. कल्याण काळे, माजी मंत्री अनिल पटेल, राजेंद्र राख, राजेश राठोड, लहु शेवाळे हे नुकसानीची पाहणी करणार आहेत. लातूर, बीड, व धाराशीव जिल्ह्यात खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, माजी मंत्री अशोक पाटील, दादासाहेब मुंडे, पांडुरंग कुंभार. नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात खासदार रविंद्र चव्हाण, माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, आ. डॉ. प्रज्ञा सातव, बाळासाहेब देशमुख, प्रा. यशपाल भिंगे. अमरावती विभागात माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, आ. अमित झनक, आ. अनिल मांगूळकर, विरेंद्र जगताप, महेश गणगणे, प्रकाश तायडे. नागपूर विभागात खासदार नामदेव किरसान, प्रशांत पडोळे, शामकुमार बर्वे, सुरेश भोयर, रविंद्र दरेकर, संतोषसिंह रावत. उत्तर महाराष्ट्रात खासदार शोभा बच्छाव, गोवाल पाडवी, राजाराम पानगव्हाणे, संदिप पाटील, हेमंत ओगले, दरबारसिंग गिरासे यांचे पथक पाहणी करेल तर सोलापूर जिल्ह्यात खासदार प्रणिती शिंदे, प्रकाश यलगुलवार, रामहरी रुपनवर, अलका राठोड, विनोद भोसले हे नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी करणार आहेत, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has demanded the government to help farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 06:03 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

भाजपाच्या धमक्यांना भिक घालत नाही, अंगावर आले तर आम्ही त्यांना…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
1

भाजपाच्या धमक्यांना भिक घालत नाही, अंगावर आले तर आम्ही त्यांना…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार; आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही
2

काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार; आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

सरकारने 49 वर्षाच्या कराराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा…; सदाभाऊ खोत यांचा इशारा
3

सरकारने 49 वर्षाच्या कराराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा…; सदाभाऊ खोत यांचा इशारा

शिवनेरी किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा; देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार अन् एकनाथ शिंदे राहणार उपस्थित
4

शिवनेरी किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा; देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार अन् एकनाथ शिंदे राहणार उपस्थित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.