स्वातंत्र्यदिनाच्या काँग्रेसच्या कार्यक्रमातील सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या संवादाचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. वंदे मातरमवरून भाजपने काँग्रेसला घेरले, तर हर्षवर्धन सपकाळ यांनी व्हिडिओमागील संदर्भ स्पष्ट करत फडणवीसांवर पलटवार केला.
मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसचा ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी RSS, भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. संविधान, राष्ट्रध्वज, राहुल गांधी आणि महिला आरक्षणाच्या…
आज लाल किल्ल्यावरून तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेवून काही घोषणा करण्यात आल्या पण मागील १२ वर्षात अशाच दिलेल्या घोषणांचे काय झाले? असा सवाल सपकाळ यांनी विचारला आहे.
महाराष्ट्रातील उद्योगधंदे आणि रोजगारनिर्मितीच्या मुद्द्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. गेल्या पाच आर्थिक वर्षांत राज्यातील 35,211 खासगी कंपन्या बंद पडल्याचा दावा करत त्यांनी सरकारच्या गुंतवणुकीच्या…
काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या अध्यक्षांची निवड आणि नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून नाशिक येथे १० दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गांधी भवनातील काँग्रेस कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी कथितरित्या धुडगूस घातल्याचा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप व पोलिसांवर गंभीर आरोप केले. तसेच काँग्रेस गांधीवादी मार्ग सोडणार नसल्याचेही…
सुनेत्रा पवार यांच्यावरील 'गुंगी गुडिया' या टीकेवरून सुरू झालेल्या वादात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी टीकेचे समर्थन करत राष्ट्रवादी आणि भाजपवरही निशाणा साधला.
इथेनॉल घोटाळ्याप्रश्नी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा राजानीमा घ्यावा अशी, मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत सहकाऱ्यांसह टिळक भवन येथील कार्यक्रमात काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
पेपरफुटीने लाखो विद्यार्थी व पालकांच्या आशा आकांशावर बुलडोझर फिरवला जात असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरु असलेला हा खेळ थांबला नाही तर भाजपाला महागात पडेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी…
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता काँग्रेसने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी इथेनॉल धोरणावर टीका करत गडकरींच्या राजीनाम्याची मागणी केली, तर उद्धव ठाकरे यांनीही शिवाजी…
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीसांवर खोचक टिप्पणी करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. राहुल गांधींच्या भूमिकेचाही त्यांनी उल्लेख केला.
विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे रद्द केले पाहिजेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची जाहीर माफी मागितल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
काँग्रेस पक्षाने आता आंदोलन गावोगावी पोहचवण्याचा निर्धार केला आहे. उद्या शनिवार दिनांक २५ जुलै २६ रोजी प्रत्येक जिल्ह्यात कँडल मार्च आणि सत्याग्रह आयोजित केला आहे, अशी माहिती काँग्रेसने दिली आहे.
विद्यार्थ्यांवर दडपशाही करणारे पोलीसराज महाराष्ट्राला कलंक असून स्वतःला देवाभाऊ म्हणवून घेणाऱ्याची कृती मात्र दुर्योधनासारखी असल्याचा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाई, पत्रकारांना अडवणे आणि कथित दडपशाहीच्या घटनांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी DGP आणि मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत कारवाईची मागणी केली. ड्रग्ज प्रकरणातील व्हायरल व्हिडिओची चौकशी करून…
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन आणि नीट पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र टीका केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे राजकीय अजेंडा असल्याच्या विधानाचा समाचार घेत त्यांनी भाजप आणि…
विद्यार्थ्यांच्या आडून नाही, तर थेट रस्त्यावर उतरून काँग्रेसने मोदी सरकारला जाब विचारला आहे व यापुढेही विचारत राहू, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना वीजबील माफ केल्याची घोषणा करण्यात आली आहे, ही घोषणाही फसवी व दिशाभूल करणारी आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.