Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

२२ हजार शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा ! ११ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, ६०८ गावांना पुराचा फटका

महसूल विभाग (Department of Revenue) आणि कृषी विभागाने (Department of Agriculture) जिल्ह्यातील झालेल्या नुकसानाचे पंचनामे तयार केले. त्यानुसार जिल्ह्यातील ६०३ गावांतील २२ हजार १८५ शेतकऱ्यांच्या ११ हजार ६७९.५० हेक्टर क्षेत्रावरील धान आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.

  • By Anjali Awari
Updated On: Aug 17, 2022 | 11:25 AM
Crushed dreams of 22 thousand farmers! Damage to crops on 11 thousand hectares, 608 villages affected by flood

Crushed dreams of 22 thousand farmers! Damage to crops on 11 thousand hectares, 608 villages affected by flood

Follow Us
Follow Us:

गोंदिया : चालू महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आला. त्यामुळे जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला. पुराचे पाणी शेतात शिरून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. १४ आणि १५ ऑगस्ट रोजी देखील झालेल्या पावसामुळे आलेल्या पुराचे पाणी अद्यापही शेतात आहे. चालू महिन्यात पूर आणि पावसामुळे झालेल्या नुकसानाचा अहवाल कृषी विभागाने (Department of Agriculture) तयार केला. तब्बल २२ हजार १८५ शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नांचा चुराडा झाला असून ६०३ गावांतील ११ हजार ६८७.५० हेक्टर क्षेत्रातील पिकांना त्याचा फटका बसला.

जून महिन्यात पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. यावर्षी पाऊस होतो की नाही, अशी हुरहूर शेतकऱ्यांना लागून होती. हवामान विभागाचा अंदाज देखील खोटा ठरू लागला होता. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त (Farmers worried) झाले होते. जुलै महिन्यात पावसाने दमदार कमबॅक केला. त्यानंतर, मात्र पावसाने दडी मारली. ऊन तापत असल्यामुळे पेरणी झालेल्या बांधांमध्ये भेगा पडणे सुरू झाले होते. अशात हवामान खात्याने ९ तारखेपासून जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज खरा ठरला. ९ ऑगस्ट मंगळवारी दिवसा आणि रात्रभर तसेच बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली.

संततधार झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला. जिल्हा जलमग्न झाला. नदी आणि नाल्यांतील पाण्याचा पूर शेतात शिरला. त्यामुळे शेतात लावलेले रोवणे आणि पऱ्हे पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेले. तर, काही ठिकाणचे पऱ्हे आणि रोवणे कुजले. ही चिंता दूर होत नाही, तोच पुन्हा १४ आणि १५ ऑगस्ट रोजी आलेल्या संततधार पावसामुळे पुन्हा थैमान घातले. अद्यापही अनेक भागांत पुराचे पाणी साचून आहे. शेतातील पीक कुजत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चिंतेचे वातावरण आहे.

महसूल विभाग (Department of Revenue) आणि कृषी विभागाने (Department of Agriculture) जिल्ह्यातील झालेल्या नुकसानाचे पंचनामे तयार केले. त्यानुसार जिल्ह्यातील ६०३ गावांतील २२ हजार १८५ शेतकऱ्यांच्या ११ हजार ६७९.५० हेक्टर क्षेत्रावरील धान आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचा अहवाल जिल्हा कृषी अधिकारी कृषी अधीक्षक कार्यालयाने उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला. नुकसान मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अद्यापही अनेक ठिकाणी पुराचे पाणी साचून आहे. त्यामुळे, त्या भागातील धान पिक आणि भाजीपाला देखील कुजले. शिवारात कुजका वास सुटला आहे.

तालुक्यात संपर्क तुटलेलाच

सालेकसा, शिरपूर, कालीसराड आणि पुजारीटोला प्रकल्पाचे पाणी सोडल्यामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला. अनेकांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. अद्यापही अनेक मार्गांवरील पुलावरून पाणी वाहत आहे. सालेकसा ते साखरीटोला आणि आमगाव मार्गावरील वाहतूक अद्यापही बंद आहे.

Web Title: Crushed dreams of 22 thousand farmers damage to crops on 11 thousand hectares 608 villages affected by flood nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2022 | 11:25 AM

Topics:  

  • Department of Agriculture
  • gondia news
  • navarashtra news

संबंधित बातम्या

Gen Z साठी मोठी बातमी! भारतात Starlinkची पुन्हा एन्ट्री? एलन मस्कांची नवी चाल
1

Gen Z साठी मोठी बातमी! भारतात Starlinkची पुन्हा एन्ट्री? एलन मस्कांची नवी चाल

Tecno Pova 8 Pro 5G भारतात दाखल! ‘अलाइव्ह मॅट्रिक्स’ डिस्प्लेने वेधलं लक्ष; किंमत-फिचर्स जाणून घ्या
2

Tecno Pova 8 Pro 5G भारतात दाखल! ‘अलाइव्ह मॅट्रिक्स’ डिस्प्लेने वेधलं लक्ष; किंमत-फिचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.