Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लातूर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के, अचानक जमीन हादरली; नागरिकांची रात्री पळापळ

लातुर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील बडूर आणि उस्तुरी गावात रात्री ९ वाजून ३० मिनिटाला भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. २. ४ रिश्टल स्केल तिव्रतेच्या भकंपाची नोंद करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 25, 2025 | 12:03 PM
लातूर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के, अचानक जमीन हादरली; नागरिकांची रात्री पळापळ

लातूर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के, अचानक जमीन हादरली; नागरिकांची रात्री पळापळ

Follow Us
Close
Follow Us:

लातूर : राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. थैमान घालणाऱ्या पावसामुळं मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झालं असून, बळीराजाला भविष्य अंधकारमय दिसू लागलं आहे. लातूरला याचा सर्वाधिक फटका बसला असून पावसामुळं इथं आलेल्या पूरस्थितीनं साऱ्या राज्याचं लक्ष वेधलं आहे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. त्यातच आता या लातूरला आणखी एका संकटाचा सामना करावा लागला तो म्हणजे भूकंपाचा. लातूर जिल्ह्यात पुन्हा भुकंपाचे धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लातुर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील बडूर आणि उस्तुरी गावात रात्री ९ वाजून ३० मिनिटाला भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. २. ४ रिश्टल स्केल तिव्रतेच्या भकंपाची नोंद करण्यात आली आहे. कलबुर्गी, सोलापूर, नांदेड, आणि लातूर या ठिकाणच्या भुकंप मापक यंत्रावर तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर २.४ रिश्टर स्केल या सौम्य भुकंपाची नोंद आढळून आली.

दरम्यान या घटनेच्या एक दिवसाआधीच लातुरमधील मुरुड अकोला गावातही २.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे भुकंपाचे धक्के बसले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी भुकंपाचे धक्के बसल्यामुळे नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. मात्र देन्ही भुकंपाचे धक्के सौम्य असल्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.

‘किल्लारी’च्या भुकंपाची आठवण

30 सप्टेंबर 1993 रोजी लातूर जिल्ह्यात भूकंप झाला होता आणि त्यामध्ये सुमारे हजारो आपलं आयुष्य गमावलं आहे. लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात 30 सप्टेंबर 1993 मोठा भूकंप झाला. या भूकंपाचं केंद्र होतं, सोलापूरच्या ईशान्येला 70 किमी अंतरावरचं किल्लारी गाव. पहाटे 3 वाजून 56 मिनिटांनी अचानक हादरे जाणवले. 6. 4 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता. हा भूकंप केवळ किल्लारी पुरता मर्यादित नव्हता. तर लातूर आणि उस्मानाबादच्या 52 गावांवर त्याचा प्रभाव पडला होता. लातूर जिल्ह्यातील औसा तालुका आणि उस्मानाबादमधील उमरगा तालुक्याला या भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला. लोकांनी आपलं अन् सारं सारं गमावलं. या भुकंपामुळे लातूरवासीयांसह अवघा महाराष्ट्र दु:खात होता. महाराष्ट्र दु:खात असताना देशातून परदेशातूनही मदत आली. तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांची महत्वाची भूमिका राहिली. लोकांचं पुनर्वसन करण्यात आलं. आता या भूकंपाला 30 वर्षे पूर्ण होत आहेत. महाराष्ट्रावर आघात करणाऱ्या भूकंपाची जखम आजही भळभळती आहे. आजही या भूकंपाची उल्लेख आला की, अंगावर शहारा येतो. आजही किल्लारीच्या नागरिकांना गहिवरून येतं.

Web Title: Earthquake tremors in latur district have created fear among citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 12:02 PM

Topics:  

  • Earthquake
  • Latur news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP
1

Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप
2

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
3

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
4

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.