चाकूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाने अनेक राजकीय दिग्गजांना धक्का दिला आहे. आवश्यक किमान मते न मिळाल्याने तब्बल २६ उमेदवारांची अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त झाली.
सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे सत्ताधारी भाजप व मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचे धोरण असून निवडणुकीच्या काळात मतांचा बाजार मांडणाऱ्यांना जनता धडा शिकवेल असा विश्वास आ. अमित देशमुख यांनी व्यक्त केला.
लातूर जिल्हा परिषद निवडणूक विकास, मूलभूत प्रश्न आणि योजनांच्या चौकटीबाहेर जाऊन सत्तेसाठीच्या थेट रणसंग्रामात रूपांतरित झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने एकमेकांविरोधात पूर्ण ताकद पणाला लावली आहे.
लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये सध्या अटीतटीची लढत सुरू आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नेमके काय होणार, याबाबत मोठी उत्सुकता होती. मात्र, सकाळी साडेअकराच्या सुमारास २० ते २५ गाड्यांच्या ताफ्यासह येत अंजना चौधरी यांनी स्वतःचा अर्ज मागे घेतला.
लातूर, शिवसेना (उबाठा) या पक्षाच्या अस्तित्वावरच जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांच्या औसा तालुक्यात भले मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षातील कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार आहेत.
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसने नेहमीच ठोस आणि लोकांच्या गरजांवर आधारित विकास मॉडेल राबवलं आहे. याउलट, भाजपाकडून दिखाऊ उपक्रमांमुळे दिशाभूल केली जात असल्याचा घणाघात काँग्रेस नेते धीरज देशमुख यांनी केला.
लातूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जळकोटमध्ये प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, सर्व संबंधितांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी केले.
लातूर महानगरपालिकेचे रणांगण आटोपल्यानंतर निकाल जाहीर होताच, स्वीकृत सदस्य म्हणून वर्णी लागण्यासाठी काँग्रेस आणि BJP या दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची गर्दी जमू लागली आहे. राजकारणी मुंडावळ्या बांधलेले इच्छुक देखील जमू लागले.
राज्य निवडणूक आयोगाने लातूर जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्यातील तब्बल ११८ गणांमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी विविध पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी हालचाली सुरू केल्या
लातूर महानगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत आणि ऐतिहासिक यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी लातूर जिल्हा परिषद निवडणूक २०२६ साठी पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे.
लातूरकरांनी काँग्रेसच्या विचारावर विश्वास ठेवून लातूर महापालिकेत काँग्रेसला पूर्ण बहुमत दिले, सर्वधर्म समभाव विचार असणारे सुसंस्कृत शहर म्हणून राज्यात या शहराची ओळख आहे.