लातूरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर प्रचंड राडा झाला. पत्ते उधळलल्याने राष्ट्रावादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे.
औसा तालुक्यातल्या बोरफळ इथे ही घटना घडली. या तरुणाने शेतामध्ये जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. नागेश यादव या तरुणाच्या घरची परिस्थिती खूपच हालाखीची होती. त्याच्या कुटुंबाकडे फक्त एक एकर शेती आहे.
महाराष्ट्रात बर्ड फ्लू पुन्हा वेगाने पसरत असल्याचं समोर येत आहे. अलिकडेच नागपूरमध्ये ३ वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला होता. यानंतर लातूरमधूनही मोठ्या संख्येने कावळे मृत्युमुखी पडल्याच्या बातम्या येत आहेत.
जालना शहर व जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने या अधिवेशनातील भरगच्च कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जालना ज्येष्ठ नागरिक मंचचे पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.
देवाडा गावच्या बसस्थानकावर उतरल्यानंतर काही वेळात मुलींना गावातील पोलिस पाटील मुकेश पेटकुले याने आपल्या दुचाकीने आल्याचे दिसले. बस स्थानकापासून गाव काही अंतरावर असल्याने मुलींनी पोलिस पाटील पेटकुले याच्यावर विश्वास ठेवला
लातूर महानगरपालिकेला उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्त्रोत उपलब्ध नाही. केवळ मालमत्ता कराची वसुली करूनच संपूर्ण आर्थिक डोलारा चालवावा लागत आहे. यातूनच नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासह विकासकामे करावी लागत आहेत.
विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे मनोबल खचले आहे. पण आपल्या शिवसैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी उद्धव ठाकरे सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहेत
मराठवाड्याप्रमाणेच लातूर ग्रामीण मतदारसंघातही मराठा आणि ओबीसी आरक्षण असा संघर्ष पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे उमेदवार मराठा आणि भाजप उमेदवार तुलनेत मागासवर्गीय आहे.
संभाजी निलंगेकरांना बहुमताने चौथ्यांदा विधानसभेत पाठवा. मंत्री करण्याची जबाबदारी माझी असल्याचे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले दिले.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारासाठी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
Maharashtra Assembly election 2024: लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने धीरज देशमुख यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर भाजप कोणाला उमेदवारी देणार? याची उत्सूकता सगळ्यांना होती.
लातूर जिल्ह्यात ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत लातूर मधील दयानंद विज्ञान महाविद्यालयात आज ‘कॉफी विथ कलेक्टर’ उपक्रम आयोजित करण्यात आला होता.