Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde: पर्यटकांना घेऊन एकनाथ शिंदे मुंबईत दाखल; विमानतळावर नेमकं काय घडलं?

विशेष विमानाने तब्बल १८३ पर्यटक गुरुवारी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास मुंबई विमानतळावर सुखरूप उतरत आपापल्या कुटुंबीयांच्या भेटीला पोहोचले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 26, 2025 | 10:48 AM
Eknath Shinde: पर्यटकांना घेऊन एकनाथ शिंदे मुंबईत दाखल; विमानतळावर नेमकं काय घडलं?
Follow Us
Close
Follow Us:

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांलक भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्यामध्ये ६ महाराष्ट्रातील नागरिकांचा समावेश आहे. या हिंसक घटनेनंतर जम्मू-काश्मीरमध्ये असंख्य पर्यटक अडकले होते. त्यात महाराष्ट्रातील नागरिकही मोठ्या संख्येने होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने जम्मू-काश्मीरकडे रवाना झाले. पर्यटकांना ते स्वत: विमानाने महाराष्ट्रात घेऊन आले. मुंबई विमानतळावर दाखल होताच अनेक पर्यटकांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित परत आणण्यासाठी राज्य शासनाने विशेष विमानांची व्यवस्था केली होती. या विशेष विमानाने तब्बल १८३ पर्यटक गुरुवारी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास मुंबई विमानतळावर सुखरूप उतरत आपापल्या कुटुंबीयांच्या भेटीला पोहोचले. या विशेष विमानाने १८३ पर्यटक गुरुवारी सायंकाळी सुमारे सात वाजता मुंबई विमानतळावर सुखरूप उतरले. दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी शासनाने त्वरीत पावले उचलली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ही विशेष उड्डाण व्यवस्था करण्यात आली होती. विमानतळावर उतरल्यानंतर पर्यटकांच्या चेहऱ्यावर दिलासा आणि समाधान दिसून आले.

विमानतळावर पोहचल्यानंतर काही पर्यटकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. पुण्यातील पर्यटक ज्योती झुरुंगे म्हणाल्या की, “काश्मीरमध्ये आम्ही भीतीच्या सावटाखाली अडकून पडलो होतो. वातावरण इतकं तणावपूर्ण होतं की, कधी एकदा पुण्यात परत येतो, असं वाटत होतं. पण शासनाच्या विशेष विमान व्यवस्थेमुळे आम्ही अखेर सुखरूप मुंबई विमानतळावर पोहोचलो आणि सुटकेचा नि:श्वास टाकला, शासनाने वेळेवर केलेली ही व्यवस्था खूपच चांगली होती. आम्हा सर्वांनी सुरक्षिततेची अनुभूती घेतली. आम्ही शासनाचे मनापासून आभार मानतो.”

मुंबई विमानतळावर पोहचल्यानंतर, उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. “जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे अडकून पडलेल्या पर्यटकांपैकी १८४ पर्यटकांना मुंबईला घेऊन जाणारे दुसरे विमान आज श्रीनगरहून मुंबईकडे रवाना झाले. श्रीनगर येथून रवाना होण्यापूर्वी या पर्यटकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि सुरक्षित प्रवासासाठी या सर्वांना आश्वस्त करून निरोप दिला.” त्याचवेळी, पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात रायगड जिल्ह्यातील कामोठे येथील रहिवाशी सुबोध पाटील हे श्रीनगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्याठिकाणी जाऊनही एकनाथ शिंदेंनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना सहकार्याचे आश्वासन दिले.

Web Title: Eknath shinde eknath shinde arrived in mumbai with tourists what exactly happened at the airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 10:48 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • india
  • maharashtra
  • pakistan

संबंधित बातम्या

Mumbai News : “नाद करा पण आमचा कुठं”; तब्बल 13 वर्षांनी मुंबईतील मंडळाच्या दहीहंडीची गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
1

Mumbai News : “नाद करा पण आमचा कुठं”; तब्बल 13 वर्षांनी मुंबईतील मंडळाच्या दहीहंडीची गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये होणार ‘फार्मर कप’ उपक्रमाची अंमलबजावणी
2

राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये होणार ‘फार्मर कप’ उपक्रमाची अंमलबजावणी

युक्रेन युद्ध रोखण्यासाठी भारतावर कर लावणे होते आवश्यक; ट्रम्प प्रशासनाचे सर्वोच्च न्यायालयात विवादित विधान
3

युक्रेन युद्ध रोखण्यासाठी भारतावर कर लावणे होते आवश्यक; ट्रम्प प्रशासनाचे सर्वोच्च न्यायालयात विवादित विधान

IRCC : कॅनडामध्ये भारतीयांना कायमस्वरूपी रहिवासी बनण्याची सुवर्णसंधी; कार्नी सरकारने पाठवले आमंत्रण
4

IRCC : कॅनडामध्ये भारतीयांना कायमस्वरूपी रहिवासी बनण्याची सुवर्णसंधी; कार्नी सरकारने पाठवले आमंत्रण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.