Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उसाला फुटले तुरे, शेतकरी चिंतेत; कारखान्यांनी वेळेत ऊसतोड करण्याची मागणी

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत उसाला अवेळी तुरे फुटू लागल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत. तुरे येऊ लागल्याने वजनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 11, 2025 | 01:47 PM
उसाला फुटले तुरे, शेतकरी चिंतेत; कारखान्यांनी वेळेत ऊसतोड करण्याची मागणी

उसाला फुटले तुरे, शेतकरी चिंतेत; कारखान्यांनी वेळेत ऊसतोड करण्याची मागणी

Follow Us
Close
Follow Us:
  • उसाला फुटले तुरे, शेतकरी चिंतेत
  • वजन घटण्याची शक्यता
  • वेळेत ऊसतोड करण्याची मागणी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत उसाला अवेळी तुरे फुटू लागल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत. पिकांवर आधीच हवामानाचा प्रतिकूल परिणाम, रोगराई आणि पूरस्थितीमुळे नुकसान झाले होते. त्यात आता ऊसाला ९ ते १० महिन्यांतच तुरे येऊ लागल्याने वजनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. वेळीअवेळी पडणारा पाऊस, वाढलेली थंडी, हवामानातील सततची उलथापालथ यामुळे ऊसाचे वाढीचे चक्र विस्कळीत झाले आहे.

साधारणपणे डिसेंबरच्या मध्याला ऊसाला तुरे यायला सुरुवात होते, मात्र यंदा पिकांच्या वाढीच्या प्रारंभिक टप्प्यातच तुरे दिसू लागले आहेत. तुरे आल्याने ऊस जाडीस येणे थांबते आणि सरासरी प्रति एकरी ४ ते ५ टनांपर्यंत वजन घट होते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तुऱ्यांमुळे वजनात होणारी घट टाळण्यासाठी कारखान्यांनी त्वरीत ऊसतोड हंगाम गतिमान करण्याची मागणी होत आहे. कारखाने वेळेत तोड करू शकले नाहीत तर शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी कारखान्याच्या तोडणी कर्मचाऱ्यांना तातडीने फेरपाहणी करण्याची मागणी केली आहे.

उत्पादनात घट, वैरणीचा प्रश्न गंभीर

तुरा फुटलेल्या उसाचा जनावरांना खाद्य (वैरणी) म्हणून उपयोग होत नसल्याने दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ऊस उत्पादन घटलेच तर गाई-म्हशींसाठी लागणाऱ्या वैरणीचा तुटवडा वाढणार आहे. यामुळे पशुपालक शेतकरी देखील चिंतातूर आहेत.

खोडव्याच्या उसालाही तुरा

खोडव्याचा ऊस साधारणपणे जास्त उत्पादन देणारा मानला जातो. परंतु यंदा त्यालाही तुरा येऊ लागल्याने परिस्थिती अधिक बिकट बनली आहे. काही ठराविक वाणांनाच तुरा येतो, अशी परिस्थिती मागील काही वर्षांत होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन आणि बदलत्या हवामानाला अनुरूप वाणांचा अवलंब केला होता. परंतु यंदा अनेक महत्त्वाच्या वाणांना अवेळी तुरे फुटल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र पहावयास मिळत आहे.

शेतकऱ्यांवर तिहेरी संकट

बदलत्या हवामानाचा तडाखा, रोगराई आणि अवेळी फुटलेले तुरे या तिहेरी संकटामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर गंभीर आव्हान निर्माण झाले आहे. वेळेत ऊसतोड आणि पिकांच्या संरक्षणासाठी धोरणात्मक पावले उचलली नाहीत तर येत्या हंगामात जिल्ह्याच्या ऊस उत्पादनावर मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता काही जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Farmers are worried as sugarcane weight will decrease

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 01:47 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • kolhapur

संबंधित बातम्या

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची घोषणा! Pump Storage Projects साठी मोठे करार; वाचा सविस्तर
1

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची घोषणा! Pump Storage Projects साठी मोठे करार; वाचा सविस्तर

अहिल्यानगरच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जिल्ह्यासाठी 12 कोटी 38 लाख रुपये मंजूर
2

अहिल्यानगरच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जिल्ह्यासाठी 12 कोटी 38 लाख रुपये मंजूर

Indigo Crisis चा फटका मावळच्या गुलाब उत्पादकांना; लाखोंचे नुकसान अन्…
3

Indigo Crisis चा फटका मावळच्या गुलाब उत्पादकांना; लाखोंचे नुकसान अन्…

कर्नाटकच्या बसवर ‘जय महाराष्ट्र’…! मराठी-कन्नड वाद पेटला? ठाकरेसेनेचे कर्नाटक सरकारविरुद्ध आंदोलन
4

कर्नाटकच्या बसवर ‘जय महाराष्ट्र’…! मराठी-कन्नड वाद पेटला? ठाकरेसेनेचे कर्नाटक सरकारविरुद्ध आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.