Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकरी रहायला नांदेडला आणि शेती तेलंगणात, काय आहे बातमी? : जाणून घ्या सविस्तर

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, बिलोली, देगलूर, भोकर या तेलंगणा सीमावर्ती भागात असणाऱ्या शेतकऱ्यांनी या विजेच्या 'शॉक'पासून आपल्या पिकांना, स्वतः ला वाचवण्यासाठी तेलंगणा राज्यात शेतजमिनी खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 26, 2022 | 10:37 PM
शेतकरी रहायला नांदेडला आणि शेती तेलंगणात, काय आहे बातमी? : जाणून घ्या सविस्तर
Follow Us
Close
Follow Us:

नांदेड : महाराष्ट्रात सततचे असणारे लोडशेडिंग, रात्री-अपरात्री या लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांचे होणारे हाल आणि यामुळे त्रस्त झालेल्या नांदेड जिल्ह्यातील शेतकरी. ही आता नित्याचीच बाब झाली असताना यावर शेतकऱ्यांनी मात्र आता भलताच उपाय शोधून काढलाय.

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, बिलोली, देगलूर, भोकर या तेलंगणा सीमावर्ती भागात असणाऱ्या शेतकऱ्यांनी या विजेच्या ‘शॉक’पासून आपल्या पिकांना, स्वतः ला वाचवण्यासाठी तेलंगणा राज्यात शेतजमिनी खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.

तेलंगणा राज्यात शेतजमिनी खरेदी केली

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपल्या मेहनतीचे, घामाचे पैसे देऊन वीज, डेपो अथवा ट्रान्सफार्मर वेळेवर मिळावे आणि ही वीज दिवसा मिळावी यासाठी आंदोलन करावे लागते. यावर कितीही आटापिटा केला तरी रात्रीला  दहानंतर फक्त पाच तास वीज उपलब्ध होते. त्यामुळे या समस्यांना मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांनी तेलंगणा राज्यात शेतजमिनी खरेदी करुन यावर तोडगा काढलाय.

नांदेड जिल्ह्यातील बिलोली शहरालगत आणि तेलंगणा सीमावर्ती  असणाऱ्या येसगी गावचे रहिवाशी  44 वर्षीय सोमनाथ गंगाधर प्रचंड हे शेतकरी आहेत. बीए पर्यत शिक्षण झालेले गंगाधर प्रचंड आणि पदवी शिक्षण घेतलेले त्यांचे छोटे भाऊ उपेंद्र प्रचंड हे दोघेही आपली परंपरागत असणारी अठरा एकर शेती कसून आपला उदरनिर्वाह करतात. बिलोली तालुक्यातील येसगी हे मांजरा नदी काठी वसलेले तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती आणि एका वेगळ्या अशा लाल रेतीसाठी आणि पाणीदार गाव म्हणून या गावाची ओळख आहे.

विजेच्या लपंडावाने आणि सततच्या लोडशेडिंगमुळे मेटाकुटीस

गंगाधर प्रचंड आणि उपेंद्र प्रचंड या कुटुंबियांचा परंपरागत व्यवसाय हा शेती असून त्यांना अठरा एकर बागायती शेती आहे. गावलगतच मांजरा नदीचे विस्तीर्ण आणि बारा महिने डबडबून भरून वाहणारे पात्र आहे. शेतीला बारमाही, मुबलक पाणी पुरवठा असल्यामुळे भात पीक, सोयाबीन, हरभरा, ऊस, भाजीपाला, केळी, मूग, उडीद, मका ही नगदी पिके ते घेतात. परंतु मुबलक पाणीपुरवठा असतानाही विजेच्या लपंडावाने आणि सततच्या लोडशेडिंग मुळे मेटाकुटीस आले. यातच स्व:कष्टाचे आणि मेहनतीचे पैसे मोजूनही 24 तासातून फक्त पाच तास वीज पुरवठा होत होता. तर एवढा खटाटोप करूनही शेतीसाठी रात्रीला दहाच्या नंतर  फक्त पाच तास वीज मिळत होती. त्यातही ट्रान्सफार्मर जळण्याचे, विजेच्या तारा तुटण्याच्या घटनांमुळे बहरात आलेली पिके अनेक वेळा सुकली, कोमेजली आणि जळून गेली. तर रात्री बेरात्रीच्या या वीज पुरवठ्यामुळे अनेक वेळा जंगली जनावरं, साप, चोर यांचाही सामना करावा लागला.

तेलंगणा राज्यात दोन एकर जमीन खरेदी केली

या सगळ्या गोष्टीस कंटाळून गंगाधर आणि उपेंद्र या बंधूनी यावर एक शक्कल लढवली. सीमावर्ती राज्य असणाऱ्या तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा मोफत आहे. तसेच दरवर्षी पीक लागवडीसाठी ‘रयतु बंधू’ या योजनेच्या अंतर्गत एकरी सहा हजार लागवड खर्च तेलंगणा सरकार देते असे लक्षात आले. गंगाधर आणि उपेंद्र प्रचंड या कुटुंबाने सीमावर्ती असणाऱ्या तेलंगणा राज्यात दोन एकर जमीन खरेदी केली. ज्यातून तेलंगणा राज्यात घेतलेल्या शेतात 24 तास वीज पुरवठा होत असल्याने त्या ठिकाणची चोवीस तास उपलब्ध होणारी वीज आणि पाण्याचा उपयोग घेऊन, महाराष्ट्रात असणाऱ्या अठरा एकर शेतीला विजेमुळे पाणीदार केले. तेलंगणा राज्यात घेतलेल्या या दोन एकर शेतीमुळे प्रचंड यांच्या महाराष्ट्रातील अठरा एकर शेतीला चोवीस तास उपलब्ध झाली व त्यांची अडचण सोडवल्या गेली.

[read_also content=”वाढत्या तापमानाचा दूध उत्पादनावर परिणाम; दुधाची कमतरता भासणार? https://www.navarashtra.com/maharashtra/effects-of-rising-temperatures-on-milk-production-will-there-be-a-shortage-of-milk-nrdm-259968.html”]

दरम्यान अशा प्रकारे महाराष्ट्रातील लोडशेडिंगच्या आणि विजेच्या त्रासास  कंटाळून सीमावर्ती भागातील अनेक शेतकऱ्यांनी तेलंगणाचा आसरा घेतला हे एक जळजळीत सत्य आहे. पण प्रचंड यांच्यासारखे महाराष्ट्रातील अनेक शेतकरी तेलंगणात शेतजमीन घेऊन आपली अडचण सोडवू शकत नाहीत. पण याच विजेपायी अनेक शेतकरी रात्री बेरात्री शेतशिवारात फिरून, जंगली जनावरं, साप चावणे अशा घटनांची शिकार ठरतात. तर अनेकजण तार तुटून, विजेचा धक्का लागून, ट्रान्सफार्मरला चिटकून मरतात. पांढर कपाळ घेऊन फिरणाऱ्या त्यांच्या विधवा बायका आणि बापाअभावी पोरकी झालेली लेकरं  या घटनांमधून सरकारला फक्त एवढंच विचारतात, की जे तेलंगणा राज्याला जमले ते महाराष्ट्र सरकारला का जमत नाही?, असा सवाल शेतकरी करत आहेत.

Web Title: Farmers live in nanded and agriculture in telangana whats the news learn more nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2022 | 10:37 PM

Topics:  

  • ajit pawar
  • cmomaharashtra
  • Dr. Nitin Raut

संबंधित बातम्या

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा
1

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले शुभसंकेत; दोन उमेदवारांची बिनविरोध निवड
2

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले शुभसंकेत; दोन उमेदवारांची बिनविरोध निवड

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
3

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

PMC Elections 2025 : पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून गुन्हेगारांना उमेदवारी; अजित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका
4

PMC Elections 2025 : पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून गुन्हेगारांना उमेदवारी; अजित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.