Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांचा महामोर्चा स्थगित, मागण्या मान्य झाल्याने वासिंदमध्ये जे. पी. गावित यांनी केली घोषणा

नाशिकहून निघालेला लाँग मार्च ठाण्यात येताच शिंदे सरकारने तातडीने हालचाली केल्या. विशेष म्हणजे विधानभवनात गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शेतकरी संघटनांमध्ये बैठकही पार पडली होती. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याची माहिती देण्यात आली.

  • By साधना
Updated On: Mar 18, 2023 | 01:12 PM
j-p-gavit

j-p-gavit

Follow Us
Close
Follow Us:

वासिंद: शिंदे-फडणवीस सरकारला मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कारण शेतकऱ्यांचा किसान लाँग (Farmers Long March) मार्च अखेर स्थगित करण्यात आला आहे. शेतकरी नेते जे. पी. गावित (J. P. Gavit) यांनी याबाबत माहिती दिली आहे. सरकारनं शिष्टमंडळ घेऊन बोलावलं आणि आमच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारकडून आमच्या 70 टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. बाकीच्या मागण्यांवर विचार सुरु आहे. लोकांना विश्वासात घेऊन आंदोलन (Famrmers Protest Update) मागे घेण्याबाबत बोलणी झाली. बैठकीत जे निर्णय झाले, त्याची प्रत ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्याकडे सुपूर्द केलेली आहे. मागण्या मान्य झाल्याने मोर्चेकरी समाधानी आहेत. उरलेल्या मागण्याही काही दिवसांमध्ये पूर्ण होतील, असा विश्वासही शेतकरी नेते जे. पी. गावित यांनी ठाण्यातील वासिंद (Wasind) येथे व्यक्त केला आहे.

[read_also content=”https://www.navarashtra.com/maharashtra/sanjay-raut-reaction-on-shinde-group-position-nrsr-376925.html https://www.navarashtra.com/maharashtra/sanjay-raut-reaction-on-shinde-group-position-nrsr-376925.html”]

नाशिकहून निघालेला लाँग मार्च ठाण्यात येताच शिंदे सरकारने तातडीने हालचाली केल्या. विशेष म्हणजे विधानभवनात गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शेतकरी संघटनांमध्ये बैठकही पार पडली होती. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याची माहिती देण्यात आली.

शेतकऱ्यांचा मोर्चा नाशिकहून ठाणे जिल्ह्यातील वासिंद येथे पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वेगानं सूत्र हलवण्यास सुरुवात केली.  मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचंही आश्वासन दिलं.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे
सात बारा उतारा कोरा केला गेला पाहिजे
नुकसानीनंतर शेतकऱ्यांना तातडीने पीकविमा मिळाला पाहिजे
अवकाळी पावसाने होणाऱ्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्याची भरपाई मिळाली पाहिजे

वर उल्लेख केलेल्या मागण्यांसह अन्य अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा विराट मोर्चा नाशिकहून ठाण्यात आला होता. मात्र आता तो मोर्चा स्थगित करण्यात आला आहे.

Web Title: Farmers long march stopped after demands are fullfilled nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2023 | 01:08 PM

Topics:  

  • Farmers Protest
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Nashik : भोंदू अशोक खरातविरुद्ध पहिले दोषारोपपत्र दाखल, १०५ साक्षीदारांची चौकशी
1

Nashik : भोंदू अशोक खरातविरुद्ध पहिले दोषारोपपत्र दाखल, १०५ साक्षीदारांची चौकशी

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
2

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

Sangali News : जिल्ह्यात ‘Tree Army’ची हरित क्रांती! ‘पिंपळाचे पुनर्वसन ते लोकचळवळ’, आमदार सुहास बाबर यांचा पुढाकार
3

Sangali News : जिल्ह्यात ‘Tree Army’ची हरित क्रांती! ‘पिंपळाचे पुनर्वसन ते लोकचळवळ’, आमदार सुहास बाबर यांचा पुढाकार

Ashok Kharat Case : रुपाली चाकणकरांच्या अडचणींत होणार वाढ; SIT नंतर आता ED कडून समन्स
4

Ashok Kharat Case : रुपाली चाकणकरांच्या अडचणींत होणार वाढ; SIT नंतर आता ED कडून समन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.