Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धुळ्यातील धक्कादायक घटना, काजू समजून खाल्ल्या चंद्रज्योती फळाच्या बिया, 7 चिमुरड्यांना विषबाधा

काजू समजून चंद्रज्योती या फळाच्या बिया खाल्ल्यामुळे 7 मुलांची प्रकृती अस्वस्थ झाल्याची घटना काल धुळे तालुक्यातील बोरकुंड गावात घडली. घराजवळ खेळत असताना मुलांना चंद्रज्योतच्या झाडाखाली पडलेल्या बिया दिसल्या.

  • By साधना
Updated On: Feb 03, 2023 | 12:49 PM
jatropha

jatropha

Follow Us
Follow Us:

धुळे : काजू समजून चंद्रज्योतीच्या बिया (Jatropha) खाल्ल्यामुळे 7 चिमुरड्यांची प्रकृती बिघडली आहे. धुळे (Dhule) तालुक्यातील बोरकुंड गावातील आदिवासी वस्तीत लहान बालकांनी खेळता खेळता काजू समजून चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. विषबाधा (Food Poisoning) झालेल्या सर्व चिमुरड्यांवर शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत.

काजू समजून चंद्रज्योती या फळाच्या बिया खाल्ल्यामुळे 7 मुलांची प्रकृती अस्वस्थ झाल्याची घटना काल धुळे तालुक्यातील बोरकुंड गावात घडली. घराजवळ खेळत असताना मुलांना चंद्रज्योतच्या झाडाखाली पडलेल्या बिया दिसल्या. खेळता खेळता काजू समजून मुलांनी या विषारी बिया खाल्ल्या. या बिया खाल्ल्यानंतर काही वेळातच त्या मुलांना अस्वस्थ वाटू लागले. मुलांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरु झाला. मुलांची प्रकृती खालावल्याने पालकांनी त्यांना तातडीने शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं. यातील एका मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. बिया खाल्ल्यानंतर 6 मुलं बेशुद्ध झाली असून त्यांच्यावर सध्या बाल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, मात्र त्यांना देखील त्रास होत असल्याने त्यांना 24 तास देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

[read_also content=”वरुण धवन आणि जान्हवी कपूरच्या ‘बवाल’ची रिलीज डेट अचानक ढकलली पुढे,नक्की झालं तरी काय ? https://www.navarashtra.com/entertainment/varun-dhawan-and-janhvi-kapoor-starrer-bawaal-movie-release-date-changed-nrsr-366973/”]

चंद्रज्योतीच्या बिया
सामान्यपणे चंद्रज्योती, रतनज्योत किंवा रान एरंड म्हणून ओळखले जाणारे जेट्रोफा ही दक्षिणेकडील भागात आढळणारी एक सदाहरीत वनस्पती आहे. पूर्वीपासून औषधी उपयोगासाठी या चंद्रज्योतीचा वापर होत आला आहे. अलिकडे जैविक-इंधन म्हणूनही त्याला प्रोत्साहन देण्यात आले होते.

रस्ताच्या कडेला किंवा शाळेच्या परिसरात झुडुपांसारख्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या या वनस्पतीची फळं दिसायला खूप आकर्षक असतात. परंतु चंद्रज्योतीचे फळ किंवा बिया खाल्ल्याने लहान मुलांना विषबाधा होत असल्याचे प्रकार फारसे कधी समोर आले नाही. मात्र काजुच्या बिया समजून लहान मुलं या बिया फोडून खात असल्याचं बऱ्याचदा पाहायला मिळालं आहे. फळ खाल्यानंतर लहान मुलांना वारंवार उलट्या, ओटी-पोटात वेदना होतात, तोंडातून फेस येतो, असे म्हटले जाते.

Web Title: Food poisoning to 7 children after eating jatropha nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2023 | 12:46 PM

Topics:  

  • dhule news
  • food poisoning news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Market Outlook: Sensex आणि Nifty ची तेजी कायम राहणार की…? ‘या’ चार प्रमुख घटकांवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं
1

Market Outlook: Sensex आणि Nifty ची तेजी कायम राहणार की…? ‘या’ चार प्रमुख घटकांवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं

सरकारचा मास्टरस्ट्रोक! इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाचे वाचले 1.90 लाख कोटी रुपये; शेतकऱ्यांनाही मोठा फायदा
2

सरकारचा मास्टरस्ट्रोक! इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाचे वाचले 1.90 लाख कोटी रुपये; शेतकऱ्यांनाही मोठा फायदा

Gautam Adani यांना मोठा दिलासा! अमेरिकन कोर्टात फौजदारी आरोप का हटवले? DoJ ने सांगितली 6 मोठी कारणं
3

Gautam Adani यांना मोठा दिलासा! अमेरिकन कोर्टात फौजदारी आरोप का हटवले? DoJ ने सांगितली 6 मोठी कारणं

विमानंही आता Ethanol वर उडणार… सरकारचा ऐतिहासिक निर्णय, प्रदूषण पसरवणारे ‘जेट फ्यूल’ होणार रिप्लेस, कोणी घेतला निर्णय?
4

विमानंही आता Ethanol वर उडणार… सरकारचा ऐतिहासिक निर्णय, प्रदूषण पसरवणारे ‘जेट फ्यूल’ होणार रिप्लेस, कोणी घेतला निर्णय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.