एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का; पुण्यातील बडा नेता धनुष्यबाण हाती घेणार
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. ते अद्याप थांबताना दिसत नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा पक्षप्रवेश असणण्याची शक्यता आहे.
पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माजी आमदार महादेव बाबर हे त्यांच्या समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. महादेव बाबर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. महादेव बाबर यांच्यासोबत शहरातील आणखी काही नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे महादेव बाबर नाराज होते. बाबर यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन तिकिटाची मागणी केली होती. बाबर हे हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार होते. मात्र त्यांची मागणी महाविकास आघाडीकडून डावलण्यात आली.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठी इन्कमिंग होणार असल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील नऊ ते दहा आजी-माजी नगरसेवक करणार एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होणार आहे. या नगरसेवकांच्या यादीत काही मोठे नाव असण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचेही अनेक नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस नगरसेवकासह माजी आमदार रवींद्र धंगेकर देखील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धंगेकर यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसलाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात सुंदर, प्रशस्त घर असावे हे स्वप्न असते. मुंबईकरांनीही हेच स्वप्न उराशी बाळगले आहे. घराच्या समस्येमुळे मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेला आहे. अशा मुंबईकरांना पुन्हा मुंबईत परत आणून शासन सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून त्याच्या प्रशस्त घराचे स्वप्न पूर्ण करणार आहे, अशी ग्वाही आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
काही विकासक विकास करण्यासाठी घेतलेल्या इमारती सोडून गेले, त्यांनी रहिवाशांना भाडेही अदा केले नाही. अशा विकासकांना काढून टाकणार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सामान्यांना परवडणारे व प्रशस्त असे घर देण्यासाठी वेळ पडल्यास नियम, कायद्यात बदल करावयाच्या असल्यास तेही करण्यात येतील. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळाच्या समोर असे निर्णय आणले जातील.
रखडलेल्या पुनर्विकासाच्या कामांना सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून गती देण्यात येईल. ठाण्यातही अशा पद्धतीने सामूहिक पुनविकास योजना सुरू झालेली आहे. सामूहिक पुनर्विकास योजना राबविताना येत असलेल्या सर्व अडचणी दूर करण्यात येतील.
एसआरए, म्हाडा, एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको व बीएमसी या सर्व यंत्रणांच्या समन्वयाने सामूहिक पुनर्विकासाची योजना राबविण्यात येईल. सामान्य मुंबईकरांना प्रशस्त घर देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून प्राथमिक सोयी सुविधांची उपलब्धता करून देण्यात येईल. यामध्ये आरोग्याच्या सुविधा, खुले मैदान आदींचा समावेश असेल. शासन लवकरच गृहनिर्माण धोरण आणत आहे. यामध्ये म्हाडाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, काम करणाऱ्या महिला, गिरणी कामगार यांच्यासाठी घरांची उपलब्धता आणि परवडणारी घरे, परवडणारी भाड्याची घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार आहे, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.