Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोफत धान्याला मोजावे लागतात पैसे, ‘या’ तालुक्यातील खळबळजनक प्रकार; संतप्त नागरिकांनी रेशन दुकान पाडले बंद

राज्याचे महसूलमंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात मौजे घुगलवडगाव येथील स्वस्त धान्य दुकानात सर्वांना धान्य पैसे देऊन विकत घ्यावे लागत आहे. याबाबत नागरिकांनी तक्रार करूनही अधिकारी याची दखल घेत नसल्याने संतप्त नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत स्वस्त धान्य दुकानदारास दुकान बंद ठेवण्यास भाग पाडले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 03, 2023 | 12:45 PM
मोफत धान्याला मोजावे लागतात पैसे, ‘या’ तालुक्यातील खळबळजनक प्रकार; संतप्त नागरिकांनी रेशन दुकान पाडले बंद
Follow Us
Close
Follow Us:

श्रीगोंदा : देशासह राज्यात (Starte) गोरगरीब सर्वसामान्य जनतेला रेशनकार्डवर गहु, तांदूळ हे केंद्र सरकारने (Goverment) १ जानेवारी २०२३ पासून मोफत धान्य वाटपाचे धोरण ठरवले आहे. यानुसार सर्वत्र सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला गहु, तांदूळ, मोफत मिळत आहे. परंतु, राज्याचे महसूलमंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात मौजे घुगलवडगाव येथील स्वस्त धान्य दुकानात सर्वांना धान्य पैसे देऊन विकत घ्यावे लागत आहे. याबाबत नागरिकांनी तक्रार करूनही अधिकारी याची दखल घेत नसल्याने संतप्त नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत स्वस्त धान्य दुकानदारास दुकान बंद ठेवण्यास भाग पाडले.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, श्रीगोंदा तालुक्यातील मौजे घुगलवडगाव येथील तात्यासाहेब बापुराव झराड हे स्वस्त धान्य दुकान चालवितात. त्यांच्याकडे बेलवंडी कोठार येथीलही दुकान असून त्यांनी गुरुवारी ( दि. २) सकाळी दुकान उघडले. धान्य नेण्यासाठी नागरिक आले असता रेशन कार्डावरील गहु, तांदूळ हे मोफत असताना दुकानदाराने पैसे घेऊन वाटपास सुरवात केली. याबाबत गावातीलच काही जेष्ठ नागरिक व महिला यांनी ‘मोदी सरकारचे धान्य फुकट आहे. तुम्ही पैसे का घेता’, अशी विचारणा केली . त्यावर ज्यांनी पैसे दिले त्यांनाच धान्य दिले व ज्यांनी पैसे दिले नाहीत त्यांना धान्य देण्यास त्यांनी नकार दिला.

फोन करूनही पुरवठा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

याबाबतची चर्चा गावभर पसरल्याने दुकानासमोर गावातीलच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने एकच गोंधळ उडाला. काही जणांनी तात्काळ श्रीगोंदा तहसील कार्यालय व पुरवठा विभागाशी संपर्क साधला. परंतु, तक्रारदारांनी वेळोवेळी फोन करूनही दुपारपर्यंत महसूल व पुरवठा विभागाचा एकही अधिकारी त्या ठिकाणी फिरकला नाही. त्यानंतर संतप्त नागरिक व महिलांनी स्वस्त धान्य दुकानदारास आम्हाला मोदी सरकारचे मोफत असलेले धान्य तुम्ही विकत का दिले, असा जाब विचारत दुकानदाराला घेराव घातला. ‘आम्हाला मोफत धान्य कधीच दिले नाही. मोफत धान्य कधी मिळणार याची कार्डधारक विचारणा करीत होते.

काही कार्डधारकांचे पैसे केले परत

दरम्यान, सदर दुकानदाराने काही जणांना घेतलेले धान्याचे घेतलेले पैसे परत दिले. तर ज्यांचे धान्याचे घेतलेले पैसे राहिले आहेत त्यांचे परत देईन, असे दुकानदाराने सांगितले. यावर ग्रामस्थांचे समाधान न झाल्याने त्यांनी सध्या दुकान बंद ठेवा. जेव्हा महसुल पुरवठा विभागाचे अधिकारी गावात येतील आणि गहु, तांदूळ हे धान्य मोफत आहे की विकत हे ठरल्यानंतरच दुकान सुरू करा, असे संतप्त नागरिकांनी सांगितले व त्यानंतर सदर स्वस्त धान्य दुकानदाराने दुकान बंद केले.

महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यात अनागोंदी ?

देशासह राज्यात गोरगरिबांना धान्य मोफत मात्र श्रीगोंद्यात विकत घ्यावे लागत आहे. राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यात हा प्रकार घडल्याने सर्वसामान्य गोरगरीब जनतेत याबाबत एकच उलट सुलट चर्चा सुरू आहे.

[blockquote content=”केंद्र सरकारचे रेशनवरील धान्य हे मोफत आहे. हे प्रसार मध्यमांद्वारे सर्वांना माहित असताना देखील लोकांनी पैसे दिलेच कसे ?. व स्वस्त धान्य दुकानदारानेही कार्डधारकांकडून पैसे घेतलेच कसे ?.” pic=”” name=”- सुधाकर भोसले, प्रांतअधिकारी, श्रीगोंदा -पारनेर.”]

Web Title: Free grain has to be paid for sensational in this taluk angry citizens demolished the ration shop and closed it nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2023 | 12:45 PM

Topics:  

  • ahmednagar
  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • Shrigonda

संबंधित बातम्या

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
1

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

Ajit Pawar: अहमदनगर रेल्वे स्थानक अहिल्यानगर झाले, लवकरच औरंगाबाद स्थानकाचेही नाव बदलणार, अजित पवारांचे आश्वासन
2

Ajit Pawar: अहमदनगर रेल्वे स्थानक अहिल्यानगर झाले, लवकरच औरंगाबाद स्थानकाचेही नाव बदलणार, अजित पवारांचे आश्वासन

Ahmednagar Railway Station: अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलले, स्थानिकांच्या मागणीला सरकारची मान्यता
3

Ahmednagar Railway Station: अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलले, स्थानिकांच्या मागणीला सरकारची मान्यता

Nepal Protest: नेपाळमध्ये महाराष्ट्राच्या 150 पर्यटकांची सुटका कधी होणार? अखेर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया
4

Nepal Protest: नेपाळमध्ये महाराष्ट्राच्या 150 पर्यटकांची सुटका कधी होणार? अखेर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.