Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्याचा अपमान करणाऱ्या राज्यपालांची केंद्राकडे तक्रार करणार; शिंदे गटाचे स्पष्टीकरण

राज्यपालांनी केलेले वक्तव्य राज्याचा अपमान करणारे आहे. राज्यपाल हे संविधानिक पद असून त्यांच्यासंदर्भात केंद्र शासनाला लिहिण्याचा पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. त्यामुळे राज्यपालांकडून पुन्हा अशी विधान येणार नाही, याबाबत केंद्र शासन त्यांना कळवू शकते, असे दीपक केसरकर म्हणाले.

  • By Ganesh Mate
Updated On: Jul 30, 2022 | 09:45 AM
राज्याचा अपमान करणाऱ्या राज्यपालांची केंद्राकडे तक्रार करणार; शिंदे गटाचे स्पष्टीकरण
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबईबद्दल (Mumbai) केलेल्या वादग्रस्त विधानावर राज्य सरकारनेही नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांचे हे विधान राज्याचा अपमान (Maharashtra Insult) करणार असून त्याबाबत केंद्र सरकारकडे (Central Government) आम्ही तक्रार करणार असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी स्पष्ट केले.

केसरकर म्हणाले, राज्यपालांनी केलेले वक्तव्य राज्याचा अपमान करणारे आहे. राज्यपाल हे संविधानिक पद असून त्यांच्यासंदर्भात केंद्र शासनाला लिहिण्याचा पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. त्यामुळे राज्यपालांकडून पुन्हा अशी विधान येणार नाही, याबाबत केंद्र शासन त्यांना कळवू शकते.

मुंबई कॉस्मॉपोलिटन शहर आहे. येथे केवळ दोनच समाजांचे योगदान नाही, तर अनेक समाजांचे मुंबईच्या विकासात योगदान आहे. यामध्ये मुंबईचे मूळ मराठीच आहे. तसेच, मुंबईच्या उभारणीत सर्वाधिक वाटा हा मराठी माणसाचाच आहे ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे दोन समाज का? पारसी सामाजाने देखील मुंबईच्या औद्योगिक वाढीत योगदान दिले आहे. पण एखाद्या समाजाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांच्या योगदानाबद्दल बोलायचे असते पण त्यांनी पैसा काढून घेतला तर मुंबईत काही शिल्लक राहणार नाही, असे म्हणणे म्हणजे मुंबईबद्दल अभ्यास केलेला नाही हे द्योतक आहे, असेही केसरकर म्हणाले.

मुंबई आर्थिक राजधानी का आहे? तर बहुतांश बँकांचे हेडक्वार्टर मुंबईला आहे. स्वतः रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबईत आहे. त्यामुळे आर्थिक राजधानी कशाला म्हणतात की, एकत्रित जो कर दिला जातो त्यांपैकी पूर्वी ४० टक्के हिस्सा एकट्या मुंबई शहरातून येत होता. त्यामुळे हे जे योगदान आहे ते कुठल्या एखाद्या समाजामुळे नाही तर सर्व समाज एकत्र आल्याने झाले आहे. मुंबई केवळ लाठी आणि लोटा घेऊन लोक आले पण त्यांना या शहराने आश्रय दिला मोठे केले. त्यामुळे कोणीही बाहेरुन गुंतवणूक घेऊन मुंबईत आलेले नाही, असेही केसरकर यांनी सांगितले.

Web Title: Governors who insult the state will be reported to the centre so explanation of the shinde group nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2022 | 09:45 AM

Topics:  

  • Deepak Kesarkar
  • Governor Bhagat Singh Koshyari
  • Mumbai

संबंधित बातम्या

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
1

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
2

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
3

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Devendra Fadnavis on Mumbai Rain : पुढील 3 तास महत्त्वाचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा इशारा, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू
4

Devendra Fadnavis on Mumbai Rain : पुढील 3 तास महत्त्वाचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा इशारा, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.